Author: Lok Sanchar

परभणी (प्रतिनिधी ) परभणी जिल्ह्यातील पिकांची अवस्था बिकट होत असल्याने पैठण डावा कालवा व माजलगाव उजवा कालवा वरील कॅनॉलमध्ये पाणी सोडण्यात यावे अशी मागणी आमदार राजेश विटेकर यांनी काल विधानसभेत पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन च्या द्वारे केली होती, त्यास जलसंपदा मंत्री  राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्या सकाळीच कालवा सल्लागार समितीची बैठक घेऊन पाणी सोडण्याबाबत निर्देश देण्यात येतील असे सांगितले होते, त्याप्रमाणे सकाळी साडेदहा वाजता विधान भवन कक्षात बैठक झाली, त्यात जलसंपदा मंत्री विखे पाटील यांनी उद्यापासूनच पैठण डावा कालवा व माजलगाव उजवा कालव्या पाणी सोडण्यात यावे , शेतकऱ्यांची पिके जगविण्यासाठी तात्काळ कारवाई करण्यात यावी असे निर्देश उपस्थित अधिकाऱ्यांना दिले त्याप्रमाणे पैठण…

Read More

परभणी (प्रतिनिधी) परभणी तालुक्यातील उखळद येथील ह भ प जगन्नाथ महाराज हेंडगे यांचा खून करणाऱ्या संस्थाचालकाला अटक करा अशी मागणी आ.डॉ.राहुल पाटील यांनी विधानसभेत करताच विधानसभा अध्यक्षांनी हा प्रकार गंभीर असून यावर तात्काळ शासनाने निवेदन सादर करावे अशा सूचना दिल्या आहेत. परभणी तालुक्यातील उखळद येथील ह भ प जगन्नाथ महाराज हेंडगे हे झिरो फाटा येथील हायटेक निवासी विद्यालयात मुलीची टी.सी. आणण्यासाठी गेले असता तेथे त्यांना संस्थाचालक प्रभाकर चव्हाण आणि त्याची पत्नी रत्नमाला चव्हाण या दोघांनी अमानुषपणे मारहाण केली यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला या प्रकरणात पूर्णा पोलीस ठाण्यात संस्थाचालक पती-पत्नीवर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. तेव्हापासून दोन्ही आरोपी फरार आहेत…

Read More

परभणी : उखळद, ता.जि. परभणी येथील स्व. ह.भ.प. भागवताचार्य जगन्नाथ महाराज हेंडगे उर्फ पिंटू महाराज यांच्यावर झालेल्या अमानुष मारहाणीत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना अत्यंत वेदनादायी आणि मन हेलावून टाकणारी असून, संपूर्ण समाजमनाला हादरवून टाकणारी आहे. या अमानुष घटनेचा तीव्र निषेध नोंदविण्यासाठी आज परभणी शहरात निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदवला. घटनेने व्यथित झालेल्या पीडित कुटुंबाच्या दुःखात सहभागी होत भारतीय जनता पार्टी परभणी महानगरचे जिल्हाध्यक्ष श्री. शिवाजी भरोसे यांनी पुढाकार घेत दोन लाख रुपयांची आर्थिक मदत केली. या मदतीने कुटुंबाला थोडासा आधार मिळेल, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली. शिवाजी भरोसे यांनी या प्रसंगी सांगितले…

Read More

परभणी (परभणी) परभणी जिल्ह्यातील दुष्काळ सदृष्य परिस्थिती पाहता कार्यकारी अभियंता जायकवाडी पाटबंधारे विभाग दोन यांना जायकवाडी डाव्या कालव्या मार्फत शेतीसाठी पाणी सोडावे असे निवेदन युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल जाधव व शिष्ट मंडळाने केले. सदरील निवेदना मध्ये सांगितले आहे कि, परभणी जिल्हात बहुतांश ठिकाणी खरिपाच्या पेरण्या झालेल्या आहेत, परंतु मागण्चा ऐक महिण्यापासुन पावसाने दांडी मारल्यामुळे पिकांचे पाण्यावाचुन आतोनात नुकसान होत आहे, खात्यातील पिकांचे व बागायतीचे नुकसान थांबवण्यासाठी पाण्याची अत्यंत गरज पाहता आपण जायकवाडी डाव्या कालव्या मार्फत शेतीच्या पाण्यासाठी आवर्तन सोडुन शेतकऱ्यांना नैसगिक संकटातुन बाहेर काढावे.अशी मागणी केली आहे सदरील निवेदन देताना युवक जिल्हा अध्यक्ष अमोल जाधव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती…

Read More

*पैठण डावा कालवा व माजलगाव उजव्या कालव्यातून खरीप पिकांसाठी तत्काळ पाणी आवर्तन सोडणे साठी शासन अनुकूल , तात्काळ बोलावली बैठक परभणी( प्रतिनिधी). परभणी जिल्ह्यात पावसाने ताण दिल्याने पिकांची स्थिती चिंताजनक होत असल्याने जायकवाडी धरणा मधून पाणी सोडण्यात यावे अशी मागणी आ राजेश विटेकर यांनी आज ( दि १४ जुलै) विधानसभेत पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन या आयुधांद्वारे केली त्याची दखल घेत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्याच सकाळी कालवा सल्लागार समिती ची बैठक घेऊन त्यात पाणी सोडण्या बाबतचा निर्णय घेण्यात येईल असे सभागृहात जाहीर केले आ राजेश विटेकर म्हणाले की, सध्या पावसात पडलेल्या खंडामुळे पाथरी मतदारसंघ व संपूर्ण परभणी जिल्ह्यातील शेतीची…

