परभणी (प्रतिनिधी) संबोधी अकादमी, महाराष्ट्र व सामाजिक न्याय विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने परभणी येथे २४ वा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा रविवार, ता. १ जुन २०२५ रोजी जिंतूर रस्त्यावरील महात्मा फुले हायस्कुलच्या मैदानावर संपन्न झाला. या सोहळ्यात एकूण 81 जोडपे विवाहबद्ध झाले आहेत.
Iयावेळी प्रमुख अतिथी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे म्हणाले की, सामूहिक विवाह सोहळे घेणे हे फार मोठे सामाजिक कार्य असून ते गेल्या 24 वर्षांपासून संबोधी अकादमी करत आहे. आजपर्यंत 3000 जोडप्यांचे विवाह लावणे ही फार मोठी क्रांतिकारी बाब आहे. सामूहिक विवाह सोहळे वाढली पाहिजे असेही ते म्हणाले. यावेळी संबोधी अकादमीच्या वतीने जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला व परभणी येथे शांतता प्रस्थापित केल्याबद्दल मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विजयराव गव्हाणे म्हणाले की, या सोहळ्यात लाडक्या बहिणीची उपस्थिती जास्त आहे आणि त्यांनी संविधानाचे रक्षण करणे गरजेचे आहे. त्यांनी सामूहिक विवाह सोहळा आयोजनाबद्दल समाजभूषण हत्तीअंबीरे यांचे कौतुक केले. प्रमुख अतिथी महेबूब शेख, युवक प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) हे म्हणाले की, आजपर्यंत 3000 लग्न लावणे म्हणजे 3000 बहिणीचा भाऊ म्हणून समाजभूषण भीमराव हत्तीअंबीरे यांनी भूमिका बजावली आहे.
डॉ. सिद्धार्थ भालेराव, चेअरमन, डॉ.बा.आं. सह. सूतगिरणी, पेठशिवणी, हे म्हणाले की, सामूहिक विवाह सोहळे ही काळाची गरज आहे. कुणाल कांबळे, कार्यकारी संपादक, दै. वृत्तरत्न सम्राट म्हणाले की, अनावश्यक खर्चाला आळा घालून असे विवाह सोहळे आयोजित झाल्यास वैष्णवी हगवणे सारखे बळी जाणार नाहीत. तसेच ते म्हणाले की,कन्यादान योजनेचे अनुदान वेळेवर मिळण्यासाठी व अनुदान वाढ होण्यासाठी शासनाकडे पाठपुरवठा करणार आहे.यावेळी रितेश काळे,बी. एच. सहजराव, मिलिंद सावंत,डी. आर. तुपसुंदर, तारा खंदारे, हिंगोली आदि उपस्थित होते.
प्रास्ताविक करतांना समाजभूषण हत्तीअंबीरे, आयोजक तथा अध्यक्ष संबोधी अकादमी, महाराष्ट्र हे म्हणाले की, संबोधीने 24 वर्षांपासून सातत्य ठेवून बौद्ध, हिंदू, मुस्लिम अशे सर्वधर्मीय 3000 पेक्षा ज्यास्त जोडप्यानचे मोफत विवाह लावले आहेत.लग्न ही एक आवश्यक बाब आहे आणि त्यावर अनावश्यक खर्च होतो तो कमी झाला पाहिजे.त्यांनी अशीही खंत व्यक्त केली की,सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे अनुदान वेळेवर न मिळणे, अनुदानात वाढ न होणे यामुळे समाज सामूहिक विवाह सोहळ्याकडे पाठ फिरवत आहे.
यावेळी उत्कृष्ट आयोजनाबद्दल जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी समाजभूषण हत्ती अंबीरे यांचा सन्मान केला. तसेच संबोधीच्या वतीने यावेळी करण गायकवाड यांची स्वच्छता निरीक्षक, आरोग्य श्रेणी एक पदी पदोनत्ती झाल्याबद्दल व भीमप्रकाश गायकवाड यांचाही सन्मान करण्यात आला.
मंगलपरिणय विधी पू. भदंत पय्याबोधी थेरो, नांदेड यांच्या हस्ते व हिंदू पद्धतीचे विवाह माटेगावकर गुरु यांच्या हस्ते संपन्न झाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ममता पाटील यांनी तर आभार भगवान जगताप यांनी मानले. यशस्वीतेसाठी भगवानराव जगताप, विवाह सोहळा प्रमुख गौतम साळवे, संबोधीचे सचिव शेषराव जल्हारे, सिध्दार्थ भराडे, भीमराव पतंगे, सचिनराजे हत्तीअंबीरे,दि. फ. लोंढे, पाराजी गिरी, शैलेश डबडे,शशिकांत हत्तीअंबीरे, बबन शिंदे, बाळासाहेब अंभिरे, डॉ. लक्ष्मण कांबळे, मुरलीधर ढेंबरे, ॲड. सुनिल बगाटे,अविनाश मालसमिंदर,नवनाथ जाधव, भगवान मानकर, ज्ञानेश्वर हरकळ, दिलीप पाटील, रामप्रसाद घुगे, बद्रीनाथ घुले, बालाजी भुसारे, पंकज नरवाडे, अनिरुद्ध धरपडे, विशाल जल्हारे,बाळासाहेब किर्तने, विश्वनाथ डबडे, दि.फ. लोंढे, नवनाथ पैठणे, माधव मोते, गौतम कठाळे, राजेश चांदणे, एल.आर. कांबळे,आनंद खंदारे, भीमराव धबाले, राजेश पंडीत, बाबासाहेब भराडे, संतोष भराडे, संभाजी खिल्लारे, गंगाधर परसोडे, धनंजय रणविर, सोनाजी लांडगे,बाबुराव गवळी, अमोल भालेराव, माणिकराव धस,बाबासाहेब भुजावळे, दिपक जाधव, हेमंत घुगे, साहेबराव ढगे, उत्तम साळवे, अरुण पंचांगे, एकनाथ खंदारे, डॉ. नामदेव मुळे, प्रभाकर कांबळे, भीमराव श्रीखंडे, बंडू नरवाडे, सुर्यकांत उजगरे, सुरेश मगरे, बाबुराव गवळी, रोहिदास साखरे, गोमाजी श्रावणे आदींनी परिश्रम घेतले.