पालम (प्रतिनिधी) राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या माध्यमातून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये कर्तव्य आणि राष्ट्रीय निष्ठा यांची वाढ होते . त्यातूनच जबाबदार नागरिक घडत असतात. असे प्रतिपादन राष्ट्रीय रत्न भाई लक्ष्मणराव गोळेगावकर यांनी केले .
तालुक्यातील जवळा येथे माधवराव पाटील महाविद्यालय पालम च्या रोसयोचे वार्षिक विशेष शिबीर उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते. यावेळी उद्घाटक म्हणून भाई तुषार गोळेगावकर , प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीलदार विनोद पवार , सरपंच महानंदा खटींग.प्राचार्य डॉ . एच.टी. सातपुते , उपप्राचार्य डॉ.ए.डी आरसुळे व मुअ आनंद गिजे यांची प्रमुख उपस्थिती होती .पुढे बोलताना भाई लक्ष्मणराव गोळेगावकर म्हणाले की, शिबीर ग्रामीण भागात होत असल्याने ग्रामीण भागातील सर्वसामान्य लोकांचे प्रश्न विद्यार्थांना कळतील.येणाऱ्या काळात ग्रामीण विकासासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा .
यावेळी सर्व मान्यवरांचे भाषण झाले.कार्यक्रमाची सुरुवात एनएसएस गीताने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रमा धिकारी डॉ. गोवर्धन उरकुडे यांनी केले.तर आभार कार्यक्रमाधिकारी डॉ. मोहन डमरे यांनी मानले .यावेळी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी विद्यार्थिनी आणि प्राध्यापकांची ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती .
Saturday, February 7
ताज्या बातम्या:
- ज्येष्ठ पत्रकार नितीन धूत यांना सर्व पत्रकारातर्फे श्रद्धांजली अर्पण
- संत श्री गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त विविध कार्यक्रम; आत्मोन्नती प्रतिष्ठानचा उपक्रम
- शेतकरी व पशुपालकांना केंद्रबिंदू ठेवून प्रदर्शनाची तयारी करा- पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे
- मारोतराव लोमटे यांचे निधन
- ज्येष्ठ पत्रकार नितीन धूत यांची उद्या परभणीत शोकसभा
- यशस्वीतेसाठी कठोर परिश्रम आवश्यक- सर्वेश काबरा
- जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या मतदानासाठी कामगारांना भरपगारी सुट्टी
- केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला ऐतिहासिक निधी;, पायाभूत सुविधा व ऊर्जेला नवी दिशा — राज्यमंत्री मेघना बोर्डीकर


