व्हॉईस ऑफ मीडियाची परभणी जिल्हा कार्यकारिणी जाहीर परभणी,(प्रतिनिधी) पत्रकारांच्या हक्कासाठी, सन्मानासाठी आणि सर्वांगीण कल्याणासाठी कार्यरत असलेल्या व्हॉईस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरम (व्ही ओ एम) या आंतरराष्ट्रीय संघटनेची परभणी जिल्हा कार्यकारिणी जाहीर झाली आहे. जिल्हाध्यक्षपदी कैलास चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली असून ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणून बालासाहेब काळे आणि गणेश पाटील यांची निवड करण्यात आली आहे. अवघ्या पाच वर्षात जगातील तब्बल 78 देशात विस्तारलेल्या या संघटनेच्या जिल्हा कार्यकारिणी निवडीसाठी राज्याचे कार्याध्यक्ष विजय चोरडिया यांच्या उपस्थित बुधवार (दि.15) परभणीत बैठक झाली. या बैठकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राज्याचे सहसरचिटणीस सुरज कदम यांनी काम पाहिले. यावेळी राज्य सहसंघटक विजय पाटील,मराठवाडा कार्यकारीणी सदस्य विशाल माने,…
Author: Lok Sanchar
परभणी ( प्रतिनिधी) भारतीय बौध्द महासभा जिल्हा शाखा परभणीच्या वतीने परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भारतरत्न डाॕ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर 135 व्या जयंतीनिमीत्त कार्यक्रमाचे आयोजन सकाळी 09:00 वाजता करण्यात आले होते. सुरुवातीस डाॕ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार जिल्हाध्यक्ष डॉ. एम. एम. भरणे, जिल्हाधिकारी संजयसिंग चव्हाण यांच्या हस्ते अर्पन करुन पंचरंगी धम्मध्वजाचे ध्वजारोहन करण्यात आले. समता सैनिक दलाच्या वतीने आनंदा भेरजे यांनी मानवंदना दिली. भिक्कु संघाच्या वतीने भंते पि. धम्मानंदजी यांनी ञिसरण पंचशील दिले. कार्यक्रमास भारतीय बौध्द महासभेचे महाराष्ट्र राज्य सचिव बाबासाहेब धबाले, जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण , आमदार राहुल पाटील महापौर सय्यद इकबाल यांच्यासह जेष्ठ नेते बी. एच. सहजराव, व्ही.…
परभणी,(प्रतिनिधी) : परभणी जिल्ह्याचे भूमीपुत्र रामराव वडकुते यांची राज्यसभा सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल परभणीकरांच्या वतीने येत्या रविवारी 12 एप्रिल रोजी परभणीत भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती नागरी सत्कार समितीच्या पदाधिकार्यांनी शनिवार 4 एप्रिल रोजी एका पत्रकार परिषदेतून दिली. माजी उपमहापौर भगवानराव वाघमारे, अॅड. स्वराजसिंह परिहार, किर्तीकुमार बुरांडे, राजेंद्र वडकर यांच्यासह अन्य नेतेमंडळींनी शनिवारी आयोजित केलेल्या या पत्रकार परिषदेतून खासदार वडकुते यांची राज्य सभेवरील निवड ही परभणीकरांच्या दृष्टीने सार्थ अभिमानाची बाब आहे, असे नमूद केले. आपल्या माणसाचा आपल्याच माणसांनी गौरव केला पाहिजे, या भावनेतून समस्त परभणीकरांच्या वतीने 12 एप्रिल रोजी रविवारी एमआयडीसीतील हॉली डे फन पार्कच्या…
परभणी (प्रतिनिधी) काँग्रेस पक्षाच्या ‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत परभणी जिल्ह्यात संघटनात्मक पुनर्रचनेला वेग देण्यात आला असून, या पार्श्वभूमीवर परभणी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने स्टेशन रोड येथील हॉटेल नीरज येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. पत्रकार परिषदेपूर्वी परभणी शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीचे प्रास्ताविक शहर जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार यांनी केले. बैठकीत केंद्रीय निरीक्षक अझमतुल्लाह हुसेनी यांनी ‘संघटन सृजन अभियान’ ची सविस्तर माहिती देत संघटन कसे बळकट करायचे, बूथ स्तरावर कामाची प्रभावी रचना कशी करायची आणि कार्यकर्त्यांनी सक्रिय भूमिका कशी निभवायची याबाबत मार्गदर्शन केले. या बैठकीत निरीक्षक मा. जितेंद्र देहाडे, मा. दादासाहेब मुंढे, माजी खासदार तुकाराम रेंगे…
. परभणी(प्रतिनिधी) : परभणी जिल्हा परिषदेवर अध्यक्षांपाठोपाठ चारही विषय समित्यांच्या सभापती पदी गुरुवारी महिला सदस्याच बिनविरोध विराजमान झाल्या आहेत. त्यामुळे या चार महिला सभापतींबरोबर अध्यक्ष तसेच प्रशासकीय यंत्रणेंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकार्यांसह अतिरिक्त कार्यकारी अधिकारीपदी सुध्दा महिला अधिकारी कार्यरत असल्यामुळेच जिल्हा परिषदेवर खर्याअर्थाने महिलाराज सुरु झाले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदी जिंतूर तालुक्यातील सावंगी म्हा. गटातील भारतीय जनता पार्टीच्या नवनिर्वाचित सदस्या लता वाकळे यांची बिनविरोध निवड झाली. त्या पाठोपाठ चार विषय समित्यांच्या सभापती पदाकरीता गुरुवार 2 एप्रिल रोजी आयोजित केलेल्या विशेष सभेतून महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पदी ऐश्वर्या अजय चव्हाण, समाज कल्याण समिती सभापती पदी पार्वती मुंढे, तर अन्य दोन…
