परभणी, (प्रतिनिधी) जम्मू कश्मीर मधील पहलगाम येथे हिंदू पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याचा आमदार डॉ.राहुल पाटील यांनी तीव्र शब्दात निषेध केला असून याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये पहलगाम या भागात पर्यटकांवर हल्ला करून दहशतवाद्यांनी 28 पर्यटकांना ठार मारले,या घटनेमुळे देशभरात संताप व्यक्त होत आहे. अतिरेक्यांचा हा हल्ला निंदनीय आणि भ्याड असून केंद्र सरकारने तातडीने कठोर पावले उचलून अतिरेक्यांचा शोध घेऊन त्यांना कठोर शिक्षा द्यावी, दहशतवादाला समूळ नष्ट करावे अशी मागणी आमदार डॉ. राहुल पाटील यांनी केली आहे आमदार पाटील यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी शिवसेना सह संपर्कप्रमुख डॉ. विवेक नावंदर,युवासेना जिल्हाप्रमुख अर्जुन सामाले,उपजिल्हा प्रमुख संजय गाडगे,तालुका प्रमुख नंदू पाटील,महिला आघाडीच्या विधानसभा संघटक अंबिका डहाळे,माजी जिल्हा प्रमुख संदीप भंडारी,माजी शहर प्रमुख अनिल डहाळे,अरविंद देशमुख,शहरप्रमुख ज्ञानेश्वर पवार, माजी नगरसेवक प्रशास ठाकूर, विशू डहाळे, फैजुल्ला पठाण,भैया भारती, निखिल जैन गणेश मुळे, गौतम भराडे, सचिन गारुडी, गोविंद इकर,बंडू जाधव, गजेंद्र चट्टे, रुस्तुम नाईकवाडे, लक्ष्मण बोबडे,श्यामा चांडक, दीपा बोरुळ आदी उपस्थित होते.
Monday, June 16
ताज्या बातम्या:
- भगवानराव जोशी वालूरकर यांचे निधन
- स्टेडियम परिसरात दुकान समोर पाणी साचले; संबंधीत विभागाचे दुर्लक्ष
- कृती युक्त शिक्षणासाठी पालक कार्यशाळा यशस्वीरीत्या संपन्न
- परभणीत पहिल्यांदाच आयटीच्या संधी, जाहिर मुलाखतीत भविष्य उलगडणार
- आरपी हॉस्पिटलचा खाद्य सुरक्षा व मानके प्राधिकरणकडून सन्मान
- शाळेच्या पहिल्या व दुसऱ्या दिवशी साजरा होणार “शाळा प्रवेशोत्सव; विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढ आणि गुणवत्ता वृद्धीसाठी महत्त्वाचा उपक्रम
- ड्रॅगन बोट सारख्या जलक्रीडा प्रकाराला प्रोत्साहन देण्याची आवश्यकता – आ.रत्नाकर गुट्टे
- मौजे पेडगाव येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त उद्या व्याख्यानाचा कार्यक्रम