Author: Lok Sanchar

परभणी,(प्रतिनिधी) : परभणी जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने खेळाडू आयोग (अ‍ॅथलीट्स कमिशन) स्थापनेच्या प्रक्रियेला प्रारंभ करण्यात आला आहे. असोसिएशनच्या प्रशासनात खेळाडूंचे प्रभावी आणि अर्थपूर्ण प्रतिनिधित्व सुनिश्‍चित करणे, खेळाडूंच्या हिताचे व कल्याणाचे संरक्षण करणे तसेच पारदर्शकता, उत्तरदायित्व, प्रामाणिकता आणि सुशासनाची तत्त्वे अधिक बळकट करणे हा या आयोगाच्या स्थापनेमागील मुख्य उद्देश आहे. राष्ट्रीय क्रीडा प्रशासन अधिनियम 2025 आणि शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार परभणी जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या अंतर्गत या खेळाडू आयोगाची स्थापना करण्यात येणार आहे. आयोग स्थापन झाल्यानंतर खेळाडूंना संघटनेच्या प्रशासनात स्वतःचे हित, अधिकार आणि कल्याणाशी संबंधित बाबी प्रभावीपणे मांडण्याची संधी उपलब्ध होणार आहे. तसेच खेळ प्रशासनात खेळाडूंचा सक्रिय सहभाग वाढवून क्रीडा क्षेत्राचा दर्जा उंचावण्यास…

Read More

सेलू,(प्रतिनिधी) : सेलू नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 11 मधील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक अन्वर खान दिलावर खान पठाण यांना अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीच्या निर्णयामुळे मोठा धक्का बसला आहे. ‘तडवी भिल्ल’ या अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र वस्तुस्थिती लपवून आणि लबाडीने प्राप्त केल्याचे नमूद करत समितीने त्यांचे जात प्रमाणपत्र रद्द करून जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती क्रमांक 2, छत्रपती संभाजीनगर विभाग, छत्रपती संभाजीनगर यांनी महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 23, सन 2001 मधील कलम 7(6) अन्वये समितीसमोर झालेल्या कार्यवाहीच्या आधारे हा निर्णय घेतला आहे. समितीने दि. 22 जुलै 2026 रोजी यासंदर्भातील लेखी आदेश जारी केला. समितीच्या आदेशावर संशोधन अधिकारी…

Read More

पाथरी,(प्रतिनिधी) : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त पाथरी तालुक्यातील वडी येथील अंगणवाडीत भक्ती, संस्कार आणि पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. अंगणवाडीतील चिमुकल्या बालगोपालांनी पारंपरिक वेशभूषेत सजून गावातून भक्तिमय दिंडी काढत वारकरी परंपरेचा जागर केला. ‘मुखी विठ्ठल, हृदयी विठ्ठल, जय हरी विठ्ठल!’ च्या गजराने परिसर भक्तिमय झाला. आषाढी एकादशीनिमित्त आयोजित या उपक्रमात बालकांनी विठ्ठल-रखुमाईसह विविध वारकरी वेशभूषेत सहभाग घेतला. टाळ-मृदुंगाच्या निनादात निघालेल्या दिंडीने गावकर्‍यांचे लक्ष वेधून घेतले. या उपक्रमातून बालकांना महाराष्ट्राच्या समृद्ध वारकरी परंपरेची ओळख करून देतानाच भक्ती, संस्कार आणि सामाजिक मूल्यांचे धडे देण्यात आले. दिंडीनंतर अंगणवाडी परिसरात वृक्षलागवडीचा कार्यक्रम घेण्यात आला. ‘एक मूल-एक झाड’ या संकल्पनेतून प्रत्येक बालकाने स्वतःच्या हस्ते…

Read More

परभणी,(प्रतिनिधी) : आषाढी एकादशीच्या निमित्ताने बालगोपाळांमध्ये वारकरी परंपरेचे संस्कार रुजविण्यासाठी विश्‍व हिंदू परिषद, परभणीच्या वतीने गेल्या 48 वर्षांपासून आयोजित करण्यात येणारी भव्य गोपाळ दिंडी यंदाही उत्साहात आयोजित करण्यात आली आहे. शनिवार 25 जुलै रोजी सकाळी 8 वाजता माळी वेस येथील हनुमान मंदिरातून दिंडीला प्रारंभ होणार असून शहरातील सर्व शाळांनी विद्यार्थ्यांसह मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. आषाढी एकादशीला लाखो वारकरी पंढरपूरची वारी करतात. त्याच परंपरेचा संस्कार बालकांवर व्हावा, या उद्देशाने परभणीत ‘प्रति पंढरपूर’ उभारण्याचा उपक्रम विश्‍व हिंदू परिषद गेल्या चार दशकांहून अधिक काळ सातत्याने राबवत आहे. या दिंडीत संत परंपरा, वारकरी संस्कृती, भक्तीभाव आणि सामाजिक एकात्मतेचे दर्शन…

