परभणी (प्रतिनिधी) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संविधान विरोधी धोरणच या सर्व घटनाक्रमांना कारणीभूत असल्याचा आरोप करीत या प्रकरणात आम्ही पूर्णपणे चौकशीची मागणी करणार असून निश्चितच यातून सत्य बाहेर येईल असे वक्तव्य लोकसभा विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत केले.
लोकसभा विरोधी पक्ष नेते खा.राहुल गांधी हे परभणी दौऱ्यावर आले असता आज दुपारी त्यांनी स्व. सुर्यवंशी या युवकाच्या कुटूंबियांचे सांत्वन केल्यानंतर नवा मोंढा येथील निवासस्थानी परिसरात माध्यमांच्या प्रतिनिधींबरोबर संवाद साधला. पुढे बोलताना ते म्हणाले की आपण सुर्यवंशी कुटूंबियांचे सांत्वन केले, त्यांचे म्हणणे ऐकले. एकूण स्थितीची माहिती घेतली आहे. सुर्यवंशी या युवकाच्या हत्येस केवळ पोलिस जबाबदार असल्याचे स्पष्ट असून पोलिस कोठडीत केलेल्या मारहाणीमुळेच सुर्यवंशी याचा मृत्यू झाला असे ते म्हणाले.
या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी विधीमंडळ अधिवेशनात दिलेली माहिती पूर्णतः खोटी आहे, असे नमूद करीत गांधी यांनी मूळातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संविधान विरोधी धोरणच या सर्व घटनाक्रमांना कारणीभूत असल्याचा आरोपही गांधी यांनी केला. या प्रकरणात आम्ही पूर्णपणे चौकशीची मागणी करणार असून निश्चितच यातून सत्य बाहेर येईल व सूर्यवंशी कुटूंबियांना न्याय मिळेल, असा विश्वास गांधी यांनी व्यक्त केला.
दरम्यान, यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश चिन्नीथाल, प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे नेते विजय वडेवट्टीवार, बाळासाहेब थोरात, खा. वर्षा गायकवाड, श्रीमती यशोमती ठाकूर, खा. प्रणिती शिंदे, खा. संजय जाधव, काँग्रेसचे नेते तथा जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर,माजी आ. सुरेश दादा देशमुख, आ. डॉक्टर राहुल पाटील आ. अमित देशमुख माजी उपमहापौर भगवानराव वाघमारे, प्रदेश काँग्रेस समितीच्या अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्ती अंबिरे बाळासाहेब देशमुख आदी उपस्थित होते.
Monday, February 9
ताज्या बातम्या:
- ज्येष्ठ पत्रकार नितीन धूत यांना सर्व पत्रकारातर्फे श्रद्धांजली अर्पण
- संत श्री गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त विविध कार्यक्रम; आत्मोन्नती प्रतिष्ठानचा उपक्रम
- शेतकरी व पशुपालकांना केंद्रबिंदू ठेवून प्रदर्शनाची तयारी करा- पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे
- मारोतराव लोमटे यांचे निधन
- ज्येष्ठ पत्रकार नितीन धूत यांची उद्या परभणीत शोकसभा
- यशस्वीतेसाठी कठोर परिश्रम आवश्यक- सर्वेश काबरा
- जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या मतदानासाठी कामगारांना भरपगारी सुट्टी
- केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला ऐतिहासिक निधी;, पायाभूत सुविधा व ऊर्जेला नवी दिशा — राज्यमंत्री मेघना बोर्डीकर


