Author: Lok Sanchar

परभणी,(प्रतिनिधी): राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाचे सहसचिव यांच्या 12 जून 2025 रोजीच्या आदेशानुसार परभणी जिल्ह्यातील जिल्हा परिषद व त्याअंतर्गत 9 पंचायत समित्यांची सार्वत्रिक निवडणूक- 2025-26 करीता प्रभाग रचनेचा कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे. त्यानुसार अंतिम प्रभाग रचना आज दि. 22 ऑगस्ट 2025 रोजी परिशिष्ट 8 (अ) व 8(ब) मध्ये खालील ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, परभणी कार्यालय, संबंधित उपविभागीय अधिकारी कार्यालय, संबंधित तहसील कार्यालय आणि संबंधित पंचायत समितींच्या नोटीस बोर्डावर आणि जिल्हाधिकारी कार्यालयाचे संकेतस्थळ https://parbhani.gov.in वर उपलब्ध असेल, सर्व संबंधितांनी अंतिम प्रभाग रचनेचे अवलोकन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांनी केले आहे. *-*-*-*-*

Read More

परभणी,(प्रतिनिधी) : सेलू तालुक्यातील राजेवाडी येथील पुलावरील पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या दोघा मोटारसायकलस्वारांपैकी मारोती रामभाऊ हरकळ (वय 50, रा. वालूर) यांचा मृतदेह बुधवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास डुघरा-कवडधन शिवारात आढळून आला. लोअर दुधना प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर दुधना नदीच्या पाणीपात्रात पाणी सोडल्या जात असून त्यामुळे दुधना नदीस मोठा पूर आला आहे. राजेवाडी येथील पुलावरुन पुराचे पाणी धोकादायक पध्दतीने वाहत आहे. असे असतांनासुध्दा दुचाकीस्वारांनी त्या पुराच्या पाण्यातून पुल ओलांडण्याचा प्रयत्न केला. त्यात दुर्देवाने ते दोघे पुराच्या पाण्याच्या प्रवाहाने नदीपात्रात वाहून गेले. प्रत्यक्षदर्शनींनी त्या दोघांना वाचविण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु, त्यांचे प्रयत्न फोल ठरले. सेलूतील महसूल, पोलिस व आपत्कालीन विभागातील पथकाने मंगळवारी रात्रीपर्यंत…

Read More

परभणी, (प्रतिनिधी)ः राज्यातील चारही कृषी विद्यापीठ आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातील रिक्त जागा भरण्याची कारवाई पूर्ण करा अशी मागणी आ. डॉ.राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली कृषी पदवीधारक विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनाकडे केली आहे. राज्यामध्ये चारही कृषी विद्यापीठ आणि कृषी विभागाच्या विविध विभागात हजारो रिक्त जागा आहेत या जागा अद्याप भरल्या  नाहीत, त्यामुळे राज्यात हजारोंच्या संख्येने कृषी पदवीधारक बेरोजगार आहेत असे आ. डॉ.पाटील यांनी नमूद करत विद्यार्थ्यांचे नेतृत्व करत या विद्यार्थ्यांच्या मागण्यासाठी मंगळवार दि.19 रोजी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची भेट घेतली. त्यांच्यामार्फत शासनाला निवेदन पाठवले आहे, कृषी विभागातील कृषी सेवक भरती तत्काळ पूर्ण करावी,राज्यातील शालेय शिक्षणात कृषी हा विषय अनिवार्य करून शिक्षण…

Read More

पँथर परिवर्तन चळवळचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन परभणी (प्रतिनिधी) येथील प्रभाग क्रमांक 7 येथे कचराकुंडीचे जागोजागी ढीग जमले आहेत. रोगराई पसरण्याची भीती नागरिकांमध्ये झाली आहे. पॅंथर परिवर्तन चळवळीचे संस्थापक अध्यक्ष यांनी महानगरपालिका उपायुक्त यांच्या मार्फत आयुक्तांना स्वच्छतेबाबत निवेदन दिले आहे. तात्काळ प्रभाग क्रमांक 7 येथील साई कॉर्नर, खंडोबा बाजार रोड, कौसर हॉस्पिटल सुफा मज्जिद जवळ तसेच मराठवाडा प्लॉट येथे घाणीचे साम्राज्य वाढले आहे. तात्काळ याकडे लक्ष देऊन स्वच्छता करण्यात यावी. अन्यथा येत्या काही दिवसात नागरिकांसह महानगरपालिकेवर जना आक्रोश मोर्चा काढण्यात येईल. असा इशारा पॅंथर परिवर्तन संस्थापक अध्यक्ष सिद्धार्थ पानबुडे यांनी दिला. निवेदनात शुभम माने, विनायक शिंदे, सुमित लोहिया, राम पारखे, गोविंद…

Read More

परभणी (प्रतिनिधी) परभणी जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ शेतकऱ्यांना आर्थिक मदत करा अशी मागणी आ.डॉ.राहुल पाटील यांच्या आदेशानुसार शिवसेना ठाकरे गटाच्या किसान सभेच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे आज सोमवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी करण्यात आली. परभणी जिल्ह्यामध्ये दिनांक 14 आणि 15 ऑगस्ट अशा दोन दिवसात अतिवृष्टी झाली आहे. लिमला परभणी ग्रामीण मधील बहुतांश गावे तसेच कातनेश्वर, रावराजुर यासह अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झाली आहे.त्याच्या नोंदी देखील प्रशासनाकडे आहेत यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, मूग, उडीद,तूर या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यासोबत शेत आखाडे, शेत जमिनी देखील बाधित झाल्या आहेत.या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या कार्यपद्धतीनुसार महसूल यंत्रणेमार्फत तात्काळ पंचनामे करून…

