परभणी ( प्रतिनिधी ) परभणी जिल्ह्यातील गोदापात्र कोरडे पडले असून जनतेस पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे , यासाठी गोदावरी नदी पात्रात पाणी सोडणे आवश्यक आहे अशी मागणी आ राजेश विटेकर यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून केली
अत्यंत दूरदृष्टीने मराठवाड्यात उभारलेल्या विष्णुपुरी टप्पा दोन अंतर्गत येणारे खडका, मुदगल, तारू गव्हाण, ढालेगाव व नाथरा साखळी बंधारे हे प्रत्येकी 1.10 टीएमसी क्षमतेचेचे असून सदरील बंधाऱ्यांनी तळ गाठला आहे. सदरील बंधाऱ्यावर एकूण जवळपास 20 हजार हेक्टर क्षेत्र हे याच सिंचनावर अवलंबून आहे. या बंधाऱ्यावरील क्षेत्रामध्ये ऊस क्षेत्र व फळबाग लागवड क्षेत्र हे अधिक असून सदरील पिकांना सद्यस्थितीत पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे. शिवाय सोनपेठ शहर व अनेक खेडी पिण्याच्या पाण्यासाठी या बंधार्यावर अवलंबून आहेत. सदरील बंधाऱ्यात जायकवाडीचे पाणी नदीपात्राद्वारे अथवा इतर मार्गाने सोडून सदरील बंधारे भरून ( रिचार्ज करून) देण्यात यावेत. जेणेकरून पिण्याच्या पाण्या सह ऊस लागवड क्षेत्र व फळबाग लागवड क्षेत्र यांचे नुकसान होणार नाही तसेच अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल.
गोदावरी नदी पात्रात असलेल्या बंधाऱ्यात पाणी साठवणुकीसाठी जायकवाडी धरणातून नदी पात्रात पाणी सोडण्यात यावे , तसे निर्देश कार्यकारी संचालक गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विभाग छत्रपती संभाजीनगर यांना देण्यात यावेत अशी मागणी आ राजेश विटेकर यांनी त्यांना भेटून केली आहे