Author: Lok Sanchar

सोनपेठ, (प्रतिनिधी) देशात वाढती महागाईने कहर केला असून शेती मालाला भाव नाहीत, शेतकरी कष्टकरी सर्वसामान्य नागरिक हे विद्यमान केंद्र व राज्य सरकारच्या जुलमी राजवटीला कंटाळलेले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याचा मानस परभणीचे निष्ठावंत आमदार डॉ राहुल पाटील यांनी व्यक्त केला. तसेच परभणी जिल्हा भगवामय करू असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. परभणी जिल्ह्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली होती. त्यानिमित्ताने विटा ता. सोनपेठ येथे नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा अधिक मासा निमित्त धोंडे जेवणाचा कार्यक्रम रविवार दिनांक 17 रोजी पार पडला यावेळी आमदार डॉ राहुल पाटील बोलत होते. यावेळी…

Read More

परभणी (प्रतिनिधी) गेल्या काही वर्षांत वैद्यकीय क्षेत्रात एक अत्यंत चिंताजनक कल समोर आला आहे. पूर्वी केवळ ६०-७० वर्षांच्या व्यक्तींमध्ये आढळणारा हृदयविकार आता चाळीशीतच तरुणांना गाठत आहे. सिद्धार्थ शुक्ला, पुनीत राजकुमार आणि गायक केके यांसारख्या फिट सेलिब्रिटींच्या अकस्मात निधनाने हा धोका अधिक स्पष्ट झाला आहे.या पार्श्वभूमीवर, आ.डॉ. राहुल पाटील यांच्या पुढाकारातून परभणीतील आर.पी. हॉस्पिटलने अवघ्या ३०० रुपयांत TMT (ट्रेडमिल टेस्ट) उपलब्ध करून दिली आहे. ‘कार्डिओ मेटाबॉलिक इन्स्टिट्यूट’च्या आकडेवारीनुसार, हृदयविकाराच्या एकूण रुग्णांपैकी २० टक्के रुग्ण ४० वर्षांखालील आहेत. बदलेली जीवनशैली, कामाचा ताण, अपुरी झोप, जंक फूड आणि व्यायामाचा अभाव यामुळे अनेकदा वरून तंदुरुस्त दिसणाऱ्या व्यक्तींनाही अचानक हृदयविकाराचा झटका येतो. याचे मुख्य कारण म्हणजे…

Read More

परभणी (प्रतिनिधी) पोलीस स्टेशन नानलपेठ यांच्या हद्दीत बेवारस स्थितीत मिळून आलेल्या व डिटेन करण्यात आलेल्या एकूण २४ दुचाकी मोटारसायकल वाहनांच्या जाहीर लिलावास तालुका दंडाधिकारी, तहसील कार्यालय परभणी यांच्याकडून परवानगी प्राप्त झाली आहे. सदर बेवारस दुचाकी वाहनांचा जाहीर लिलाव तालुका दंडाधिकारी परभणी, उपविभागीय पोलीस अधिकारी परभणी शहर तसेच उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या उपस्थितीत घेण्यात येणार आहे. या अनुषंगाने नागरिकांना कळविण्यात येते की, सदर वाहनांचा जाहीर लिलाव दि. २८ मे २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता पोलीस स्टेशन नानलपेठ येथे आयोजित करण्यात आला आहे. *-*-*-*-*

Read More

परभणी( प्रतिनिधी) ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार मुंदडा यांचे अपघाती मृत्यु प्रकरणात जलद गतीने तपास करून परभणी शहरातील वसमत रस्त्यावरील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी परभणीतील सर्व पत्रकारांनी पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे. परभणीतील ज्येष्ठ पत्रकार श्री विजयकुमार मुंदडा यांचा दिनांक पाच मे रोजी वसमत रोडवर श्री शिवाजी विधी महाविद्यालय समोरील गोल्डन बेकरी परिसरात अपघातात मृत्यू झाला. या दुचाकी चालकांनी भरधाव व निष्काळजीपणाने दुचाकी चालवून मुंदडा यांना जोराची धडक दिली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणात नवा मोंढा पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे. परंतु या घटनेचा योग्य रीतीने तपास होत नसल्याचे निदर्शनास आले…

Read More

परभणी ( प्रतिनिधी ) अखिल लोककला सांस्कृतिक संघटना, पुणे यांच्या वतीने आगामी १६ मे ते २२ मे २०२६ या कालावधीत ‘भारत उत्सव २०२६’ या भव्य राज्यस्तरीय/राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय लोककला आणि सांस्कृतिक वारशाचे जतन करण्याच्या उद्देशाने आयोजित या उत्सवात विविध कलागुणांचे दर्शन घडणार आहे. ​या महोत्सवांतर्गत प्रामुख्याने लोकनृत्य (Folk Dance) आणि एकांकिका (One-act Play) या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांच्या परीक्षणासाठी तज्ज्ञ परीक्षक म्हणून डॉ. पंकज खेडकर यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणांहून आलेले कलाकार आपली कला सादर करतील. ​अखिल लोककला सांस्कृतिक संघटनेचे सरचिटणीस डॉ. प्रमोद ननवरे यांनी निवडीचे पत्र पाठवले आहे.

