Author: Lok Sanchar

परभणी (प्रतिनिधी) रस्काराने जबाबदारीची जाणीव होते. माणूस अधिक सक्षमपणे कार्य करू लागतो. सुभेदार बंधू पुरस्कार हा शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी, आणि विद्यार्थ्यांसाठी ऊर्जावान आणि प्रेरणादायी असाच आहे. नूतन विद्यामंदिर शिक्षण संस्थेच्या जडणंघडणीत स्व.रावसाहेब जामकर साहेबांना स्व.राजाभाऊ आणि ॲड.बाळासाहेब सुभेदार या बंधुव्दयांची दमदार साथ लाभली.आज ही हा आदर्श वारसा आमची पीढी आणि आमच्या नंतरची पीढी समर्थपणे चालवत आहे. सुभेदार परिवाराचे स्वागत करत अध्यक्षिय समारोपात विजयसिंह जामकर यांनी पुरस्काराचे मानकरी यांना शुभेच्छा दिल्या. नूतन विद्यामंदिर शिक्षण संस्था, परभणी आणि सुभेदार परिवाराच्या वतीने आयोजित स्व.सुभेदार बंधू उत्कृष्ट शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी सेवा गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात विजयसिंह जामकर बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे…

Read More

परभणी, (प्रतिनिधी)  : परभणी जिल्ह्यातील गाव व पाड्यांना पाणीपुरवठा सुरळीत, नियमित व गुणवत्तापूर्ण व्हावा, यासाठी आवश्यक ती सर्व कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावीत, अशा सूचना पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिल्या. मुंबई येथील निर्मल भवन येथे परभणी जिल्ह्यातील पाणीपुरवठा विषयक आढावा बैठक मंगळवारी (दि. 14) आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी महाराष्ट्र जलजीवन मिशनचे व्यवस्थापकीय संचालक ई. रवींद्रन उपस्थित होते. दूरदृष्टी संवाद प्रणालीद्वारे बैठकीत परभणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नीतीशा माथुर तसेच संबंधित अधिकारी सहभागी झाले होते. या बैठकीमध्ये जलजीवन मिशन, जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एमजेपी)…

Read More

परभणी  (प्रतिनिधी) सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात विद्यार्थ्यांना स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी प्रत्येक विषयाच्या मूलभूत संकल्पना ज्ञात होणं गरजेचे आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा विकसित करणे गरजेचे आहे. या स्पर्धेत टिकण्यासाठी पालक व शिक्षक यांनी सजग व जागृत राहणे आवश्यक आहे. करिअरच्या प्रत्येक क्षेत्रात आता स्पर्धात्मक परीक्षेचे आव्हान विद्यार्थ्यांपुढे आहे. अशा स्पर्धात्मक परीक्षेत टिकण्यासाठी विद्यार्थ्यांना पायाभूत शिक्षण देऊन त्यांच्या मूलभूत संकल्पना विकसित केल्या पाहिजे.* असे प्रतिपादन बाल विद्यामंदिर शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. विवेक नावंदर यांनी केले. शहरातील बाल विद्या फाउंडेशनच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ व मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन अक्षदा मंगल कार्यालय येथे करण्यात आले होते. यावेळी…

Read More

परभणी: (प्रतिनिधी) कोणतीही कला परीक्षेमध्ये मार्क मिळवीण्या पेक्षाही जिवन जगण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते असे प्रतिपादन उपेंद्र दुधगावकर यांनी केले. ते ज्ञानोपासक महाविद्यालयात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ला अनुसरून सांस्कृतिक या को-करीकुलर कोर्स साठीचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्हावे यासाठी एक दिवशीय सांस्कृतिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलत होते. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने या विषयासाठी विविध कलाप्रकार शास्त्रीय गायन, सुगम गायन,शास्त्रीय नृत्य भरतनाट्यम,महाराष्ट्राची लावणी, नाट्य, लोककला, जलसा, संहिता लेखन इत्यादी विषयाच्या अनुषंगाने मार्गदर्शक मुख्याध्यापक उपेंद्र दुधगावकर, पंकज खेडकर, त्र्यंबक वडस्कर, ऐश्वर्या डावरे आणि दासराव पुंडगे यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी कोणतीही कला परीक्षेमध्ये मार्क मिळवीण्या पेक्षाही जिवन जगण्यासाठी…

Read More

परभणी (प्रतिनिधी) परभणी शहरातील डॉ. राहुल पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आर.पी. हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूटने ग्रामीण आणि मागास भागात वैद्यकीय सुविधांचा नवा पायंडा पाडला आहे. गेल्या एका वर्षात हॉस्पिटलच्या कार्डिओलॉजी विभागाने 1000 जटिल एन्जोप्लास्टी,एन्जोग्राफी यशस्वीरीत्या पूर्ण करून आरोग्य क्षेत्रात क्रांती घडवली आहे. विशेष म्हणजे, या प्रक्रियेत एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही, ही बाब परभणीच्या वैद्यकीय इतिहासातील सुवर्णपान ठरली आहे. यात प्रामुख्याने लहान बालकांच्या हृदयाच्या शस्त्रक्रिया देखील करण्यात आल्या आहेत. या यशस्वी प्रवासात कार्डिओलॉजिस्ट डॉ.दिपक कुबडे आणि त्यांच्या संपूर्ण टीमने मोलाची भूमिका बजावली. वैद्यकीय अधीक्षक डॉ.अमर तडवी, तसेच मेडिसिन विभागातील तज्ञ डॉ. दैठणकर, डॉ. संतोष हारकळ, डॉ.शहाजी बोडखे, आणि डॉ.सलाम तांबोळी…

