पालम- (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाने राज्यात या वर्षी पासून इयत्ता पहीली साठी व पुढील वर्षी पासून २ री, ३ री, ४ थी व पुढे दर वर्षी टप्प्या टप्प्याने १२पर्यत सी बी एस ई (CBSE) पॅटर्न सुरू करण्याचा व जिल्हा परिषद शाळांत सर्व सुविधा, सर्व योजना पोहचवून शाळा दर्जेदार व गुणवत्ता संपन्न करण्याचा निर्णय घेतल्याने सर्व पालक व विद्यार्थी यांच्यात आनंदाचे वातावरण पहायला मिळत आहे. जे सी बी एस ई शिक्षण घेण्यासाठी पालकांना खाजगी शाळेत लाखो रुपये खर्च करावे लागत होते तेच शिक्षण आता प्रत्येक जिल्हा परिषद शाळांत मिळणार असल्याने नक्कीच आता जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी संख्या वाढणार आहे असे प्रतिपादन पारवा ता पालम येथील पी एम श्री शाळेत इयत्ता पहीलीत २५ विद्यार्थी यांनी प्रवेश घेतला त्या वेळी त्यांचे स्वागत करून बोलताना आपल्या भाषणात पालम तालूक्याचे गट शिक्षणाधिकारी शिवाजी गायकवाड यांनी आपले मत विषद केले
सध्या महाराष्ट्रात शासनाचे जिल्हा परिषद शाळांत सर्व भौतिक व आवश्यक सुविधा पुरवून सर्व शाळांना आदर्श करण्याचे व राज्यातील शिक्षणाचा दर्जा उत्तम करण्याचे काम सरकार ने हाती घेतले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरन २०२० राबविणायाच्या दिशेने नवीन अभ्यासक्रम तयार होत आहे व त्या नव्या अभ्यासक्रम बाबत राज्यातील सर्व जिल्हा परिषद व सर्व सरकारी शाळा मधील शिक्षकांना मोलाचे नाविन्यपूर्ण प्रशिक्षण देण्यात आले आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरन २०२०सोबतच राज्यात इयत्ता पहीली पासून CBSE पॅटर्न सुरू करणार असल्याचे व त्या बाबत सर्व पुस्तके व तयारी चालू असल्याचे शासनाने जाहीर केल्याने सर्व पालकांत आनंदाचे वातावरण दिसत आहे या मुळे पालकांचे दर वर्षी प्रती विद्यार्थी लाखो रुपये वाचणार व विविध संस्था मध्ये भेटणारे CBSE शिक्षण सर्व जिल्हा परिषद शाळांत मिळणार असल्याने जिल्हा परिषद शाळांत पहीली च्या विद्यार्थी व इतर ही वर्गातील प्रवेशाची संख्या खाजगी शाळा पेक्षा कितीतरी पटीने वाढली असल्याचे समोर येत आहे
पिएमश्री जि प प्रा शा पारवा ता पालम येथे प्रवेश सोहळा कार्यक्रमात इयत्ता पहिली वर्गात सीबीएसई पॅटर्न सुरू होत असल्याने दर वर्षी पेक्षा जास्त विद्यार्थी यांनी पहीलीत प्रवेश घेतल्याचे दिसून आले. दि ०१/०४/२०२५ रोजी जिल्हा परिषद शाळा पारवा येथे प्रवेश सोहळ्यात पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या सोहळ्यात गावातील एकूण २५ पहीली च्या विद्यार्थी यांनी प्रवेश घेतला आनखीनही प्रवेश होनारच आहेत. येथे प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देवून त्यांचा पालकांसह स्वागत सत्कार ही करण्यात आला आणि इयत्ता पहीली चा वर्ग CBSEपॅटर्ण नुसार दि १ एप्रिल पासूनच सुरु करण्यात आला असे वर्ग पालम तालुक्यातील अनेक शाळांमध्ये ही सुरू झाली आहेत. यावेळी या सुंदर कार्यक्रमाचे आयोजन नियोजन घडवून आननारे सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा शाळा व्यवस्थापन समीती चे अध्यक्ष प्रल्हाद कराळे गुरूजी मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले पालम चे गटशिक्षणाधिकारी शिवाजी गायकवाड, केंद्रप्रमुख उडतेवार, केंद्रप्रमुख चव्हाण, केंद्रप्रमुख ब्याळे, शाळेचे मुख्याध्यापक विनायक फुगणर, शिक्षक भोसले, पवार, लोहकरे सौ चिलगेवार मॅडम शिक्षिका, शाळा व्यवस्थापन समीती चे अध्यक्ष श्री कराळे व सर्व पदाधिकारी, पालक मुलांचे आईवडील, शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.यावेळी मार्गदर्शन शिवाजी गायकवाड, केंद्रप्रमुख उडतेवार, ब्याळे, चव्हाण आणि शाळा व्यवस्थापन समीचे अध्यक्ष तथा सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रल्हाद कराळे सर यांनी सविस्तर केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन घोरपडे सर यांनी सुंदर केले. आता या वर्षी पहीली पुढील वर्षी दुसरी तिसरी, चौथी तर त्यापुढे टप्प्याटप्याने इयत्ता बारावी पर्यत सरकारी शाळा मध्ये सिबीएसई पॅटर्न चालू होणार असल्याने मुलांना दरवर्षी लागणारे खाजगी शाळांमधील फिस चे पैसे वाचणार, मुलांना सरकारी शाळा मध्येच दर्जेदार शिक्षण भेटणार यामुळे जिल्हा परिषद शाळांकडे पालक व विद्यार्थी यांचा कल वाढत आहे. असेच वातावरण पालम तालुक्यातील प्रत्येक गावागावातून पहातांना चर्चा करताना दिसत आहे.