Read More

परभणी (प्रतिनिधी) येथील ज्येष्ठ पत्रकार व दैनिक सांज वृत्तचे संपादक श्री विजयकुमार मुंदडा वय (६२) यांचे काल मंगळवारी सायंकाळच्या सुमारास अपघाती निधन झाले. यांच्या वर आज बुधवार दि 6 रोजी गंगाखेड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. शहरातील वसमत रस्त्यावरील श्री शिवाजी विधी महाविद्यालयासमोरील हॉटेल ओमकारेश्वर समोरील रस्ता ओलांडत असताना काल मंगळवार दि. ५ मे रोजी सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास भरधाव वेगातील दुचाकीने गाडी क्र. (एम. एच. २२ ए. एच. ३४५८) या गाडीने त्यांना धडक दिली. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सून जावई नातवंडे असा परिवार आहे. ते दैनिक सांज पालम वृत्तचे संस्थापक संपादक होते. दैनिक…

Read More

परभणी (प्रतिनिधी) :महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम, 1961 मध्ये सुधारणा करण्यासाठी सन 2026 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 17 दिनांक 15 एप्रिल 2026 रोजी राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अधिनियमातील कलम 10-1 अ(4) आणि कलम 59 अ (4) मधील तरतुदींनुसार, जिल्हा परिषद व पंचायत समितीमधील नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती करताना मान्यताप्राप्त पक्षांचे किंवा नोंदणीकृत पक्षांचे किंवा गटांचे तौलनिक संख्याबळ विचारात घेणे आवश्यक आहे. या तौलनिक संख्याबळाचा निर्णय घेण्याच्या प्रयोजनासाठी, मान्यताप्राप्त पक्ष, नोंदणीकृत पक्ष, गट किंवा अशा कोणत्याही पक्षाच्या किंवा गटाच्या नसलेल्या निर्वाचित सदस्यांस निवडणूक निकालांच्या अधिसूचनेच्या दिनांकापासून 3 महिन्यांच्या आत ‘आघाडी’ तयार करता येईल. या आघाडीची नोंदणी झाल्यावर तिला…

Read More

परभणी/( प्रतिनिधी)परभणी जिल्हा गुरव समाजाच्या वतीने शहरातील वसमत मार्गावरील सारंग स्वामी विद्यालयात गुरुवार, दि. 7 मे रोजी वधू-वर परिचय मेळावा तसेच मौंजी (उपनयन संस्कार) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाची सुरुवात गुरव समाजाचे आराध्य दैवत श्री संत काशिबा महाराज गुरव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात येणार आहे. सकाळी 08.35 वा. संत काशिबा महाराज प्रतिमा पूजन, सकाळी 9 वा. बटू मिरवणूक व मातृभोजन, सकाळी 10.42 वा. सामूहिक मौंजी मंगलाष्टक, दुपारी 12.25 वा. वधू-वर परिचय मेळावा व मान्यवरांचा सत्कार, दुपारी 1 वाजता सुरूची भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर, ह.भ.प. अच्युत महाराज…

Read More

परभणी,(प्रतिनिधी) : पुणे जिह्यातील नरसापूर येथील तीन वर्षीय चिमुकलीवर एका नराधमाने केलेल्या अमानुष अत्याचारासह निर्घृण हत्येच्या प्रकरणात राज्य सरकारने संबंधित नराधमा विरोधात न्यायालयासमोर भक्कम साक्ष पुराव्यासह खटला उभा करीत फासावर लटकवावे, अशी मागणी समस्त परभणीकरांनी सोमवारी (दि.04) जिल्हा प्रशासनास सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली. 1 मे रोजी दुपारी नरसापूरातील तीन वर्षीय चिमुकलीस गायीचे वासरु दाखवायचे का असे सांगून तीच्यावर अज्ञातस्थळी अमानुष पध्दतीने अत्याचार करीत तीची निर्घृण हत्या केली अन् मृतदेहाचीही विल्हेवाट लावली. या नराधमास सिसिटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिस प्रशासनाने ताब्यात घेतले. अन्यथा हा नराधम आणखीन सावध शोधत फिरत राहिला असता, असे मत समस्त परभणीकरांनी जिल्हा प्रशासनामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून नमूद करीत…

Read More

परभणी( प्रतिनिधी) परभणी महानगरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने पश्चिम बंगाल, आसाम आणि पुदुच्चेरी या राज्यांमध्ये मिळालेल्या उल्लेखनीय यशाच्या पार्श्वभूमीवर भव्य आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या विजयामुळे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला असून शहरभर आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर पक्षाचे जिल्हाध्यक्ष, नगरसेवक, तसेच प्रदेश व जिल्हा स्तरावरील पदाधिकारी उपस्थित होते. विविध आघाड्या व प्रकोष्ठांचे पदाधिकारीही उत्साहात सहभागी झाले. यात युवा मोर्चा, महिला मोर्चा, अनुसूचित जाती-जमाती, ओबीसी, अल्पसंख्याक, किसान मोर्चा तसेच कायदा, प्रज्ञा, वैद्यकीय, शिक्षक, शिक्षण संस्था, भटके-विमुक्त, अपंग विकास, ज्येष्ठ कार्यकर्ते, झोपडपट्टी सेल, कामगार, व्यापारी, सहकार, सांस्कृतिक, उद्योग, आध्यात्मिक, जैन, बेटी बचाओ-बेटी पढाओ, माजी सैनिक, पंचायतराज, ट्रान्सपोर्ट…

Read More