परभणी,(प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या भारतीय संविधानाचा अवमान सहन केला जाणार नाही, संविधान मानणार्यांनाच भारतात राहण्याचा अधिकार आहे. ज्यांना संविधान मान्य नसेल त्याने देश सोडावा. परभणीत घडलेल्या संपुर्ण घटनेची गुप्तचर विभागामार्फत कसून चौकशी करावी, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केली.
शनिवारी (दि.14) दुपारी परभणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले दाखल झाल्याबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर शासकीय विश्रामगृहावर आठवले यांनी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, प्रभारी पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकार्यांशी चर्चा करीत आढावा घेतला. त्या नंतर पत्रकार परिषदेतून पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बाबूराव कदम, ब्रम्हानंद चव्हाण, दिलीप जोशी, किशोर थोरात, बाळकृष्ण एंगडे, डॉ.सिध्दार्थ भालेराव, डी.एन.दाभाडे, जिल्हाध्यक्ष डॉ.विजय गायकवाड यांची उपस्थिती होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मोठ्या कष्टाने संविधान बनवले आहे. त्याद्वारे अखंड भारताची संकल्पना मांडली आहे. परभणीत काचेमध्ये ठेवलेल्या त्या प्रतिकृतीचे नुकसान करून सोपान पवार नावाच्या आरोपीने संविधानाचा अवमान करण्याचा प्रयत्न केला आहे, असे नमूद करीत आठवले यांनी हा प्रकार सहन न झाल्याने कार्यकर्ते व महिलांच्या भावना उफाळून आल्या. त्यातून आंदोलन केल्या गेले, असे म्हटले. या प्रकरणात त्या आरोपीविरोधात अॅट्रासिटीसह इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झालेले आहेत. आरोपीवर नांदेड येथील रूग्णालयात उपचार सुरु आहेत, तेथून सुटी मिळाल्यावर आरोपीची गुप्तचर विभागामार्फत चौकशी केली पाहिजे. या घटनेमागे आणखी कुणाचा हात आहे का? हे देखील तपासले पाहिजे, असे ते म्हणाले. वत्सलाबाई मानवते या महिलेस पोलिसांनी जबर मारहाण केल्याचेही नमूद करीत आठवले यांनी ती महिला अत्यवस्थ असल्याचे सांगितले. या प्रकरणी संबंधितांची चौकशी करून कारवाई व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
पोलिसांनी 300 लोकांविरूध्द गुन्हे दाखल केले आहेत. एक ट्रक, बसेस व इतर खाजगी गाड्या, 2 पोलीस व्हॅनची तोडफोड झाली आहे. 18 दुचाकी वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे. यात सिसिटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी अटक केलेल्या 42 जणांना अटक केली असून त्या पैकी 10 जणांना जामीन मिळाला आहे, असे आठवले यांनी पत्रकारांना सांगितले. निरपराधांना, विद्यार्थ्यांना यात अडकवू नका. ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत ते गुन्हे मागे घेण्याची विनंती आपण स्वत: मुख्यमंत्र्यांना भेटून करणार असल्याचेही ते म्हणाले.
Thursday, May 21
ताज्या बातम्या:
- परभणी जिल्हा पुन्हा भगवामय करणार – आमदार डॉ राहुल पाटील यांचा निर्धार : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार
- चाळीशीत वाढताहेत ‘हार्ट अटॅक’चे प्रमाण; आर.पी. हॉस्पिटलचा ‘TMT’ उपक्रम अवघ्या ३०० रुपयांत
- नानलपेठ पोलीस ठाण्यात २४ बेवारस दुचाकी वाहनांचा २८ मे रोजी जाहीर लिलाव
- पत्रकार विजयकुमार मुंदडा यांचे अपघाती मृत्यु प्रकरणाचा जलद गतीने तपास करा; वसमत रोडवरील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची पत्रकारांची मागणी
- राष्ट्रीय स्पर्धेसाठी डॉ. पंकज खेडकर यांची परीक्षक म्हणुन निवड* ; पुण्यात रंगणार ‘भारत उत्सव २०२६’चा सोहळा; लोककला आणि अभिनयाचा अविष्कार
- ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार मुंदडा यांचे अपघाती निधन ; गंगाखेड येथे अंत्यसंस्कार
- निर्वाचित पक्ष, गट व अपक्षांसाठी महत्त्वाची सूचना: ११ मेपूर्वी आघाडी नोंदणी आवश्यक
- परभणीत 7 मे रोजी गुरव समाजातर्फे वधू-वर परिचय मेळावा व मौंजी संस्कार कार्यक्रम