Read More

हेंडगे कुटुंबाला 50 लाखांची आर्थिक मदत करावी परभणी: (प्रतिनिधी) येथील पूर्णा तालुक्यातील हट्ट्या जवळील हाय टेक निवासी शाळेतील मुजोर संस्था चालक प्रभाकर चव्हाण यांना कडक शासन व्हावे. पीडित हेंडगे कुटुंबाला 50 लाखांची आर्थिक मदत द्यावी. आरोपींचे सर्व बँक खाते फ्रीज करण्यात यावे. महाराष्ट्रातील कोणत्याही शैक्षणिक संस्थेकडून फीसमुळे विद्यार्थ्यांची कागदपत्रांची आडून होऊ नये यासाठी मुख्यमंत्री साहेबांनी तसेच शिक्षण मंत्र्यांनी उपाययोजना कराव्यात. परभणी जिल्ह्यात देखील इतर कॉलेज कडून टि.सी. साठी विद्यार्थ्याना मानसिक त्रास दिला जातो असा आरोप विद्यार्थी नेते सिद्धार्थ पानबुडे यांनी केला आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक संस्थेकडून कोणत्याही कारणामुळे कागदपत्रांची अडवणूक करू नये अन्यथा आज पालकाला जीव गमवावा लागला उद्या विद्यार्थी या…

Read More

*रुग्णांना आरोग्य विभागामार्फत उत्तम सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार* परभणी (प्रतिनिधी): हिमोफेलिया आजारावरील हेमलिब्रा इंजेक्शन आपल्या जिल्ह्यात उपलब्ध झाल्याने हिमोफेलीया रुग्णांना उपचारासाठी जिल्ह्याच्या बाहेर जाण्याची गरज भासणार नाही. येणाऱ्या काळात रुग्णांना आरोग्य विभागामार्फत उत्तम सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य कुटुंब-कल्याण, पाणी पुरवठा-स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केले. जिल्हा सामान्य रुग्णालयात आज पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते हिमोफेलीया रुग्णांसाठीच्या “हेमलिब्रा इंजेक्शन”चे लोकार्पण पार पडले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सारिका बडे, हिमोग्लोबिनोपॅथीचे…

Read More

पुणे (प्रतिनिधी) प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही ‘जागृती महिला व बालकल्याण संस्थेच्या’ वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ गुरूवार दिनांक २४ जुलै २०२५ रोज सायंकाळी ०५.३० ते ०८.०० ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाटयगृह’ , पुणे-सातारा रोड, बिबवेवाडी, पुणे. येथे आयोजित केला आहे. यावेळी सन् २०२४-२०२५ या शैक्षणिक वर्षातील इयत्ता दहावी (१० वी) आणि बारावी (१२ वी) च्या जाहीर निकाल पत्रात ८० % च्या वर गुण मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. तसेच, यावेळी शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांचे बहुमोल मार्गदर्शन लाभणार आहे. तरी, ज्या विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावी मध्ये सन् २०२४-२०२५ या शैक्षणिक वर्षीच्या जाहीर झालेल्या निकाला नुसार ८०% च्या वर…

Read More

परभणी (प्रतिनिधी) विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम करावे, आपला विकास साधावा आणि सर्व स्वप्न साकार करावी. पालकांनी देखील विद्यार्थी स्पर्धेच्या युगात पुढे जावा, टिकावा यासाठी प्रयत्न करावेत व विद्यार्थ्यांच्या आवडीप्रमाणे अभ्यासक्रमाची निवड करू द्यावी.विद्यार्थ्यांनी शालेय व महाविद्यालयीन जीवनात वेळेचा सदुपयोग करून सोशल मिडियातील विचलित करणाऱ्या मोहापासून दूर राहण्याचे तसेच शिस्तीचे पालन करून जीवन समृद्ध करावे.* असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नतिशा माथूर यांनी गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ प्रसंगी केले. बाल विद्यामंदिर शिक्षण संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थचे अध्यक्ष माननीय डॉ. एन. ए. झरकर,तर प्रमुख पाहुणे म्हणून परभणी जि. प.…

Read More

परभणी (प्रतिनिधी) दरवर्षी प्रमाणे याही वर्षी वैभव नगर शाखेत गुरुपौर्णिमेचे आयोजन इ 8 वी जी या वर्गातर्फे करण्यात आले होते.व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रशालेचे पर्यवेक्षक  प्रदिप रुघे तर प्रमुख अतिथी म्हणून उखळकर  सर होते. प्रथम माता सरस्वती आणि व्यास ऋषीमुनी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, व्यासपीठा वर उपस्थित असलेल्या सर्व शिक्षकवृंद यांचे औक्षण करून गुरुप्रती आदराची भावना म्हणून पुष्प आणि श्रीफळ देऊन विध्यार्थ्या तर्फे शिक्षकांचा गौरव करण्यात आला.वर्गातील पुष्कळ विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून आणि भित्ती पत्रकातून आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे अतिथी श्री उखळकर सर यांनी पौरांनीक गोष्टींचा उल्लेख करून गुरुशिष्य परंपरा किती मोठी आहे हे विशद केले तर प्रदिप रुघे…

Read More