परभणी (प्रतिनिधी) भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे 25 वे जिल्हा अधिवेशन परभणी येथे दि 15 जून 2025 रोजी कॉम्रेड गोविंद पानसरे सभागृह (औषधी भवन) येथे संपन्न झाले या अधिवेशनात दि 9 जुलै रोजी भाजप सरकारच्य कामगार शेतकरी विरोधी धोरणांच्या निषेधार्थ देशव्यापी आंदोलनानिमित्त शेतकरी व कामगारांच्या कर्जमाफी कामगार कायदे गायरान आणि भूसंपादन यासह महत्वाच्या प्रश्नावर जिल्हाभर सत्याग्रह आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या अधिवेशनात 35 सदस्यांची जिल्हा कौन्सिल निवडण्यात आली. माधुरी क्षीरसागर यांची जिल्हा सरचिटणीस पदावर एकमताने निवड करण्यात आली तसेच ओमकार पवार आणि शेख अब्दुल यांची सहसचिव पदावर एकमताने निवड करण्यात आली.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या संघटनात्मक अधिवेशनांची मालिका सुरु असून दि 15 जून रोजीच्या जिल्हा अधिवेशन पाठोपाठ दि 22 जून रोजी नाशिक येथे राज्य अधिवेशन भरवण्यात येत आहे तर राष्ट्रीय अधिवेशन चंदिगढ येथे आयोजित करण्यात आले आहे.
भाकपा च्या 25 व्या जिल्हा अधिवेशनाचे उदघाटन भाकपा महाराष्ट्र कार्यकारिणी कॉम्रेड अभय टाकसाळ(छ संभाजीनगर) यांनी केले. अधिवेशनाच्या व्यासपीठाला कॉम्रेड गोविंद पानसरे विचार मंच हे नाव देवून प्रतिगामी शक्ती विरुद्ध लढा करण्याचा निर्धार करण्यात आला.
चार्वाक दर्शन मंडळाचे संयोजक सुरेश इखे यांनी आपल्या भाषणात सुरजागड येथील खाण प्रकल्पातील कार्पोरेट हितसंबंधासाठी 1 लाख 23 हजार झाडांची व जंगलाची कत्तल केली जात असून याचे पर्यावरणावर भीषण परिणाम स्पष्ट केला याच कारणासाठी शक्तीपीठ महामार्गाचा वरवंटा शेतकऱ्यांवर फिरवण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे त्याचा प्रतिकार करण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी मार्गदर्शन करताना भाकपा सचिव मंडळ सदस्य कॉम्रेड राजन क्षीरसागर यांनी भाजपा सरकार शेतकऱ्यांशी शत्रुभाव ठेवून धोरणे आखीत आहे. अमेरिकेच्या दबावाखाली पहलगाम हल्ल्यातील दोषी अतिरेक्यांना पकडण्या पूर्वीच सीजफायर (युद्धबंदीची घोषणा केली) परराष्ट्र धोरण असो कि व्यापार विषयक करार अमेरिकेची शरणागती पत्करून भाजपा सरकार जनतेशी विश्वासघात करीत आहे. अदानी कार्पोरेट च्या हितसंबंधासाठी परराष्ट्र धोरण बदलले जात असल्याच आरोप त्यांनी केला.
या अधिवेशात परभणी जिल्ह्यातील सर्व 9 तालुक्यातील पदाधिकारी सहभागी होते. या अधिवेशनासाठी मुंजाभाऊ लिपणे, शेख अब्दुल, ओमकार पवार सय्यद अझहर यांनी अध्यक्ष मंडळाचे कामकाज पहिले. मागील 3 वर्षाचा कार्य अहवाल माधुरी क्षीरसागर यांनी मांडला. तसेच पुढील महत्वाच्या विषयावर ठराव पारित करण्यात आले. शेतकऱ्यांना सर्वकष कर्जमाफी लागू करा. पीकविमा योजनेतल शेतकरी विरोधी तरतुदीत बदल करून एक रुपयात पीकविमा लागू करा.
अर्बन-नक्षल नावखाली कामगार शेतकऱ्यांच्या आवाज दाबणारे जन सुरक्षा विधेयक रद्द करा. सक्तीची हिंदी लादणारे नवे शैक्षणिक धोरण रद्द करा. मोबाईल द्वारे गेमिंग व जुगार यावर बंदी घाला. मानवत रोड -पाथरी सोनपेठ परळी नवीन रेल्वे मार्गाचे काम तत्काळ सुरु करा. सिंचन व पाणी वाटपातील भेद भाव बंद करा. गायरान आणि देवस्थान जमिनी कसणार्या शेतकऱ्यांच्या नावे करा. दि 9 जुलै रोजी भाजप सरकारच्य कामगार शेतकरी विरोधी धोरणांच्या निषेधार्थ देशव्यापी आंदोलनानिमित्त जिल्हाभर सत्त्याग्रह यशस्वी करा. इत्यादी ठराव पारित करण्यात आले. या अधिवेशनात 35 जणांची जिल्हा कौन्सिल पुढील प्रमाणे निवडण्यात आली माधुरी क्षीरसागर (जिल्हा सरचिटणीस) शेख अब्दूल(सह सचिव) लक्ष्मण काळे, सय्यद अझहर, प्रसाद गोरे, देविदास खरात वर्षा चव्हाण (परभणी) मुन्जाभाऊ लिपणे, नवनाथ कोल्हे, अंगद भोरे, सिकंदर शेख (पाथरी) आसाराम बुधवंत, आसाराम जाधव, लक्ष्मण घोगरे मधुकर गाडेकर (जिंतूर) शिवाजी कदम, मुरली पायघन दयानंद यादव बाळासाहेब सोनावणे (सोनपेठ) अरुण हरकळ, बालजी पौळ सय्यद इब्राहीम (सेलू) ओंकार पवार(सह सचिव) मुगाजी बुरुड, शेख सरवर, योगेश फड (गंगाखेड) लिंबाजी कचरे रमेश साठे (मानवत) वैजनाथ भोरे, नरहरी काळे (पूर्णा) संजय शेळके (पालम) यासह 5 जागा रिक्त ठेवण्यात आल्या