परभणी (परभणी) परभणी जिल्ह्यात मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा बट्ट्याबोळ उडाला आहे. शेतकरी सहा महिन्यांपासून पैसे भरून कृषी पंपासाठी कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत. परंतू शासन गोलमोल उत्तर देत आहे अशा शब्दात आ.डॉ.राहुल पाटील यांनी विधानसभा अधिवेशनात गुरूवार, दि.१७ जुलै रोजी लक्षवेधीद्वारे आक्रमक भूमिका घेतली.
विधानसभेच्या अधिवेशनामध्ये लक्षवेधीद्वारे आ. डॉ. पाटील यांनी परभणी जिल्ह्यातील वीज समस्येबाबत आवाज उठवला. सौर कृषी पंप योजनेमध्ये सहा महिन्यांपूर्वी २५ हजार ९४२ शेतकºयांनी पैसे भरले. शेतकरी कृषी पंपासाठी कार्यालयात चकरा मारत असून शासनाकडून फिरवा फिरवीची उत्तरे दिली जात आहेत. यात शेतकºयांची चूक काय? असा सवाल करत सहा महिन्यांपूर्वी घेतलेल्या पैशाचे व्याज सरकार देणार का? कृषी पंपाअभावी झालेली नुकसान भरपाई सरकार देणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित करीत सरकारला धारेवर धरले. तसेच परभणी जिल्ह्यामध्ये अपुºया लाईनमन, वीज कर्मचाºयांच्या प्रश्नावर देखील सरकारला खडे बोल सुनावले. जिल्ह्यातील ८५४ गावात केवळ ५३९ कर्मचारी कार्यरत आहे. त्यामुळे विजेच्या समस्या निर्माण होत आहेत. उर्वरित गावात वीज कर्मचाºयांची रिक्त पदे कधी भरणार असा सवाल सरकारला केला. परभणी जिल्ह्यात महावितरणची ११ युनिट २०१० पासून बंद पडली आहेत. ही युनिट पुनर्जीवित करणार का? त्यासोबतच परभणी जिल्ह्यामध्ये १०० रोहित्र बंद झाली आहेत.रोहित्र नसल्यामुळे परभणी शहरात विजेच्या अनेक समस्या निर्माण होत आहेत. सरकारने याकडे गांभीर्याने पहावे असे देखील आ. पाटील म्हणाले.
ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी आ. पाटील यांच्या लक्षवेधीवर उत्तर देताना सांगितले की, परभणीत २६ हजार २७५ लोकांनी कृषी पंपासाठी पैसे भरले. १५ हजार ७७२ लोकांनी एजन्सी निवडली, तर ९ हजार ९६१ लोकांना कृषी पंप दिले. ८१८ शेतकºयांनी पैसे भरून सहा महिने झाले आहेत. परंतू त्यांना संबंधीत कंपनीकडून कृषीपंप देण्यात आले नाहीत. त्यामुळे संबंधित कंपनीकडून दहा टक्के नुसार पैसे वसूल करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच मागणी केलेल्या सर्व शेतकºयांना आॅगस्ट अखेरपर्यंत कृषी पंप देण्यात येतील. याशिवाय बंद पडलेले ११ युनिट सुरू करण्यासह रिक्त कर्मचाºयांच्या भरती प्रक्रीयेच्या मागणीला राज्यमंत्री बोर्डीकर यांनी सभागृहात लगेचच मान्यता देवून तात्काळ कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन आ. पाटील यांना दिले.
राज्यात आशावर्कर, गटप्रवर्तक, अंगणवाडी सेविका ह्या अनेक वर्षांपासून विविध विभागाचे काम करतात. त्यांना मानधन कमी आहे. निवृत्तीनंतर मिळणाºया कुठल्याही लाभाची तरतूद नाही तसेच विमा कवच नाही. त्या अनुषंगाने त्यांना पगारवाढ, रिटायरमेंट बेनिफिट व विमा कवच देण्यात यावे अशी मागणी आ.पाटील यांनी केली. बालमृत्यू व मातामृत्यू कमी करण्यासाठी आपण सर्वांनी काम करणे गरजेचे आहे. मात्र परभणी जिल्हा महिला रुग्णालयात फक्त एकच व्हेंटिलेटर असून शासनाने रूग्ण संख्या पाहून आधिकचे साहित्य उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
*पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकासाठी निधी द्या*
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे त्रीशताब्दी जन्म महोत्सव वर्ष देशभर साजरे करण्यात येते आहे. यानिमित्ताने सरकार देशभर विविध चांगल्या योजना राबवित आहे. या पार्श्वभुमीवर परभणी शहरात देखील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे भव्य स्मारक व्हावे अशी जिल्ह्यातील नागरीकांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. यासाठी राज्य सरकारने परभणीत भव्य दिव्य स्मारक उभारणीसाठी लवकरात लवकर निधी द्यावा अशी मागणी आ.पाटील यांनी अधिवेशनात केली.
Thursday, July 17
ताज्या बातम्या:
- कृषि पंप योजनेवरुन सरकारला धरले धारेवर ; आ.डॉ.राहुल पाटील विधानसभेत आक्रमक-लक्षवेधीद्वारे वीज समस्यांकडे वेधले सरकारचे लक्ष
- संबर येथील अपहरण आणि खून प्रकरणातील पाच आरोपी जेरबंद ; स्थानिक गुन्हा शाखा व परभणी ग्रामीण पोलिसांची संयुक्त कारवाई
- उद्यापासूनच जिल्ह्यातील कॅनॉल व माजलगाव धरणात पाणी सुटणार; जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची बैठकीत माहिती
- पालकाच्या मृत्यूप्रकरणात निवेदन सादर करा; आ.डॉ राहुल पाटील यांच्या प्रश्नावर विधानसभा अध्यक्षांच्या सूचना
- भाजपा जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांचा मदतीचा हात; ह.भ.प. जगन्नाथ महाराज हेंडगे मृत्यू प्रकरणातील पीडित कुटुंबास दोन लाखांची आर्थिक मदत
- जायकवाडी डाव्या कालव्या मार्फत शेतीसाठी पाणी सोडावे युवक काँग्रेसची मागणी
- आ राजेश विटेकर यांनी विधान सभेत उपस्थित केलेल्या पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन वर कार्यवाही
- “त्या” संस्थाचालकाचे बँक खाते फ्रिज करावे- सिद्धार्थ पानबुडे ; मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन