परभणी,(प्रतिनिधी) : आजच्या काळात संवेदनशील मन तयार करणारे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन पद्मश्री मोहन आगाशे यांनी केले.
परभणी येथील सायन्स पार्क येथे आयोजित 64 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात गोल्डन लोटस पुरस्कार विजेता ‘कासव’ या चित्रपटाच्या स्क्रिनिंग प्रसंगी त्यांनी प्रेक्षकांशी संवाद साधला. कार्यक्रमात प्रारंभी उपस्थित प्रेक्षकांनी कासव हा चित्रपट पाहिला व त्यानंतर कलावंत मोहन आगाशे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी व्यासपीठावर प्रा. ज्ञानोबा नाईक, डॉ. अमोल देशमुख, डॉ. जगदीश नाईक यांची उपस्थिती होती.
यावेळी आगाशे यांनी मानवी भावना, मन याबाबत चित्रपटातील अंतर्मुख करणार्या बाबींवर प्रकाश टाकला. भावना शब्दाच्या पलीकडच्या आहेत. पूर्वी अनुभवातून शिक्षण मिळायचे व नंतर माहिती मिळायची पण आजच्या काळात माहितीचे प्रचंड मोठा साठा आपल्यासमोर आहे. आज मानवाची संवेदना कमी होत चालली आहे म्हणूनच आजच्या काळात संवेदनशील मन तयार करणारे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळण्याची आवश्यकता आहे, असे आगाशे यांनी म्हटले.
या कार्यक्रमासाठी इतर मागास बहुजन विकास, दुग्ध विकास, अपारंपारिक ऊर्जा मंत्री अतुल सावे व परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉ. रामेश्वर नाईक यांनी केले. सूत्रसंचालन त्र्यंबक वडसकर यांनी तर आभार पी. आर. पाटील यांनी मानले. यशस्वीतेसाठी संपूर्ण परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या टीमने व आदींनी परिश्रम घेतले.