परभणी ( प्रतिनिधी) बामसेफचे 42 वे आणि भारत मुक्ती मोर्चाचे 15 वे राष्ट्रीय अधिवेशन संविधानाच्या आर्टिकल 19 नुसार घेण्याचा अधिकार असताना सुद्धा तो अधिकार नाकारण्यात आला आणि ओबीसींची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे यासाठी हे संपूर्ण अधिवेशन समर्पित होतं . अशा या राष्ट्रीय अधिवेशनाला ओडिसा राज्याततील कटक जिल्ह्यात चे कलेक्टर यांनी अधिवेशन घेण्याचे नाकारून संविधानाच उल्लंघन केल्याच्या निषेधार्थ भारत मुक्ती मोर्चा आणि राष्ट्रीय ओबीसी मोर्चा या संघटने द्वारे हे निवेदन देण्यात आले. याबाबत सविस्तर माहिती अशी की, बॅकवर्ड मायनॉरिटीज कम्युनिटीज एम्प्लॉईज फेडरेशन म्हणजेच बामसेफ या राष्ट्रव्यापी संघटनेचे 42 वे राष्ट्रीय अधिवेशन आणि भारत मुक्ती मोर्चाचे 15 वे राष्ट्रीय अधिवेशन ओरिसा राज्यातील…
Author: Lok Sanchar
परभणी (प्रतिनिधी) मी आरसा आहे, मी सच्चाई दाखवतो; मात्र अनेकांना सत्य पाहणे आवडत नाही,” असे सांगत पत्रकार समाजाला सत्याचे दर्शन घडवतात, असे प्रतिपादन परभणीचे जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले. दर्पण दिनानिमित्त मराठी पत्रकार परिषद संलग्न परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित मुख्य कार्यक्रमात ते पत्रकारांना संबोधित करत होते. जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले की, समाजाचे शिक्षक म्हणून पत्रकारांवर मोठी जबाबदारी आहे. विविध प्रकारचे दबाव, अडचणी असूनही पत्रकार चांगले वृत्तांकन करू शकतात आणि समाजाला योग्य दिशा देऊ शकतात. टिळक, आगरकर, अत्रे हेच समाजाचे शिक्षक होते असे नाही, तर आजचे पत्रकारही समाजाचे शिक्षक म्हणून काम करत आहेत. समाजातील चांगल्या-वाईट गोष्टी पत्रकार दाखवत असतात.…
पत्रकारांसाठी सर्व रोगनिदान शिबिर संपन्न, व्हॉईस ऑफ मीडियाचा उपक्रम परभणी (शहर प्रतिनिधी): जगभरातील विकसित देशांमध्ये आजार टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यावर भर दिला जात असून आज भारत देशात त्याची खरी गरज आहे, असे प्रतिपादन डॉ.रामेश्वर नाईक यांनी केले. मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून दर्पण दिनानिमित्ताने व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने परभणीतील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात मंगळवारी (दि.6) सकाळी सर्व पत्रकारांसाठी सर्व रोगनिदान तपासणी शिबीर घेण्यात आले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉ. नाईक बोलत होते. शिबिराचे अध्यक्ष म्हणून श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव उपस्थित होते. याप्रसंगी व्यासपीठावर डॉ.विजय मुंढे, डॉ.अंकित मंत्री, डॉ.ज्ञानेश्वर हरबक, डॉ.प्रणव कुलकर्णी,…
परभणी,(प्रतिनिधी) : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकीत विकासाचे मुद्देच हे प्राधान्याने मांडले पाहिजेत तसेच नेतेमंडळींसह उमेदवार व कार्यकर्त्यांनी विकासाचे मुद्देच प्रभावीपणे व ठासून मांडले पाहिजेत असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी मार्गदर्शन करताना सांगितले येथील अक्षदा मंगल कार्यालयाच्या सभागृहात महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाद्वारे आज मंगळवारी संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्ह्याच्या पालकमंत्री सौ. मेघना साकोरे बोर्डीकर, ज्येष्ठ नेते माजी मंत्री सुरेश वरपुडकर, ज्येष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद वाकोडकर, प्रदेश कार्यकारणी सदस्य रामकिशन रौंदळे, मोहन कुलकर्णी, महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, माजी जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे…
परभणी,(प्रतिनिधी) : गेल्या काही वर्षातील बदलत्या परिस्थितीमुळे पत्रकारितोसमोर सुध्दा मोठ मोठी आव्हाने उभी राहीली आहेत. ही आव्हाने माध्यमांना, पत्रकारांना स्विकारावी लागणार आहेत, तरच टीकाव लागणार आहेत, असे मत ज्येष्ठ पत्रकार श्रीमती हेमा रसाळ यांनी व्यक्त केले. आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना दर्पण दिनानिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम येथील पत्रकार भवन ट्रस्टद्वारे पत्रकार भवनात आज मंगळवारी आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी ज्येष्ठ पत्रकार विजय जोशी हे अध्यक्षस्थानी होते. पत्रकारिता क्षेत्रात दिवसेंदिवस मोठे बदल होत बदल स्विकारल्याशिवाय गत्यंतर नाही. स्पर्धेत टिकावयाचे असेल, तर हे बदल स्विकारणे अनिवार्य आहे. त्यामुळेच नव्या पिढीने हे बदल ओळखले पाहिजेत, स्विकारले पाहिजे, त्याद्वारे याक्षेत्रात…
परभणी, (प्रतिनिधी) : जिल्हा माहिती कार्यालयात पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मोठ्या संख्येने पत्रकार बांधव उपस्थित होते. आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे मराठी पत्रकारितेचे जनक म्हणून ओळखले जातात. त्यांनी दि. 6 जानेवारी 1832 रोजी ‘दर्पण’ हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले, ज्यामुळे हा दिवस महाराष्ट्रात ‘पत्रकार दिन’ म्हणून साजरा होतो; ते एक समाजसुधारक, शिक्षक, इतिहास संशोधक आणि लेखक होते. सर्व उपस्थितांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. श्री. धोंगडे यांनी उपस्थितांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.…
परभणी (प्रतिनिधी) येथील प्रगतशील शेतकरी प्रभाकरराव गणपतराव सराफ यांचे सोमवारी सकाळी वृद्धकाळामुळे निधन झाले. मृत्यूसमयी ते 89 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात प्रसिद्ध विधीज्ञ राजेंद्र सराफ, रेणुका मंगल कार्यालयाचे संचालक महेश सराफ या दोन मुलांसह सून,तीन कन्या, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. दरम्यान सराफ यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी पाच वाजता जिंतूर रस्त्यावरील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तत्पूर्वी गव्हाणे रस्त्यावरील सराफ यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा निघणार आहे. जून्या पिढीतील सराफ हे मराठवाडा कृषी विद्यापीठातील पहिल्या बॅचचे बीएस्ससी ऍग्री पदवीधारक होते.उत्तम, प्रगतशील शेतकरी, मार्गदर्शक म्हणून सुपरिचित होते. क्रीडा क्षेत्रात बॅडमिंटनचे ते चॅम्पियन होते. कुस्ती, हॉकी व फुटबॉल या खेळाचे सुध्दा ते…
परभणी (प्रतिनिधी) गुरुमाऊली आयुर्वेद व लायन्स क्लब प्रिंस यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सुवर्णप्राशन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम दि. ५ जानेवारी २०२५ रोजी, गुरुमाऊली आयुर्वेद, जामकर कॉम्प्लेक्स, जिंतूर रोड, परभणी येथे सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत पार पडणार आहे. या उपक्रमाचा लाभ ० ते १५ वयोगटातील बालकांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. सुवर्णप्राशन : एक वैज्ञानिक दृष्टिकोन सुवर्णप्राशन हा आयुर्वेदातील एक महत्त्वाचा संस्कार असून बालकांच्या शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकासासाठी तो अत्यंत उपयुक्त मानला जातो. कश्यपसंहिता व वृद्ध जीवक तंत्र या प्राचीन आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये सुवर्णप्राशनचे वर्णन “बालकांच्या आरोग्याचा पाया” असे करण्यात आले आहे. वैज्ञानिक आधार…
परभणी (प्रतिनिधी)प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी दि 3 जानेवारी 26 रोजी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने साजरी करण्यात आली. या प्रसंगी बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष इंजिनीयर एम एम भरणे यांनी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून व भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा परभणीच्या सर्व पदाधिकारी यांनी पुष्प समर्पित करुन अभिवादन केले. या प्रसंगी बौद्ध महासभेचे कोषाध्यक्ष दशरथ गायकवाड, समता सैनिक दलाचे डिव्हिजनल ऑफिसर सुनील पवार व समता सैनिक दलाचे जवान उपस्थित होते. तसेच भारत खाडे, वामन खराटे,एस एस साळवे,एम.एम बरे,, गोपीनाथ कांबळे , बाबासाहेब धबाले,पी एल वानखेडे, राजकुमार एंगडे,आदींची उपस्थिती होती, शेवटी दशरथ गायकवाड…
*“हिंद-दी-चादर” कार्यक्रमाच्या माध्यमातून लाखो लोकांपर्यंत गौरवशाली इतिहास पोहचणार* नांदेड, (प्रतिनिधी)- “हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आयोजित उपक्रमाचा ‘आरंभता की अरदास’ हा विधी आज नांदेड येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मैदानावर भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. यावेळी मुख्य कार्यक्रमाच्या मंडपाचे भूमीपूजन तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वाराचे पंचप्यारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सिख, सिकलीगर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल, वाल्मीकि, भगत नामदेव संप्रदाय व उदासीन संप्रदाय या समाजातील संतांची उपस्थिती लाभली होती. “हिंद-दी-चादर” कार्यक्रमाचा औपचारिक प्रारंभ तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारा अबचलनगर नांदेडचे मुख्य जथ्थेदार संत बाबा कुलवंत सिंगजी यांच्यासह भाई जोसिंदर सिंगजी, भाई राम…

