Author: Lok Sanchar

परभणी (प्रतिनिधी) जनतेचे शिवसेनेवर मोठी प्रेम आहे यातूनच हा मतदारसंघ सातत्याने शिवसेनेच्या पाठीशी राहिलेला असताना निवडून आलेले लोकप्रतिनिधी गद्दर होण्याची परंपरा लागली आहे मात्र आता गद्दारांना काढून टाकण्यासाठी महात्मा फुले यांचा आसूड कार्यकर्त्यांना चालवावा लागणार आहे असे असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी येथे केले अक्षदा मंगल कार्यालयात निष्ठावंतांच्या मेळाव्यात पक्षप्रमुख ठाकरे यांनी शिवसेनेची बंडखोरी केलेल्या सहा खासदारांवर कडाडून टीका केली. शिवसेनेमुळेच दोन पत्र्याच्या खोलीतून हजारो कोटींचे मालक झालेल्या झालेल्यांना केवळ स्वार्थ जडला आहे. मात्र जनताच त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास व्यक्त करताना खा. संजय जाधव यांच्याकडे निर्देश केला. देशात भाजप ने सुरू केलेल्या फोडाफोडीच्या राजकारणावर…

Read More

परभणी, (प्रतिनिधी) : राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यात रविवारी (दि. २८ जून) राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ० ते ५ वर्षे वयोगटातील एकही बालक पोलिओ प्रतिबंधक लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने व्यापक नियोजन केले आहे. ‘दोन थेंब पोलिओचे, आरोग्याच्या सुरक्षेचे’ या ब्रीदवाक्यानुसार सर्व पालकांनी आपल्या पाच वर्षांखालील बालकांना २८ जून रोजी जवळच्या पोलिओ बुथवर नेऊन पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजावेत, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. या मोहिमेसाठी जिल्हाभर १,६२३ पोलिओ बुथ उभारण्यात आले असून २ लाख १९ हजार ८४५ बालकांना पोलिओ प्रतिबंधक डोस देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.…

Read More

*कृषी विद्यापीठात ‘कॉमन इन्क्युबेशन सेंटरचे’ उद्घाटन* परभणी, (प्रतिनिधी) : केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान हे रविवारी (२८ जून) परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथे आयोजित कार्यक्रमात ते कॉमन इन्क्युबेशन सेंटरचे उद्घाटन करणार आहेत. दौऱ्यानुसार, केंद्रीय मंत्री चिराग पासवान हे दुपारी ३.३० वाजता नांदेड येथून वाहनाने परभणीकडे रवाना होतील. सायंकाळी ४.३० वाजता ते वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे पोहोचतील. येथे ते कॉमन इन्क्युबेशन सेंटरचे उद्घाटन करतील. कार्यक्रमानंतर सायंकाळी ५.३० वाजता ते छत्रपती संभाजीनगरकडे रवाना होणार आहेत. ***

Read More

परभणी (प्रतिनिधी) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची रविवार दिनांक 28 जून रोजी शहरातील अक्षदा मंगल कार्यालय येथे सकाळी 10 वाजता जाहीर सभा होत आहे. ‘ऑपरेशन टायगर’च्या पार्श्वभूमीवर हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. ज्या ज्या लोकसभा मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या खासदारांनी बंडखोरी केली आहे, त्या त्या मतदारसंघात जाऊन उद्धव ठाकरे शिवसेनिकांना बळ देत आहेत. उद्धव ठाकरे हे हिंगोली येथून परभणीत शनिवारी सायंकाळी मुक्कामी येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत रविवार दिनांक 28 जून रोजी सकाळी 10 वाजता अक्षदा मंगल कार्यालय येथे जाहीर सभा होत आहे या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. खासदार संजय जाधव यांनी ‘ऑपरेशन टायगर’मध्ये बंडखोरी केल्यानंतर…

Read More

परभणी ( प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने रविवार, दि. २८ जून २०२६ रोजी राज्यभरातील १,०२८ केंद्रांवर आयोजित करण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २०२६ पुढे ढकलण्यात आली असल्याचे परीक्षा परिषदेमार्फत कळविण्यात आले आहे, परीक्षा प्रक्रीया पारदर्शकतेत होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत टीईटी परीक्षा सुरक्षित व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या होत्या. तथापि, दि. २७ जून २०२६ रोजी पहाटे मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार भिवंडी येथे काही व्यक्तींना टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेबाबत माहिती असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. त्यानुसार भिवंडी पोलिसांनी संबंधित ठिकाणी धाड टाकून तपासणी केली. या प्रकरणाच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य…