नवी दिल्लीत करण्यात आला गौरवपूर्ण सन्मान परभणी, (प्रतिनिधी) : राज्याच्या ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक आरोग्य, पाणीपुरवठा व स्वच्छता आणि सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) विभागाच्या राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांना अमेरिकेतील यु.एस. इंडिया एसएमई कौन्सिल (U.S. India SME Council) तर्फे प्रदान करण्यात येणारा आउटस्टँडिंग व्हिजनरी लीडर अँड ट्रू चेंजमेकर (Outstanding Visionary Leader & True Changemaker) हा प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार बहाल करण्यात आला आहे. नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आज (दि. २५ मार्च २०२६) आयोजित भव्य समारंभात त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. या समारंभास अमेरिकेतील मेरीलँड राज्याचे काउंटी एक्झिक्युटिव्ह मार्क अर्लिख, आंध्र प्रदेशचे एमएसएमई (MSME) व एनआरआय…
परभणी ( प्रतिनिधी) जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार दरवर्षी जगभरात सुमारे सहा लाखांहून अधिक महिलांना गर्भाशय मुखाचा कर्करोग होतो आणि तीन लाखांपेक्षा जास्त महिलाचा मृत्यू या आजारामुळे होतो. भारतातही हा महिलांमध्ये आढळणाऱ्या प्रमुख कर्करोगांपैकी एक आहे. अनेक ग्रामीण भागामध्ये योग्य माहितीचा अभाव, लाज, भीती आणि गैरसमज यामुळे महिलांना वेळेवर तपासणी किंवा प्रतिबंधात्मक उपाय मिळत नाहीत. त्यामुळे अनेक वेळा हा आजार उशिरा निदान होतो आणि उपचार कठीण होतात. याच पार्श्वभूमीवर “एचपीव्ही लसीकरण” हे स्त्रियांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे पाऊल मानले जाते. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाने आठ मार्चपासून चौदा वर्षे ते पंधरा वर्षाच्या आतील वयोगटातील मुलींना एचपीव्ही लसीकरण देण्याची मोहीम सुरू…
परभणी ( प्रतिनिधी) शहर महानगरपालिकेच्या वतीने शहर फिरण-र्या मोकाट श्वानांना प्रतिबंद करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. त्या अंतर्गत नियुक्त करण्यात आलेल्या पथकांनी आतापर्यंत एकुण 26 मोकाट श्वांन जेरबंद करून त्यांच्यावर कार्यवाही केली. परभणी शहर महानगरपालिकेने कोंडवाडा विभागार्तंगत मोकाट श्वानांना पकडण्यासाठी तीन पथकांची नियुक्ती केली आहे. काल मा. महापौर सय्यद इकबाल व उपमहापौर गणेश देशमुख, आयुक्त नितिनजी नार्वेकर यांनी सदर पथकाच्या गाडीस हिरवी झेंडी दाखवून या मोहीमेचा शुभारंभ केला होता. त्यांचा पहिल्याच दिवशी आठ श्वानांना जेरबंद केले तर आज दि. 17 मार्च रोजी 18 श्वानांना पकडून कारवाही करण्यात आली. या पकडलेल्या श्वानांची नसबंदी करून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच…
महाभारत संदेश कथेने वातावरण चैतन्यमय सेलू ( प्रतिनिधी) आपले प्रत्येक कर्म भगवंताची पूजा असावी. २४ तास केली जाणारी कर्म निष्काम, शुद्ध असावीत. कारण निष्काम कर्म सेवा हीच खरी पूजा आहे. असे प्रतिपादन राष्ट्रसंत स्वामी गोविंद गिरीजी महाराज यांनी महाभारत संदेश कथेचे समारोपीय सहावे पुष्प गुंफताना मंगळवार ( दि. १७ ) रोजी केले. अलंकापुरी नगरीत फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळ्यात पुढे बोलताना स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज म्हणाले की, ” पांडवांचा राज्याभिषेक म्हणजे शाश्वत जीवन मूल्यांची प्रस्थापना आहे. माणसाचं जीवन हा एक संघर्ष आहे. या संघर्षाला कसे हाताळावे याचा उत्तम ग्रंथ म्हणजे महाभारत हा ग्रंथ आहे. ज्यांना माणसांचे गुणा अवगुण कळतात तीच…
परभणी,(प्रतिनिधी) : जागतिक महिला दिनानिमित्त आयुर्वेद व्यासपीठ परभणीच्या वतीने निरामय योग केंद्र, परभणी येथे विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात संभाजीनगर येथील प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. दिपाली देशमुख यांनी ‘महिलांचे मानसिक आरोग्य’ या विषयावर मार्गदर्शन केले. महिलांनी दैनंदिन जीवनातील ताणतणाव कसा हाताळावा, मानसिक आरोग्य कसे जपावे याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. यावेळी अॅड. मंजुषा बागल यांनी ‘सायबर क्राईम’ या विषयावर मार्गदर्शन करत महिलांनी सोशल मीडियाचा वापर करताना घ्यावयाची काळजी, ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी तसेच कायदेशीर उपाययोजना याबाबत माहिती दिली. या कार्यक्रमाला परभणी शहरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयुर्वेद व्यासपीठ परभणीचे अध्यक्ष विनोद पत्की, उपाध्यक्ष…

