पालम ( प्रतिनिधी) बदलत्या काळात स्त्रियांना स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी आपल्या शारीरिक आरोग्याची काळजी घेऊन सक्षम होणे अत्यंत महत्त्वाचे आहे .कारण शरीरासोबत मनही तंदुरुस्त त्यामुळे राहते असे प्रतिपादन डॉ .अभिरुची शिंदे रोकडे यांनी. दि.8 रोजी केले .त्या शहरातील माधवराव पाटील महाविद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या

कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या .या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाची प्राचार्य डॉ.एच.टी.सातपुते हे होते तर सौंदर्यतज्ञ वैष्णवी चव्हाण ,डॉ संगीता रणवीरकर ,डॉ वर्षा दाभाडे, डॉ .विनिता रंजनकर, प्रा.नीता रसाळ निर्वळयांची विचार मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती .
महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात पुढे बोलताना डॉ.रोकडे म्हणाल्या की,सध्याचे जीवनमान अत्यंत धकाधकीचे झाले आहे त्यामुळे प्रत्येकाला कष्ट केल्याशिवाय आयुष्यात यश मिळत नाही . शारीरिक श्रम करताना आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घेऊन आपण नियमित व्यायाम केला पाहिजे तरच खऱ्या अर्थाने आपण सक्षम होऊ .यावेळी डॉ रणवीरकर,डॉ. रंजनकर, प्रा.निर्वळ व डॉ . दाभाडे विद्यार्थिनींना विविध विषयावर मार्गदर्शन करून भावी जीवनात आपण आपल्या पायावर कसे उभे राहिले पाहिजे याचे महत्त्व सांगितले .विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून यावेळी नेहा घोसले यांनी आपले विचार मांडले . या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोमल मेकेवाड यांनी केले तर सूत्रसंचालन वैष्णवी मलुले यांनी केले .गीता दुधाटे यांनी आभार मानले . कार्यक्रमास महा विद्यालयातील विद्यार्थिनींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती .


