Author: Lok Sanchar

परभणी (प्रतिनिधी) सोरायसिस हा दीर्घकालीन त्वचारोग असून, त्यावर प्रभावी उपचार मिळणे रुग्णांसाठी मोठे आव्हान असते. परंतु आता आर.पी. हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक PUVA थेरेपी (फोटोथेरेपी) उपलब्ध झाली असून, यामुळे रुग्णांना नवीन आशा निर्माण झाली आहे. दैठणा गावातील एक दीर्घकालीन सोरायसिस रुग्णावर डॉ.मनीष कदम,डॉ.दिनेश भुतडा,डॉ.रेवती यांच्या कुशल उपचारामुळे PUVA थेरेपीचा यशस्वी वापर करण्यात आला. या रुग्णावर लाईट थेरेपीसह योग्य औषधोपचार करून आजार पूर्णपणे नियंत्रित झाला असून, रुग्ण पूर्णतः बरा होऊन आज रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. रुग्णाच्या त्वचेवरील लालसर, जाड, पांढऱ्या खवलेदार डाग पूर्णपणे निघून गेले असून, त्याला मोठा आराम मिळाला आहे. सोरायसिस म्हणजे काय? सोरायसिस हा संसर्गजन्य आजार नाही. यात त्वचेवर लालसर,…

Read More

परभणी ( प्रतिनिधी) महाराष्ट्र नर्सेस असोसिएशन परभणी विभागाच्या वतीने आज जिल्हा सामान्य रुग्णालयात शहरी आणि ग्रामीण भागातील नर्सेस यांच्या ज्ञानात भर पडावी आणि रुग्णांना वैद्यकीय सेवा देताना कार्यकुशलता यावी या भावनेने एकदिवसीय सी एन ई /सी पी डी क्रेडिट 10 पॉईंट कार्यशाळेचे आयोजन 6 मार्च रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयातील सभागृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक नागेश लखमावार, वैद्यकीय अधीक्षक तथा अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सारिका बडे , डॉ फैजलं सर, मुख्य आधिसेविका मीनाक्षी सूर्यवंशी, स्त्री रुग्णालयाच्या सहाय्यक अधीसेविका चंदा राणी लेमाडे, अस्थिवेंग रुग्णालयाच्या सहाय्यक अधिक सेविका मीना देशमुख, प्रभारी आदी सेविका सुनंदा हटकर,…

Read More

परभणी,( प्रतिनिधी) आर.पी. हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट येथे अत्याधुनिक सौंदर्यशास्त्र, केसशास्त्र व लेसर विभाग सुरू झाला आहे. या विभागामुळे परभणी शहरासह लगतच्या ग्रामीण भागातील हजारो रुग्णांना अती उच्च दर्जाचे त्वचा, केस आणि सौंदर्य उपचार आता स्थानिक पातळीवरच अत्यल्प दरात उपलब्ध होत आहेत. या विभागात प्रसिद्ध त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टरांची टीम कार्यरत आहे. यात प्रमुख म्हणून डॉ. मनीष कदम आणि डॉ.दिनेश भूतडा व डॉ.रेवती राज हे कार्यरत आहेत.या विभागात  केमीकल पीलिंग व मायक्रोडर्म अब्रेशन:- त्वचेच्या मृत कोशिका काढून टाकणे. मुरुमांचे डाग, काळे डाग, सुरकुत्या काढणे.पुव्हा थेरपी व क्रियो थेरपी,सोरायसिस, विटिलिगो (पांढरे डाग) यांसारख्या रोगांसाठी प्रभावी.क्रायो थेरपी : वेदनाशून्य त्वचेवरील मस काढणे,डायोड लेसर…

Read More

परभणी (प्रतिनिधी)  कृषी क्षेत्रासाठीचे एआय तंत्रज्ञान धोरण केवळ कागदोपत्री न ठेवता या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी अर्थ संकल्पात भरीव निधी देणे आवश्यक आहे. त्यानंतरच एआय तंत्रज्ञान अंतर्गत ड्रोन, रोबोटीक तंत्रज्ञान प्रत्यक्ष शेतकºयांच्या बांधावर पोहोचणे शक्य होईल. त्यामुळे यासाठी भरीव निधी आणि ठोस अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी आमदार डॉ. राहुल पाटील यांनी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली. राज्यातील शक्तिपीठ व समृध्दी या दोन महामार्गासाठी शासन हजारो कोटींचा निधी खर्च करीत आहे. परंतू कृषी क्षेत्राकडे शासनाचे संपूर्णत: दुर्लक्ष झाले आहे. राज्यातील कृषी विद्यापीठे म्हणजे पांढरा हत्ती पोसल्यासारखे झाले असल्याचे बोलले जात असून यामुळे विद्यापीठांची बदनामी होत आहे. या कृषी विद्यापीठातून कुठलेही संशोधन होत…

Read More

जगात काही माणसं अशी असतात की ज्यांच्या जीवनसंघर्षातून घडलेली प्रेरणादायी यशोगाथा पुढील पिढ्यांना मार्गदर्शक ठरते. असेच आमच्या शारदा महाविद्यालयातून अठ्ठावीस वर्षाची सेवा देऊन निवृत्त होत असलेले कार्यालयीन अधीक्षक श्री सुरेश नारायणराव जयपूरकर… त्यांचे मुळ गाव जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील जयपूर एक शेतकरी कुटुंब. कोरडवाहू निसर्गावर आधारित शेती त्यामुळे घरची परिस्थिती अत्यंत बेताची.आई अशिक्षित व वडीलांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण.परंतु कुटुंबातील वडिलांचे भाऊ उच्चशिक्षित होते. कुटुंबात तीन बहिणी १मोठी व २ लहान आणि स्वतः अशी चार भावंडे. तीन बहिणीमध्ये एकुलता एक भाऊ म्हणून जबाबदारीची जाणीव लहानपणापासूनच. अशा परिस्थितीत जन्माला आलेले सुरेश जयपूरकर यांनी आयुष्याकडे पाहण्याची दृष्टी मात्र मोठी ठेवली. जयपूर येथील जिल्हा…

