परभणी (प्रतिनिधी) येथील ज्ञानोपासक शिक्षण मंडळाच्या वतीने “ऑपरेशन सिंदूर” यशस्वी झाल्याबद्दल महाविद्यालयात ज्ञानोपासक शिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मा. अॅड.. गणेशराव दुधगावकर यांच्या अध्यक्षतेखाली अभिनंदन सभेचे आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी अध्यक्षीय समारोप करतांना स्वातंत्राच्या पंच्याहत्तर वर्षात देशाने नेत्रदीपक अशी सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उन्नती केली आहे. संकट प्रसंगी देशातील सर्व घटकांच्या कल्याणासाठी जात, वंश, पंथ, धर्म व संप्रदाय विसरुन राष्ट्रीय एकात्मतेसाठी मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी याच्या सोबत राहुन भारतीय सैन्य दलाचे मनोबल वाढविले पाहीजे. दहशतवाद निर्माण होऊ नये म्हणुन प्राध्यापकांनी, शिक्षकांनी , विद्वानांनी व बुध्दिजीवीनी राष्ट्रहितासाठी सहयोग देणे ही काळाची गरज आहे.
या अभिनंदन सभेचे प्रास्ताविक प्राचार्य. प्रो.डॉ.शेख मो. बाबर यांनी केले. या प्रसंगी श्री.एच.एस.हाश्मी, प्राचार्य.प्रो. डॉ. श्रीधर भोंबे, उपप्राचार्य प्रा. विजय घोडके, श्री. उपेंद्र दुधगावकर आणि श्री. पद्माकर वरवंटे यांनी अभिनंदन ठरावाच्या अनुषंगाने मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी दहशतवादी हल्यातील मृत्युमुखी पडलेल्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली तर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.
या प्रसंगी ज्ञानोपासक शिक्षण मंडळाच्या सर्व शैक्षणिक संस्थेतील प्राध्यापकवृंद, शिक्षकवृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रो. डॉ. भिमराव खाडे यांनी तर आभार डॉ. सुजितसिंह परिहार यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, कार्यालयीन अधिक्षक व कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.