Read More

परभणी,(प्रतिनिधी) : येथील क्रांती नगरातील शेख जावेद शेख युसूफ या व्यक्तीच्या खून प्रकरणात जावेद खान गफार खान या आरोपीस प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती यु.एम. नंदेश्‍वर यांनी आज बुधवारी (दि.08) आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली. येथील कोतवाली पोलिस ठाण्यात 18 जून 2022 रोजी परवीन बेगम शेख जावेद या महिलेने एक तक्रार दाखल केली. त्याद्वारे, तीचे पती शेख जावेद शेख युसूफ यांचा आरोपी जावेद खान गफार खान याने कुर्‍हाडीने गळ्यावर, डोक्यावर वार करीत निर्घृण खून केल्याचे नमूद केले. आरोपी जावेद खान याचा अवैध गॅस विक्रीचा व्यवसाय आहे. त्याने पंधरा दिवसांपूर्वीच आपले पती शेख जावेद यांच्याकडून गॅस सिलेंडर नेले परंतु, ते सिलेंडर…

Read More

परभणी,(प्रतिनिधी) : नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना संकटाच्या या काळात मदतीचा हात म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 31 हजार 628 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले असून या पॅकेजनुसार या जिल्ह्यातील 52 महसूल मंडळातील आपदग्रस्त शेतकर्‍यांना कोरडवाहू शेतीसाठी प्रति हेक्टरी 18 हजार 500 रुपये, हंगामी बागायतीसाठी 27 हजार रुपये तर बागायतीसाठी प्रति हेक्टरी 32 हजार 500 रुपये मदत दिली जाणार आहे, अशी माहिती जिल्ह्याच्या पालकमंत्री सौ. मेघना साकोरे बोर्डीकर यांनी बुधवारी (दि.08) पत्रकार परिषदेतून दिली. पालकमंत्री सौ. साकोरे बोर्डीकर यांच्या जिंतूर रस्त्यावरील जनसंपर्क कार्यालयात बुधवारी दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे, डॉ. केदार खटींग,…

Read More

परभणी, (प्रतिनिधी)ःआधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतीत उत्पन्न वाढत आहे त्यामुळे आपल्या भागातील शेतकऱ्यांनी ए आय या तंत्रज्ञानाचा वापर करून आपले उत्पन्न दीडपट करावे असे आवाहन आ.डॉ.राहुल पाटील यांनी केले तालुक्यातील पिंगळी बाजार येथील श्रीक्षेत्र गोकुळनाथ येथे पिंगळी विभागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी  श्रीलक्ष्मी नृसिंह शुगर्सच्या वतीने बुधवार दिनांक 8 ऑक्टोबर रोजी परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यावेळी आ.पाटील बोलत होते या मेळाव्याला ज्येष्ठ संचालक न. ची. जाधव, जनरल मॅनेजर सुभाष सोलव, मुख्य शेती अधिकारी तुळशीराम अंभोरे, ऊस विकास अधिकारी समर्थ अवचार, गंगाधर शिरपूरकर, ऊस पुरवठा अधिकारी नवनाथ कराळे, भूषण चांडक , विनायक पवार,उत्तमराव मुळे, सदाशिव देशमुख, गंगाधर गाडगे, तानाजीमामा भोसले, अशोकराव गरूड, अंबादासराव…

Read More

परभणी (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टी परभणी महानगर कार्यालय, वसमत रोड येथे आज झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात मोठ्या संख्येने तरुण कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष शिवाजीराव भरोसे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजपात प्रवेश केला. पक्षप्रवेश करणाऱ्यांमध्ये आदित्य थिटे, वेदांत शिंदे, अमित बायस, स्वयंम पदमगिरवर, समय कदम, अथर्व कदम, प्रथमेश भरोसे, प्रसाद शिंदे, गणेश चिलपीपरे, समर्थ देवडे, सौरभ देवकते, यश घाटोल, रितेश शिंदे, अर्जुन परिहार, जय थिटे, ओंकार पाते, हर्षल काळे, आयुष कदम, केदार अंबेकर, यश डोंगरकर, वेदांत डोंगरकर, सिद्धांत शिंदे, व्यंकटेश काळबांडे, हरिदास काळबांडे, रवि शिंदे, चक्रधर गरड, बाळा घनसावंगी, अमेर शेख, विवेक काळे, दिनेश राखोंडे, कार्तिक आणेरव, कृष्णा काळे, सुमित सातपुते, गौरव कांकल, अनिकेत…

Read More

परभणी/ प्रतिनिधी — मराठवाड्यात हैद्राबाद गॅझेट लागू झाल्यानंतर बंजारा समाजाला अनुसूचित जमातीत (एसटी) सामावून घेऊन आरक्षण देण्याच्या प्रमुख मागणीसाठी परभणीत मंगळवार ७ ऑक्टोबर रोजी विराट मोर्चा काढण्यात येऊन या मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर झाले. या मोर्चात मोठ्या संख्येने बंजारा बांधव सहभागी झाले होते, अशी माहिती बंजारा समाजाचे नेते तथा सोनपेठचे माजी नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड यांनी दिली आहे. बंजारा समाजाचे नेते तथा सोनपेठचे माजी नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड यांच्यासह अनेक बंजारा समाजाचे नेतेच्या उपस्थितीत हा मोर्चा काढण्यात आला. हैदराबाद संस्थान गॅजेटच्या धर्तीवर बंजारा समाजाला अनुसूचित जमातीतून (एस.टी.) प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मंगळवार दि.७ रोजी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर एक लाख समाज बांधवांचा…

Read More