परभणी ( प्रतिनिधी) आज भारत मुक्ती मोर्चा आणि राष्ट्रीय पिछडा वर्ग OBC मोर्चा यांच्या वतीने संपूर्ण देशभर OBC समाजाची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी आणि UGC कायद्याच्या समर्थनार्थ धरणे आंदोलन व निवेदन देण्यात आले. देशातील OBC समाजाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात न्याय मिळावा, शैक्षणिक व सामाजिक हक्कांचे योग्य प्रतिनिधित्व मिळावे यासाठी जातीनिहाय जनगणना अत्यंत आवश्यक आहे. तसेच शिक्षण क्षेत्रातील समानता व हक्क अबाधित राहावेत यासाठी UGC कायद्याचे संरक्षण व समर्थन करणे गरजेचे आहे. याच मागण्यांसाठी आज देशभरातील विविध जिल्ह्यांमध्ये आंदोलन करून शासनाला निवेदन देण्यात आले. समाजाच्या हक्कांसाठी सुरू असलेली ही लढाई पुढेही तीव्र स्वरूपात सुरू राहील. यावेळी ॲड विनोद अंभोरे, जी एस…
Author: Lok Sanchar
परभणी ( प्रतिनिधी) अनु जाती उप वर्गीकरण संदर्भात शासनाकडे आलेला बदर समितीचा अहवाल शासनाने तत्काळ लागू करू नये या मागणीचे निवेदन आज परभणी जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील पक्ष संघटनाच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना दिले आहे. राज्य शासनाने अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणासाठी नियुक्त केलेल्या न्यायमूर्ती अनंत बदर समितीचा अहवाल आणि त्याची अंमलबजावणी सध्या स्थगित ठेवण्यात यावी. सर्वोच्च न्यायालयाच्या अलीकडील निकालानुसार उपवर्गीकरणासाठी काही कठोर अटी घालण्यात आल्या आहेत, ज्यांची पूर्तता झाल्याशिवाय हा निर्णय घेणे अन्यायकारक ठरेल. म्हणून इंपिरीअल (Empirical) डेटाचा अभाव: सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, उपवर्गीकरण करण्यासाठी राज्याकडे प्रत्येक पोटजातीचे सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण सिद्ध करणारा वस्तुनिष्ठ आणि अद्ययावत सांख्यिकीय…
*- ग्रंथदिंडीला वाचकप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद* *- पुस्तक खरेदीसाठी गर्दी* *- 17 मार्चला ग्रंथोत्सवाचा समारोप* परभणी, (प्रतिनिधी) – शरीराला निरोगी ठेवण्यासाठी जसे रक्त अत्यावश्यक असते, तसेच मेंदूला चैतन्यशील ठेवण्यासाठी ग्रंथांची साथ आवश्यक असते. वाचनामुळे विचारांना दिशा मिळते, ज्ञानाची कक्षा विस्तारते आणि व्यक्तिमत्त्व समृद्ध होते. त्यामुळे प्रत्येकाने नियमित वाचनाची सवय लावणे ही आजच्या काळाची मोठी गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी ग्रंथोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी केले. तर, काळानुसार नवे तंत्रज्ञान येतच राहणार; मात्र त्या बदलत्या वातावरणातही वाचनाचे महत्त्व कधीही कमी होणार नाही. कारण वाचन माणसाला विचारांनी समृद्ध करते, ज्ञानाची दारे उघडते आणि व्यक्तिमत्त्वाला उंची देते. समाजात वाचन संस्कृती दृढ करण्यासाठी ग्रंथोत्सवासारखे…
अन्न सुरक्षा कायद्याच्या अंमलबजावणीचा घेतला सविस्तर आढावा परभणी, (प्रतिनिधी) : राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे व सदस्य सुभाष राऊत यांनी अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात आज आयोजित बैठकीत घेतला. बैठकीस जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, अप्पर जिल्हाधिकारी तथा तक्रार निवारण अधिकारी शोभा जाधव, जिल्हा पुरवठा अधिकारी विलास मुसळे, तालुक्यातील पुरवठा निरीक्षक उपस्थित होते. बैठकीत सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत लाभार्थ्यांना वितरित करण्यात येणाऱ्या धान्याचा पुरवठा, रेशन दुकानदारांकडून होणारे वितरण, लाभार्थ्यांची नोंदणी तसेच अन्न सुरक्षा योजनांचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने पोहोचत आहे का याबाबत सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी अन्नधान्य वितरण प्रक्रियेत येणाऱ्या…
दोन दिवसीय कृषी महात्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन* परभणी, (प्रतिनिधी) : भारताची अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेतीवर आधारित असून ग्रामीण भागाच्या विकासात शेतीची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. बदलत्या काळानुसार शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत आधुनिक पद्धती, तंत्रज्ञान व शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत शेती अधिक उत्पन्नक्षम बनवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष 2026 तसेच अन्न आणि पोषण सुरक्षा पौष्टिक तृणधान्य 2026 निमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील वैद्यनाथ वसतिगृह शेजारील मैदानात आयोजित जिल्हास्तरीय कृषि महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी श्री. चव्हाण बोलत होते. यावेळी वसंतराव नाईक…
