परभणी (प्रतिनिधी) स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे, राज्यस्तरावरून सदरील निवडणुका एकत्रित लढण्यात याव्यात अशा सूचना आहेत परंतु काही स्थानिक कारणाने, असमन्वय झालाच तर स्वतंत्र लढायची गरज पडलीच तर आमची सर्व तयारी पूर्ण झाली आहे, कार्यकर्त्यांनी , पदाधिकाऱ्यांनी स्वबळाचीही तयारी असू द्यावी असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आ राजेश विटेकर यांनी परभणी येथील संवाद व संघटनात्मक बैठकीत बोलताना सांगितले.
सन 2014 प्रमाणे जिल्ह्यातील बहुतांशी नगरपालिका ,पंचायत समिती, जिल्हा परिषद व परभणी महानगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ताब्यात होती आता पुन्हा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटनात्मक बाजूनी एक नंबर वर असल्याने आता पुन्हा एकदा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था वर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकणार हे निश्चित आहे असेही ते म्हणाले , जे कार्यकर्ते, पदाधिकारी पक्ष कार्य करतील व आपापल्या भागात पक्ष एक नंबर वर आणतील ,त्यांनाच स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हास्तरीय अशासकीय समित्यांवर पदे देण्यात येणार आहेत . आपापल्या गावाच्या , सर्कलच्या, व वॉर्डच्या विकासासाठी निधी मागण्यासाठी अनेक जण येऊन भेटत आहेत, वरील सर्वांचे पक्षकार्य, सदस्य नोंदणी , व लोकांसाठी त्यांनी केलेली कामे लक्षात घेऊनच निधी वाटपा बाबत पुढील दिशा ठरवण्यात येईल , ज्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उभे राहायचे आहे अशांनी आजपासूनच सर्व शक्तिनिशी तयारी करा , असेही आ विटेकर म्हणाले , जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात आल्या तर अडीच वर्षांनी होणाऱ्या मंत्री मंडळ बदलात आ राजेश विटेकर यांना मंत्री पद मागण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या कडे अभिमानाने जाता येईल व हक्कानी मंत्री पद मागता येईल असे शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख यांनी म्हटले,
यावेळी चंद्रकांत राठोड, एकनाथ साळवे, नानासाहेब राऊत, भावना ताई नखाते, प्रताप देशमुख यांनी पक्ष वाढीसाठी प्रत्यक्षात काम करणाऱ्यानाच पदे व निधी द्या असे आपले मनोगत व्यक्त केले या बैठकीस मराठवाडा समन्वयक आ विक्रम काळे यांनी मोबाईल वरून भाषण केले 10 जून रोजी बालेवाडी पुणे येथे होणाऱ्या पक्षाच्या वर्धापन दिनाच्या दिवशी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने यावे असे आवाहन त्यांनी केले
या कार्यक्रमास, दादासाहेब टेंगेसे, अनिल नखाते ,भावनाताई नखाते , वसंत काका शिरसकर, नंदाताई राठोड, लक्ष्मीकांत देशमुख, दत्ता जाधव, संजय कदम, पंकज आंबेगावकर, माधवराव भोसले, दसरथ सूर्यवंशी, किरण तळेकर, रोहन सामाले, सुनील गोळेगावकर , अक्षय देशमुख , जयश्रीताई खोबे , माधवराव जोगदंड, अप्पासाहेब पवार, पी आर जाधव, रामेश्वर आवरगंड, , यांच्यासह जिल्ह्यातील जवळपास दोन ते अडीच हजार प्रमुख पदाधिकारी नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते