परभणी, ( प्रतिनिधी ) परभणी शहरात जिल्ह्यासाठी नियोजन भवन उभारले जाणार आहे.आ.डॉ.राहुल पाटील यांनी मागील वर्षभरापासून यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरु केला होता.अखेर त्यांच्या प्रयत्नाला यश आले असून शासनाने परभणीसाठी नियोजन भवन मंजुर केले आहे.त्यासाठी 16.63 रुपयांचा खर्च करण्यास मान्यता दिली आहे.त्यासोबतच कामगार भवन देखील मंजुर झाले असुन त्यासाठी 14 कोटी 58 लाख रुपयांचा निधी मंजुर झाला आहे. जिल्हा नियोजन समितीने ऑगस्ट 2024 दरम्यान 24.91 कोटी रुपयांचे नियोजन भवन उभारण्याकरता शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता,त्यासाठी आ.पाटील यांनी सातत्याने शासनाकडे पत्रव्यवहार केला होता.तसेच नियोेजन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या होत्या.त्यामुळे शासनाने आज दिनांक 25 मार्च 2025 रोजी नियोजन विभागाचे उपसचिव खेडेकर यांनी शासन…
Author: Lok Sanchar
परभणी (प्रतिनिधी) : परभणी पंचायत समिती अंतर्गत शाखा अभियंता अण्णासाहेब किशनराव तोडे यास 10 हजार रुपयांची लाच स्विकारतांना लाच लुचपत प्रतिबंधक खात्याच्या एका पथकाने ताब्यात घेतले. 15 व्या वित्त आयोगामध्ये अंगणवाडीतील कंपाऊंड वॉल व नालीचे बांधकाम तक्रारकर्त्याने केले होते. या बांधकामाचे एमबी लिहिण्याकरीता परभणी पंचायत समितीत कागदपत्रे सादर केली. 4 मार्च रोजी शाखा अभियंता अण्णासाहेब किशनराव तोडे यास संबंधित तक्रारदार भेटले. परंतु, एमबी लिहिण्याकरीता 10 हजार रुपये द्यावे लागतील, असे तोडे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले. ही रक्कम लाच असून ती तक्रारकर्ता यांना द्यावयाची इच्छा नसल्याने तक्रारकर्त्यांनी लगेचच लाच लुचपत प्रतिबंधक खात्याकडे धाव घेतली. या खात्याच्या पथकाने 18 मार्च रोजी लाच…
परभणी,(प्रतिनिधी) : रोजगार हमी योजनेतील सिंचन विहीरी व गाय गोठ्यांचे कुशल बिल तात्काळ वितरित करावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी सोमवारी (दि.24) जिल्हा परिषद कार्यालयात ठिय्या मांडला. जिल्ह्यातील कोणत्याही पंचायत समितीकडे सिंचन विहीर, गाय गोठ्यांच्या कामाचा प्रस्ताव सादर केला तर अधिकारी, कर्मचारी त्याकडे ढुंकूनही पाहत नाहीत, परंतु दलालांमार्फत गेलेल्या प्रस्तावास हे अधिकारी तात्काळ प्रतिसाद देऊ लागले आहेत, असा आरोप करीत या संघटनेने गोठ्याच्या कामच्या वर्क ऑर्डरकरीता 15 हजार, विहीरींच्या कामाच्या वर्क ऑर्डरसाठी 25 हजार असे दर आहेत. पैसे दिले नाही तर एक एक वर्ष वर्क ऑर्डर मिळत नाही, कसबसे वर्क ऑर्डर मिळाली तर कुशलचे बिल पैसे दिल्याशिवाय मिळत…
पालम (प्रतिनिधि) अनेक दुर्धर आजारावरील उपचारासाठी येणाऱ्या खर्चा करिता रुग्णांना संबंधित रुग्णालयामार्फत आर्थिक सहाय्य देण्यात येते तसेच आपत्ती प्रसंगीही आर्थिक मदत देण्यात येते. या अनुषंगाने मदत मिळविण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामध्ये असंख्य अर्ज प्राप्त होतात. त्या अर्जाचा पाठपुरावा करण्यासाठी रुग्ण व त्यांचे नातेवाईक मंत्रालयात येत असल्यामुळे नागरिकांना आपल्याच जिल्ह्यात वैद्यकीय सेवा सहज उपलब्ध व्हाव्यात याकरिता परभणी जिल्हा अधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. या कक्षात अध्यक्ष म्हणून सद्या ग्रामीण रुग्णालय सोनपेठ येथे कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी इप्पर यांची नियुक्ती जिल्हाधिकारी यांच्यामार्फत करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षात प्राप्त झालेल्या अर्जाची सद्यस्थिती नागरिकांना…
परभणी (प्रतिनिधी) विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक व पालक यांनी नेहमी जागरूक राहिले पाहिजे. विद्यार्थी यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये परिश्रम व मेहनत करण्याची क्षमता विकसित करावी. बदलत्या परिस्थितीत स्वतःला सिद्ध करण्यासाठी विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी व आत्मविश्वास स्वतःच्या अंगी वृद्धिंगत करावा. व यश प्राप्त करावे. असे प्रतिपादन स्व. प्रा.वासंतीताई नावंदर यांच्या जयंती निमित्त आयोजित *विद्यार्थी शिक्षक पालक* संवाद मेळाव्यात प्रा. विष्णू घुगे यांनी केले. शहरातील बाल विद्यामंदिर शिक्षण संस्था संचलित बाल विद्या फाउंडेशनच्या वतीने संस्थेच्या माजी उपाध्यक्ष स्व. प्रा. वासंतीताई नावंदर यांच्या प्रथम जयंती निमित्त *विद्यार्थी शिक्षक पालक* संवाद मेळावा आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष ॲड.विलास पोहंडूळकर हे होते तर…