Read More

परभणी, (प्रतिनिधी,)राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी नायब तहसीलदार सतीश रेड्डी यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पवन खांडके, सहायक महसूल अधिकारी आबेदखॉ पठाण, सहायक महसूल अधिकारी सुरेश पुंड, महसूल सहाय्यक विश्वनाथ कनके तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. ***

Read More

परभणी (प्रतिनिधी)कारेगाव येथील वसंत अनु जाती प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा आज राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक जाधव सर तर प्रमुख पाहुणे म्हणून माध्यमिक मुख्याध्यापिका गीता लेडे मॅडम व सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. राम गारकर, शंकर रोडे हे उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र जुनघरे सर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय इंगळे अंबादास रेडेवाड गजानन मुडे गणेश निर्वळ सुनील कचवे निलेश यादव मोतीराम कराळे संस्था प्रतिनिधी बबनराव धाडवे एकनाथ आवचार राजू राठोड इत्यादींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले आभार प्रदर्शन श्री विष्णू मोपकर…

Read More

परभणी, (प्रतिनिधी) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ९६-परभणी विधानसभा मतदारसंघातील विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. यासोबतच एका बॅचचे प्रशिक्षण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ऑनलाइन पद्धतीनेही पार पडले. प्रशिक्षणास उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले, तहसीलदार डॉ. संदीप राजपुरे, निवडणूक नायब तहसीलदार सुनील कांबळे, सहायक मतदार नोंदणी अधिकारी, बीएलओ सुपरवायझर, नोडल अधिकारी तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी मतदार यादी अद्ययावत करण्याची कार्यपद्धती, घरभेटींचे नियोजन, आवश्यक कागदपत्रांची पडताळणी, ऑनलाइन प्रणालीचा प्रभावी वापर तसेच भारत निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार कामकाज पूर्ण करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले…

Read More

संभाजीनगर, अकोला व आदिलाबादहून पंढरपूरसाठी अतिरिक्त गाड्यांची आवश्यकता परभणी,दि.26(प्रतिनिधी) : पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या आषाढी एकादशी सोहळ्यानिमित्त मराठवाड्यातून मोठ्या संख्येने वारकरी पंढरपूरकडे रवाना होत असतात. यंदाचा आषाढी एकादशी सोहळा 25 जुलै रोजी होत असल्याने वारकर्‍यांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन 20 ते 30 जुलैदरम्यान छत्रपती संभाजीनगर, अकोला आणि आदिलाबाद येथून विशेष रेल्वेगाड्या सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाने केली आहे. यासंदर्भातील निवेदन दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागीय व्यवस्थापकांकडे सादर करण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, आषाढी एकादशीसाठी मराठवाड्यातून लाखो भाविक आणि वारकरी पंढरपूरला जातात. सध्या धावणार्‍या निजामाबाद-पंढरपूर रेल्वेगाडीव्यतिरिक्त अतिरिक्त तीन विशेष गाड्या सुरू करणे आवश्यक आहे. या…

Read More

परभणी,(प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक प्रगतीवर लक्ष केंद्रित न करता उद्योजकतेकडेही वाटचाल करावी. आपल्या आवडीच्या क्षेत्रात प्राविण्य मिळवून राष्ट्रहित व समाजहितासाठी योगदान देणे आवश्यक असून विकसित भारताच्या निर्मितीत युवाशक्तीची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन प्रा. डॉ. सुधीर राजूरकर यांनी केले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप), परभणी महानगराच्या वतीने शारदा महाविद्यालयातील स्व. हेमराजजी जैन सांस्कृतिक सभागृहात आयोजित ‘छात्रोदय – नव छात्र नेतृत्वाचा उदय’ गुणवंत विद्यार्थी सत्कार व महानगर कार्यकारिणी घोषणा कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमात परभणी शहरातील विविध शाळांमधील 93 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महानगराध्यक्ष प्रा. डॉ. प्रवीण राठोड यांनी केले. गुणवंत…

Read More