परभणी, (प्रतिनिधी) – राष्ट्रीय खाद्यतेल अभियान – तेलबिया अभियान सन 2025-26 अभियान अंतर्गत सोयाबीन व करडई या पिकासाठी परभणी जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. सदर अभियानाच्या अंमलबजावणीमध्ये पिकनिहाय मुल्य साखळी भागीदार म्हणून शेतकरी उत्पादक कंपनीची निवड करण्यात येणार आहे.
या अभियानांतर्गत जिल्हा तेलबिया समितीने निवड केलेल्या मुल्य साखळी भागीदार यांचेमार्फत शेतकरी प्रशिक्षण, प्रमाणित बियाणे वितरण, शेतकरी शेतीशाळा इत्यादी घटक राबवायचे आहेत. तरी याबाबतचे निकष खालीलप्रमाणे आहेत.
परभणी जिल्ह्यातील पिकनिहाय मुल्य साखळी भागीदार म्हणुन शेतकरी उत्पादक कंपनीची निवड करण्यासाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालयाकडे आपले परिपुर्ण प्रस्ताव सादर करावेत. पात्रता निकष- कंपनी कायदा किंवा सहकारी कायद्यांतर्गत नोंदणी केलेली असावी. ज्या तालुक्यात समुह तयार झाला आहे तेथेकाम करण्याचा किमान 3 वर्षाचा अनुभव असावा म्हणजेच नोंदणी माहे मार्च 2022 पुर्वीची असावी. किमान 200 शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये (FPC) नोंदणीकृत असावी. मागील 3 वर्षातील सरासरी वार्षिक उलाढाल 9 लाख रु. पेक्षा जास्त असावी. शेतकरी उत्पादक कंपनी शेतक-यांचा किमान 3 लाख रु. चा समभाग असावा. सरकारकडुन अनुदान प्राप्तकर्त्या शेतकरी उत्पादक संघाला प्राधान्य दिले जाईल.
उपरोक्त निकष पुर्ण करणा-या शेतकरी उत्पादक कंपन्यांनी परीपुर्ण प्रस्ताव आपले संबधित तालुक्यातील तालुका कृषि अधिकारी कार्यालयाकडे दि. 9 मे 2025 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दौलत चव्हाण यांनी केले आहे.
*-*-*-*-*