परभणी, (प्रतिनिधी) जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनाच्यावतीने आर्थिक मदतीचे धनादेश देण्यात आले. सोमवारी (दि. 24) जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते प्रत्येकी एक लाख रुपयांचे धनादेश वितरित करण्यात आले. सन 2024-25 मध्ये परभणी तालुक्यात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांमध्ये अभिमान बबन राजगूरे (पिंपरी देशमुख), संभाजी गणपती गारूडी (टाकळी कुंभकर्ण), दिनेश अशोक होरगूळे (कैलासवाडी), गजानन आबासाहेब पोले (पिंपळा), परमेश्वर लक्ष्मण अंभोरे (डिग्रस), रामप्रसाद बालासाहेब मोरे (पिंपळगाव स.मि.), गंगाधर नामेदव भुजबळ (पोरजवळा), अनिल माणिकराव देशमुख (शहापूर), दगडु सोपानराव सरवदे (पोखर्णी नृ.), बबन नारायण ढगे (पिंपळगाव ठोंबरे), लक्ष्मण किशन जोरवर (पोखर्णी) आणि बबनराव भिमाशंकर बोंबले (शहापूर) यांचा समावेश आहे. या शेतकऱ्यांच्या वारसांना धनादेश वितरित…
परभणी (प्रतिनिधी) जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने मुस्लिम पत्रकार बांधवांसाठी इफ्तार पाटीर्चे आयोजन दि. १९ मार्च 2025 रोजी येथील स्टेडियम परिसरातील अतिथी हॉटेल मध्ये करण्यात आले होते. सदरील इफ्तार पाटीर्साठी पोलीस उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे यांनी हजेरी लावली. त्याच प्रमाणे मोठया संख्येने पत्रकार संघाचे पदाधिकारी व शहरातील मुस्लीम नागरिक उपस्थित होते. मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान महिना सुरू असून यावर्षी कडक उन्हाळ्यामध्ये 2 मार्चपासून रमजान महिन्याची सुरुवात झाली आहे 30 दिवस संपूर्ण महिनाभर मुस्लिम धर्मीय रोजा उपवास राहून या महिन्यांमध्ये विविध धार्मिक विधी व नमाज पठण करून अल्लाची पूर्ण श्रद्धेने आराधना करतात.पहाटे पाच वाजता जेवण (सहेर)करून उपवासाची सुरुवात होते दिवसभर अन्नाचे…
परभणी :(प्रतिनिधी) जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने मुस्लिम पत्रकार बांधवांसाठी इफ्तार पाटीर्चे आयोजन दि. १९ मार्च 2025 रोजी येथील स्टेडियम परिसरातील अतिथी हॉटेल मध्ये करण्यात आले होते. सदरील इफ्तार पाटीर्साठी पोलीस उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे यांनी हजेरी लावली. त्याच प्रमाणे मोठया संख्येने पत्रकार संघाचे पदाधिकारी व शहरातील मुस्लीम नागरिक उपस्थित होते. मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान महिना सुरू असून यावर्षी कडक उन्हाळ्यामध्ये 2 मार्चपासून रमजान महिन्याची सुरुवात झाली आहे 30 दिवस संपूर्ण महिनाभर मुस्लिम धर्मीय रोजा उपवास राहून या महिन्यांमध्ये विविध धार्मिक विधी व नमाज पठण करून अल्लाची पूर्ण श्रद्धेने आराधना करतात.पहाटे पाच वाजता जेवण (सहेर)करून उपवासाची सुरुवात होते दिवसभर अन्नाचे…
परभणी,(प्रतिनिधी) : महिलांच्या खर्या अर्थाने सशक्तीकरणासाठी ठोस धोरणे आवश्यक असल्याचे मत खासदार डॉ. श्रीमती फौजिया खान यांनी राज्यसभेत व्यक्त केले. केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयाच्या कार्यपध्दतीवर कठोर टीका करतेवेळी श्रीमती खान यांनी महिलांच्या सक्षमीकरणाच्या केवळ घोषणाबाजीवरच सरकार भर देत आहे. प्रत्यक्षात महिलांचे आरोग्य आणि पोषणाच्या बाबतीत मूलभूत सुधारणा होत नाहीत, अशी खंत व्यक्त केली. मातृ मृत्यू दराची स्थिती भयावह आहे. सध्या भारतात एमएमआरचा दर 97 प्रति 1 लाख जिवंत जन्म आहे. जो यु.एन.ने निश्चित केलेल्या 70च्या टार्गेटपेक्षा जास्त आहे. आसाम, मध्यप्रदेश या ठिकाणची स्थिती तर आणखीन गंभीर आहे. जननी शिशू सुरक्षा कार्यक्रमातसुध्दा अनेक त्रुटी आहेत. विशेषतः वाहने अपुरी आहेत.…
परभणी (प्रतिनिधी) सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची महती नविन पिढीला व्हावी या उद्देशाने माननीय सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या अभिनव कल्पनेतून व श्री विकास खारगे,मा. मुख्यमंत्री, यांचे अपर मुख्य सचिव तथा अपर मुख्य सचिव सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जन्मवर्षानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन ज्ञानोपासक मंडळाचे कला व वाणिज्य महाविद्यालय परभणी या ठिकाणी करण्यात आले होते. या कार्यक्रमास पुण्यश्लोक अहिल्याबाई देवी होळकर यांच्या जीवन चरित्रावर आधारित नाटिका,पोवाडे, नृत्य व व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमात नाट्यप्रवेश श्री प्रमोद शेलार व त्यांच्या संघांनी अतिशय सुंदर सादरीकरण केले.शाहीर…