पालम (प्रतिनिधी) राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या माध्यमातून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये कर्तव्य आणि राष्ट्रीय निष्ठा यांची वाढ होते . त्यातूनच जबाबदार नागरिक घडत असतात. असे प्रतिपादन राष्ट्रीय रत्न भाई लक्ष्मणराव गोळेगावकर यांनी केले .
तालुक्यातील जवळा येथे माधवराव पाटील महाविद्यालय पालम च्या रोसयोचे वार्षिक विशेष शिबीर उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते. यावेळी उद्घाटक म्हणून भाई तुषार गोळेगावकर , प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीलदार विनोद पवार , सरपंच महानंदा खटींग.प्राचार्य डॉ . एच.टी. सातपुते , उपप्राचार्य डॉ.ए.डी आरसुळे व मुअ आनंद गिजे यांची प्रमुख उपस्थिती होती .पुढे बोलताना भाई लक्ष्मणराव गोळेगावकर म्हणाले की, शिबीर ग्रामीण भागात होत असल्याने ग्रामीण भागातील सर्वसामान्य लोकांचे प्रश्न विद्यार्थांना कळतील.येणाऱ्या काळात ग्रामीण विकासासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा .
यावेळी सर्व मान्यवरांचे भाषण झाले.कार्यक्रमाची सुरुवात एनएसएस गीताने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रमा धिकारी डॉ. गोवर्धन उरकुडे यांनी केले.तर आभार कार्यक्रमाधिकारी डॉ. मोहन डमरे यांनी मानले .यावेळी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी विद्यार्थिनी आणि प्राध्यापकांची ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती .
Monday, June 16
ताज्या बातम्या:
- डॉ पंकज खेडकर यांना राष्ट्रीय लोककल्याण पुरस्कार प्रदान
- भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे 25 वे जिल्हा अधिवेशन संपन्न ; ऍंड माधुरी क्षीरसागर यांची जिल्हा सरचिटणीस पदावर एकमताने निवड
- भगवानराव जोशी वालूरकर यांचे निधन
- स्टेडियम परिसरात दुकान समोर पाणी साचले; संबंधीत विभागाचे दुर्लक्ष
- कृती युक्त शिक्षणासाठी पालक कार्यशाळा यशस्वीरीत्या संपन्न
- परभणीत पहिल्यांदाच आयटीच्या संधी, जाहिर मुलाखतीत भविष्य उलगडणार
- आरपी हॉस्पिटलचा खाद्य सुरक्षा व मानके प्राधिकरणकडून सन्मान
- शाळेच्या पहिल्या व दुसऱ्या दिवशी साजरा होणार “शाळा प्रवेशोत्सव; विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढ आणि गुणवत्ता वृद्धीसाठी महत्त्वाचा उपक्रम