Read More

परभणी (प्रतिनिधी) :राजे संभाजी मित्र मंडळ आयोजित भव्य 23 वा दहीहंडी महोत्सव व 23वी माखनचोर दहीहंडी फोड स्पर्धा या दोन्ही कार्यक्रमांच्या स्टेज व तयारीचे भूमिपूजन दि. १६ रोजी येथील महात्मा फुले विद्यालय, जिंतूर रोडवरील मैदानावर उत्साहात संपन्न झाले. हा भव्य सोहळा राजे संभाजी मित्र मंडळ संस्थापक अध्यक्ष, लोकप्रिय खासदार संजय भाऊ (बंडू) जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येत असून, परभणीकरांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. भूमिपूजनाचा शुभारंभ परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पंढरीनाथ घुले पाटील, संचालक सोपानराव मोरे, रावसाहेब रेंगे, तसेच रमेश भाऊ दळवी व अजय गव्हाणे यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी अजयराव गव्हाणे, सचिन मोटे, संतोष कांबळे, शितल…

Read More

परभणी (प्रतिनिधी) बाल विद्या मंदिर हायस्कूल वैभव नगर शाखेत आज दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न झाला.बाल विद्या मंदिर शिक्षण संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष डॉ. श्री.एन.ए. झरकर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी बाल विद्यामंदिर हायस्कूलचे पर्यवेक्षक तथा विभाग प्रमुख श्री.प्रदीप.रुघेसर,प्राथमिक व माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी,पालक, माजी विद्यार्थी उपस्थित होते.याप्रसंगी प्रशालेच्या संगीत विभागाने संगीत शिक्षक श्री.रमाकांत पैंजणे सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत, राज्यगीत, शालेय परिपाठ उत्तुंग स्वरात सादर केले.याप्रसंगी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भितीपत्रकांचे मान्यवरांच्या शुभहस्ते विमोचन करण्यात आले.या शुभप्रसंगी विद्यार्थ्यांचे वाढदिवस असणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी हिंदवी यादव आशिष खुपसे आणि आनघा यादव यांनी…

Read More

परभणी, (प्रतिनिधी)- अमली पदार्थ विरोधी भव्य जनजागृती सायकल रॅली आज सकाळी परभणी शहरात काढण्यात आली. परभणी जिल्हा पोलीस दलाच्यावतीने आयोजित या रॅलीचा शुभारंभ पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयापासून सुरू करण्यात आलेल्या या रॅलीत स्वतः पालकमंत्री मेघना बोर्डीकर, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी सहभागी झाले होते. युवकांचे आरोग्य, त्यांचा उत्साह आणि त्यांच्या आयुष्याचा उज्ज्वल प्रवास हाच आपल्या समाजाचा खरा आधार आहे. नशामुक्त समाजासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करूयात, असे आवाहन यावेळी पालकमंत्री यांनी केले व त्यांनी उपस्थित सर्वांना अमली पदार्थ विरोधीची शपथ दिली. रॅलीत अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ, डॅा.केदार खटींग आदींसह…

Read More

परभणी (प्रतिनिधी) १५ ऑगस्ट निमित्त शहरातील वसमत रोड येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ कमान पासून राजगोपालाचार्य उद्यान पर्यंत स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला हजारोच्या संख्येने देशभक्त नागरिकांच्या उपस्थितीत तिरंगा पदयात्रा मोठ्या उस्ताहाने काढण्यात आली. या वेळी शहरातील आजी माजी सैनिक, राज्यस्तरीय स्केटिंग खेळाडू, भारत मातेचा सजीव देखावा, ३०० मीटर तिरंगा अशा अनेक बाबींनी पदयात्रेची शोभा वाढवली. या वेळी ABVP संगठना, स्केटिंग असोसिएशन, माजी सैनिक असोसिएशन चे पदाधिकारी आदींनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. पदयात्रेचे आयोजन भाजपा युवा मोर्चा परभणी महानगर च्या वतीने अक्षय डहाळे, अभिषेक वाकोडकर, रामदास पवार, अनिल रेंगे, राज निलावार यांनी केले. या वेळी प्रमोद दादा वाकोडकर, संजय रिझवानी, मोहन…

Read More

परभणी (प्रतिनिधी)वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या संकल्पनेतून आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी राबविण्यात येणारा ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजा सोबत’ हा उपक्रम दिनांक १३ ऑगस्ट रोजी विविध गावांमध्ये यशस्वीरीत्या पार पडला. या उपक्रमात विद्यापीठातील विविध विषयातील शास्त्रज्ञांनी प्रक्षेत्र भेटी, चर्चासत्रे, कृती प्रात्यक्षिके व शेतकरी मेळाव्यांद्वारे शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी ११ चमूमधील ३२ शास्त्रज्ञांनी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील ४०० हून अधिक शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या शेतीविषयक समस्यांना समाधानकारक उत्तरे दिली. जिंतूर तालुक्यातील टाकळखोपा येथे झालेल्या कार्यक्रमाला विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश…

Read More