सेलू. (प्रतिनिधी) जालना-नांदेड समृद्धी महामार्ग प्रकल्पातील बाधित शेतकऱ्यांनी आज सोमवारी जवळपास चार तास जोरदार.रस्ता रोको आंदोलन केले.
यावेळी जालना- नांदेड समृद्धी महामार्ग प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित होत असून शेतकऱ्यांना पुरेसा मावेजा मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या भावना अतिशय तीव्र होत्या. तसेच या प्रकरणी शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे उच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत प्रशासनाने भु संपादन बाबतीत कुठलाही निर्णय घेऊ नये अशी एकंदरीत या शेतकऱ्यांचीं मागणी होती. यावेळी शेतकऱ्यांनी प्रशासनाचे प्रतिनिधी तथा तहसीलदार श्री मगर यांना निवेदन दिले.
या मध्ये असे नमूद केले होते कि,
दि 04-10-2024 रोजी जिल्हास्तरीय दरनिश्चीतीची बैठक झाली होती, त्यामध्ये समितीने सादर केल्याप्रमाणे प्रपत्र-1 ला समीतीने बैठकीमध्ये मंजुरी दिलेली आहे. दर निश्चीतीची दि 04/10/2024 रोजी प्रापत्र-1 ला मंजुरी मिळून पाच महीने झाले असून देखील आपन अद्याप पर्यंत मावेजा वाटप केलेला नाही.
. आपण केलेल्या विलंबामुळे आम्हा सर्व बाधीत शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. असे म्हटले.त्यामुळे तात्काळ 04/10/2024 च्या मंजुर प्रपत्र 1 प्रमाणे मोबदला देण्यात यावा, शासनाने गांभीर्याने दखल न घेतल्यास आम्हा शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ येऊन आत्महत्या करण्याची वेळ आल्यास यास सर्वस्वी जवाबदारी शासनाची राहील असा ईशारा निवेदनात देण्यात आला..प्रशांत नाईक , रामेश्वर गाडेकर ,रमेश माने, रघुनाथ टाके, विजय खरात,पप्पु गाडेकर, सुंदर गाडेकर, निशांत मुंडे, सुनिल लिपणे सोनु खरात यांच्या सह तब्बल अडीच ते तीन तास चाललेल्या रास्ता रोको मध्ये नऊ गावचे बाधित शेतकरी आंदोलन मध्ये सहभागी होते.
Friday, July 18
ताज्या बातम्या:
- निवडणूक कालावधीत उत्कृष्ट वार्तांकन केलेल्या पत्रकारांचा जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते सन्मान
- कृषि पंप योजनेवरुन सरकारला धरले धारेवर ; आ.डॉ.राहुल पाटील विधानसभेत आक्रमक-लक्षवेधीद्वारे वीज समस्यांकडे वेधले सरकारचे लक्ष
- संबर येथील अपहरण आणि खून प्रकरणातील पाच आरोपी जेरबंद ; स्थानिक गुन्हा शाखा व परभणी ग्रामीण पोलिसांची संयुक्त कारवाई
- उद्यापासूनच जिल्ह्यातील कॅनॉल व माजलगाव धरणात पाणी सुटणार; जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची बैठकीत माहिती
- पालकाच्या मृत्यूप्रकरणात निवेदन सादर करा; आ.डॉ राहुल पाटील यांच्या प्रश्नावर विधानसभा अध्यक्षांच्या सूचना
- भाजपा जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांचा मदतीचा हात; ह.भ.प. जगन्नाथ महाराज हेंडगे मृत्यू प्रकरणातील पीडित कुटुंबास दोन लाखांची आर्थिक मदत
- जायकवाडी डाव्या कालव्या मार्फत शेतीसाठी पाणी सोडावे युवक काँग्रेसची मागणी
- आ राजेश विटेकर यांनी विधान सभेत उपस्थित केलेल्या पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन वर कार्यवाही