Read More

पाथरी,(प्रतिनिधी) : देशभरात नीट परीक्षेशी संबंधित तणावामुळे विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, या मागणीसाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या नेतृत्वात पाथरी शहर युवक काँग्रेसच्या वतीने शुक्रवार 24 जुलै रोजी धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. नीट परीक्षेच्या पार्श्‍वभूमीवर देशभरात विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या घटना घडत असून त्यामुळे शिक्षण व्यवस्थेबाबत संतापाची लाट निर्माण झाली आहे. या घटनांच्या निषेधार्थ नवी दिल्ली येथील जंतर-मंतर येथे विद्यार्थी संघटना, सामाजिक संस्था व विविध राजकीय पक्ष आंदोलन करत आहेत. त्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी पाथरी शहर युवक काँग्रेसच्या वतीनेही मोर्चा…

Read More

परभणी (प्रतिनिधी)  वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षी बहिरेपणाच्या समस्येने ग्रासलेल्या तरुणाची श्रवण शक्ती परभणीच्या आर.पी हॉस्पिटल मधील तज्ञ डॉक्टरांच्या कौशल्यामुळे परत मिळाली. परभणी येथील हा तरुण बऱ्याच दिवसांपासून कानातून पू व पाणी येणे, सतत कान दुखणे आणि हळूहळू ऐकू येणे, आयकू कमी येणे व नंतर काहीही न ऐकू येणे या त्रासाने त्रस्त होता. दुर्बिणीतून (Endoscopy) कानाची तपासणी केल्यानंतर प्राथमिक समस्या स्पष्ट झाल्या. श्रवण क्षमता तपासणीसाठी ऑडिओमेट्री विभागात तपासणी दरम्यान रुग्णाला फक्त १०% ऐकता येत असल्याचे निष्पन्न झाले. वयाच्या विशी-पस्तिशीतच आलेल्या या गंभीर आजारामुळे आणि उपचारांच्या वाढत्या खर्चाला कंटाळून रुग्ण परभणीसह विविध बाहेरील खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी फिरत होता; परंतु त्याला कुठेही…

Read More

जिंतूर येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद परभणी,(प्रतिनिधी) शासनाच्या लोककल्याणकारी योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत थेट, सुलभ आणि प्रभावीपणे पोहोचविणारे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान अभियान’ हे शासनाचे लोकाभिमुख पाऊल आहे. या अभियानाच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत योजनांचा लाभ पोहोचत असून प्रत्येक नागरिकाच्या समस्या सोडवून त्यांचे समाधान साधले जात आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त जिंतूर येथील परभणी रोडवरील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात आज समाधान शिबीर संपन्न झाले. या शिबीराचे उदघाटन पालकमंत्री श्रीमती बोर्डीकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या…

Read More

परभणी, (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी परभणी महानगर महिला मोर्चाच्या वतीने महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त “देवा भाऊ कृषी माऊली सोहळा” आयोजित करण्यात आला. या उपक्रमांतर्गत परभणी शहरातील रामकृष्ण नगर येथे १५० शहरी महिलांना बागकाम व भाजीपाला लागवडीसाठी कृषी किटचे मोफत वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेत्या डॉ. मीनाताई परतानी या होत्या. प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपा परभणी महानगर जिल्हाध्यक्ष श्री. शिवाजीभाऊ भरोसे, शहर जिल्हा महामंत्री श्री. भालचंद्रजी गोरे, लताताई वाकळे, सौ. मीनाताई वडपुरकर, सौ. तिरुमला खिलारे, नगरसेविका सौ. सुशीलाताई थोरात, नगरसेविका सौ. सपनाताई जुक्टे, सौ. गिरीजा अजेगावकर, डॉ. मंजुषा नरवाडकर, सीमाताई धुमाळ, सौ. प्रभावती अन्नपूर्णे, सौ.…

Read More

परभणी, (प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’ अंतर्गत शुक्रवार, दि. २४ जुलै २०२६ रोजी जिंतूर येथील परभणी रोडवरील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय येथे सकाळी ९.०० वाजता विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात १८ ते ७० वर्षे वयोगटातील पात्र नागरिकांची प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) अंतर्गत नोंदणी करण्यात येणार असून, रुपये २ लाखांचा अपघाती विमा संरक्षण पुर्णपणे मोफत उपलब्ध करून दिला जाणार आहे. हा विमा महसूल विभागाच्या पुढाकाराने काढण्यात येणार आहे. या विशेष शिबिराचा लाभ जास्तीत जास्त पात्र नागरिकांनी घ्यावा, तसेच संबंधित बँकांचे सर्व खातेदार आणि १८ ते ७० वर्षे वयोगटातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून…

Read More

परभणी,(प्रतिनिधी) : परभणी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 7 लाख रुपयांच्या कथित जबरी चोरीच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही तासांत छडा लावत हा प्रकार पूर्वनियोजित कट असल्याचे उघड केले आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून 3 लाख 50 हजार रुपये रोख रक्कम आणि एक मोबाईल असा सुमारे 4 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परतूर येथील दहिवाल ज्वेलर्समध्ये काम करणारा प्रथमेश शहाणे याने बुधवारी (दि. 22) परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. दुकानमालकाने बँकेत जमा करण्यासाठी दिलेली 7 लाख रुपयांची रक्कम घेऊन तो परभणीकडे येत असताना जळगाव परिसरात चार अज्ञात…

Read More