परभणी, (प्रतिनिधी) आगामी रमजान ईद, गुढीपाडवा, रामनवमी, महावीर जयंती हे सण-उत्सव जिल्हयातील नागरिकांनी आनंदात व उत्साहात साजरे करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले. सण-उत्सावाच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हा शांतता समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. त्यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी बोलत होते. बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, मनपा आयुक्त नितीन नार्वेकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथूर, उपविभागीय पोलीस अधिकारी जीवन बेनीवाल, संबंधित विभागांचे प्रमुख, समितीचे सदस्य उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. चव्हाण म्हणाले की, अलीकडे हिंदू व मुस्लिम समाजाचे अनेक सण एकत्र येताना दिसत आहेत, हे एक प्रकारे एकात्मतेचे प्रतिकच म्हणावे लागेल. अशावेळी समाजबांधवांनी एकीने शांततेत सण साजरे…
सेलू: (प्रतिनिधी) जगात सद्गुरू बद्दल सर्वांचे एकमत आहे. पण सुख शोधण्याची जागा चुकली आहे. माणसे बाहेर सुख शोधत आहेत. पण सुख आपल्यापाशीच आहे. तेव्हा आपली सुप्त शक्ती जागृत करा. आपल्यातील सुखाचा शोध घ्या. देवाकडे ऐश्वर्य, सत्ता, औदार्य हे तिनही गुण आहेत.जो विठ्ठलाला शरण जातो त्याला काहीही कमी पडत नाही. गतीला योग्य दिशा असेल तरच प्रगती होते. असे प्रतिपादन संतवीर श्रीगुरू बंडा तात्या कराडकर यांनी केले. शहरातील अलंकापुरीनगरीत आयोजित फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळ्यानिमित्त आयोजित किर्तनात शुक्रवार ( दि.१३ ) रोजी ते बोलत होते. यावेळी त्यांनी जगद्गुरु तुकोबारायांच्या ‘ काय उणे आम्हा विठोबाचे पाय’ या अभंगावर निरूपण केले. बंडा तात्या पुढे…
परभणी,( प्रतिनिधी) परभणी महापालिकेचे शासनाकडे थकीत जीएसटीचे 73 कोटी 71 लाख रुपयांच्या अनुदानाचा प्रस्ताव दोन दिवसात मंत्रिमंडळ बैठकीत ठेवून त्याला मंजुरी देणार असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली आहे. आमदार डॉ. राहुल पाटील यांनी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गुरुवारी लक्षवेधी उपस्थित करत जीएसटीचे थकीत अनुदान देण्याची मागणी केली होती. परभणी महापालिकेच्या जीएसटी अनुदानाचा मुद्दा आमदार डॉ.राहुल पाटील यांनी सभागृहात आक्रमकपणे लावून धरला. मनपाची स्थिती अत्यंत बिकट झालेली आहे येथील आयुक्तांसह सर्व कर्मचाऱ्यांचे मागील पाच ते सहा महिन्यांचे वेतन थकीत आहे. कोणत्याही प्रकारचे उत्पन्नाचे साधन नाही, त्यामुळे परभणी मनपाला आर्थिक संकटातून जावे लागत आहे महानगरपालिकेची स्थापना झाली तेव्हा एलबीटी ही…
परभणी ( प्रतिनिधी)परभणी जिल्ह्यातील अधिकाºयांची रिक्त पदे भरून दप्तर दिरंगाई कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी. त्यासोबतच जिल्हा परिषद शाळांना बांधकामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार डॉ.राहुल पाटील यांनी केली. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात परभणी जिल्ह्यातील विविध प्रश्न आमदार डॉ. पाटील यांनी सभागृहात मांडले. यावेळी बोलताना आ. पाटील म्हणाले, परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अधिकारी, कर्मचाºयांची पदे रिक्त आहेत. अनेक चांगले अधिकारी ४ ते ६ महिन्यात बदलले जात आहेत. स्थानिक मंत्र्यांच्या मर्जीनुसार कामे न झाल्यास अधिकारी बदलले जात असल्याचा आरोप आ.पाटील यांनी केला. त्यामुळे तातडीने परभणी जिल्ह्यातील अधिकाºयांची रिक्त पदे तात्काळ भरावीत. रिक्त पदांमुळे शासन स्तरावर मोठ्या प्रमाणात नागरिकांची कामे खोळंबली आहेत.…
कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी डॉ. कौसडीकर यांचे केले अभिनंदन परभणी ( प्रतिनिधी) नवी दिल्ली येथील भारतीय कृषि संशोधन परिषद (ICAR- Indian Council of Agricultural Research), या देशातील सर्वोच्च कृषि संशोधन संस्थेच्या जनरल बॉडीवर वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील मृद विज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. हरिहर कृष्णराव कौसडीकर यांची शास्त्रज्ञ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा कार्यकाळ ९ मार्च २०२६ ते ८ मार्च २०२९ असा तीन वर्षांचा राहणार आहे. भारतीय कृषि संशोधन परिषद (ICAR) सोसायटीची जनरल बॉडी ही परिषदेची सर्वोच्च संस्था असून तिचे अध्यक्ष केंद्रीय कृषि व शेतकरी कल्याण मंत्री असतात. या संस्थेमध्ये उच्चपदस्थ सरकारी अधिकारी, नामवंत शास्त्रज्ञ तसेच…