Read More

परभणी (प्रतिनिधी) बाल विद्या मंदिर हायस्कूल विभागांमध्ये आज दिनांक 26.02 2026 रोजी संस्थेचे सन्माननीय सचिव मा. डॉ. विवेक नावंदर यांच्या शुभहस्ते आयुका, पुणे येथे विज्ञान वारीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा, शिष्यवृत्ती पूर्व परीक्षा, एन एस ओ ऑलंपियाड स्पर्धा परीक्षा व पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय परभणी येथे आयोजित प्रेरणा उत्सव मध्ये सहभागी होऊन यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्था सचिव मा. डॉ. विवेक नावंदर प्रशालेचे मुख्याध्यापक अरुण बोराडे उपमुख्याध्यापक रामदास तुम्मेवार प्रशालेचे पर्यवेक्षक बळीराम कोपरटकर क्रीडा विभाग प्रमुख ज्ञानेश्वर पंडित, विज्ञान शिक्षिका जयश्री महामुने, गजानन जुमडे व महेश फड, गजानन लोणसने व कलाध्यापक केशव लगड यांची उपस्थिती होती.…

Read More

परभणी (प्रतिनिधी) मानवी हक्क अभियान च्या वतीने केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री मा रामदास आठवले साहेबांना मानवी हक्क अभियान च्या वतीने महाराष्ट्रात गेल्या 40 वर्षांपासून दलित आदिवासी समाजाने गायरान जमिनीवर अतिक्रमण करून आपला उदरनिर्वाह करित आहेत शासनाचे अनेक परिपत्रक निघूनही स्थानिक पातळीवर जिल्हा प्रशासनाकडून कार्यवाही झालेली नाही. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा उलट अर्थ काढून महाराष्ट्र शासन दलित आदिवासींच्या ताब्यात असलेल्या गायरान जमिनी निष्कासित करून त्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी व ईतर कारखानदारांच्या घशात घालण्याचा घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. म्हणून केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले साहेबांनी महाराष्ट्र सरकारला धारेवर धरत दलित आदिवासी यांच्या ताब्यात असलेल्या गायरान जमिनी नांवे करून 7/ 12 मालकी…

Read More

पेडगाव ता.परभणी येथे राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण शिबिरात केले प्रतिपादन . परभणी (प्रतिनिधी)  मा कुलगुरू इंद्रमणी यांचे मार्गदर्शनाखाली वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागामार्फत राष्ट्रीय कृषी विकास योजनेद्वारे पेडगाव ता.जि. परभणी येथे शेतकरी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले. या प्रशिक्षण शिबिरात परिसरातील संत्रा, कागदी लिंबू, केळी व भाजीपाला उत्पादक शेतकरी उपस्थित होते. उपस्थित शेतकऱ्यांना उत्पादन खर्च कमी करून पिकांचे उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने बीज प्रक्रिया, जैविक खते आणि सेंद्रिय खते , विद्राव्य खते, सूक्ष्म अन्नद्रव्ये युक्त खते या निविष्ठांचा एकात्मिक खत व्यवस्थापन यासाठी वापर करण्यासंदर्भात डॉ. हरिहर कौसडीकर,उपसंशोधन संचालक आणि विभाग प्रमुख…

Read More

परभणी (प्रतिनिधी) शासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर आज मंगळवारी अभाविपचा विद्यार्थी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. शहरात महात्मा फुले चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गाने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) परभणी शाखेचा विद्यार्थी आक्रोश मोर्चा यशस्वीपणे पार पडला. विविध आयटीआय, वैद्यकीय, अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालये तसेच इतर शैक्षणिक संस्थांमधील शेकडो विद्यार्थी-विद्यार्थिनी या मोर्चात सहभागी झाले होते. हा मोर्चा केवळ निदर्शन नसून महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर शासनाला जागे करण्याची ठाम आणि तीव्र हाक होती. मोर्चादरम्यान विद्यार्थ्यांनी बॅनर-फलक घेऊन जोरदार घोषणाबाजी केली. “उठ दोस्ता उगार मुठ… तूच थांबव तुझ्या शिक्षणाची लूट!” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सादर करण्यात आलेल्या निवेदनात…

Read More

विविध शैक्षणिक मागण्यांसाठी अभाविपचे आंदोलन परभणी ( प्रतिनिधी ) अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, परभणी यांच्या वतीने विद्यार्थ्यांच्या प्रलंबित शैक्षणिक प्रश्नांसाठी येत्या २४ फेब्रुवारी रोजी “विद्यार्थी आक्रोश मोर्चा_ आयोजित करण्यात आला आहे. जिल्हाभरातून विद्यार्थी या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. अभाविपने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे की, राज्यातील विद्यार्थ्यांना प्रवेश, परीक्षा, शिष्यवृत्ती, शुल्कवाढ, वसतिगृह, वाहतूक सुविधा आणि शैक्षणिक गुणवत्तेच्या अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सरकार विद्यार्थ्यांच्या या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्याचे काम करत असल्यामुळे विद्यार्थी परिषदेच्या वतीने हे आंदोलन करण्यात येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक, आर्थिक व प्रशासकीय समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शासन व संबंधित प्रशासनाने या समस्यांकडे गांभीर्याने…

Read More