परभणी (प्रतिनिधी) महिलांना बसमध्ये 50 टक्के सवलत आणि ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास दिला खरा, परंतु बस उपलब्ध नसतील तर या सवलतीचा उपयोग काय असा प्रश्न करत आपण परभणी विभागासाठी 500 बसची मागणी केली होती परंतु केवळ 10 बस देण्यात आल्या आहेत आधीच दुरुस्तीच्या नावाखाली परभणी विभागातून 100 बस कमी केल्या आहेत, किमान त्या तरी पुन्हा द्या अशी मागणी आमदार डॉ.राहुल पाटील यांनी केली आहे. आ.डॉ.पाटील यांच्या प्रयत्नातून तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या माध्यमातून परभणीला अद्यावत बसपोर्ट मिळाले, या बसपोर्टचे काम 95 टक्के पूर्णत्वाला गेले असून बस स्थानक सुरू झाले आहे, उर्वरित कामासंदर्भात आ. पाटील यांनी शनिवारी पाहणी करून आढावा…
Author: Lok Sanchar
परभणी (प्रतिनिधी) शहरातील श्री अष्टभुजा देवी मंदिर परिसरातील जुन्या नावाचे फलक संभाजी रोड असे अर्धवट नाव काढुन त्याठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मार्ग असे नामकरण फलक श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान परभणी विभागाच्या माध्यमातून लावण्यात आले. याप्रसंगी राम कुलथे, माऊली कोपरे,विष्णू पंत खलीकर,आश्रोबा घाडगे, दिलीप जाधव, अंकुश नायक, श्रीकांत शिंदे, गोपाळ कदम, शंकर जाधव, अनिल शिंदे, ओमप्रकाश कदम, श्रीहरी महींद्रकर, वैभव राऊत आदी उपस्थित होते.
परभणी,(प्रतिनिधी) : येथील प्रसिध्द कंत्राटदार तथा सामाजिक कार्यकर्ते, प्रगतशील शेतकरी भागवत किशनराव खोडके पाटील यांचे शनिवारी (दि.29) सकाळी तेलंगणातील श्रीशैलम जवळ एका रस्ते अपघातात निधन झाले. मृत्यूसमयी ते 66 वर्षांचे होते. मुंबई येथील पोलीस उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे व त्यांचे सहकारी भागवत खोडके हे त्यांच्या वाहनाने देवदर्शनाकरीता निघाले होते. तेलंगणातील श्रीशैलमजवळ एका बसने दिलेल्या जोरदार धडकेत खोडके हे जागीच मृत्यूमुखी पडले तर त्यांचे सहकारी डॉ. पठारे हे गंभीर जखमी झाले. उपचार सुरु असतांना त्यांचेही निधन झाले. या अपघातात कार चालक बचावला. दरम्यान, खोडके पाटील हे हिंगोली जिल्ह्यातील शेवगाव खोडके येथील मूळ रहिवाशी होत. ते परभणीत वास्तव्यास होते. येथील नामवंत कंत्राटदार…
परभणी (प्रतिनिधी) कै. सौ. कमलताई जामकर दर्पण पुरस्कार समिती आणि कै. सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालयाच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा कै. सौ. कमलताई जामकर दर्पण पुरस्कार ठाणे येथील निराधार, निराश्रित, मनोरुग्णांची आई स्मित फाउंडेशनच्या अध्यक्ष सामाजिक कार्यकर्त्या योजना घरत यांना मान्यवरांच्या हस्ते शुक्रवारी (ता.२८) प्रदान करण्यात आला. अध्यक्षस्थानी नूतन विद्या मंदिर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हेमंतराव जामकर होते. यावेळी सत्कारमूर्ती कृषीभूषण कांतराव काका झरीकर, उपाध्यक्ष अॅड.किरणराव सुभेदार, संचालक मंगेशराव सुभेदार,पुरस्कार समितीचे उपाध्यक्ष . बाळासाहेब जामकर, पुरस्कार समितीचे सचिव विजय जामकर, समितीचे सहसचिव एकनाथ मोरे,अॅड.अशोक सोनी, सौ.दीपलक्ष्मीताई जामकर, सौ.संध्याताई जामकर,सौ.सोनियाताई जामकर, सौ.वसुंधराताई जामकर, मेघाताई देशमुख, सौ.नेहाताई जामकर, सौ.कविताताई सुभेदार, सौ.प्रतिमाताई देशमुख, रागिणी…
पालम (प्रतिनिधी) ) तालुक्यातील पेठशिवणी येथील श्री बसवेश्वर प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थी कु.वेदिका गजानन कामटकर हिची केंद्रीय जवाहर नवोदय प्रवेशासाठी ग्रामीण विभागातून निवड झाली आहे. अशी माहिती मुख्याध्यापक प्रशांत करंजे यांनी दिली. केंद्रीय जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा 2025 मधून इयत्ता 6 वी प्रवेशासाठी परभणी जिल्ह्यातून या विद्यार्थिनींनी परीक्षा दिली होती. त्यामध्ये तिने यश संपादन केले आहे.या विद्यार्थिनीस श्री राजपाल दुर्गे सर व गजानन थाडगे, संग्राम ढगे या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. शाळा विविध नाविन्यपूर्ण उपक्रम आणि गुणवत्ता शिक्षण देण्यासाठी सतत प्रयत्न करत असल्याची माहिती नागनाथ खेडकर सर यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल सर्व ग्रामस्थ मंडळींनी अभिनंदन केले. या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी श्री गायकवाड…
परभणी,(प्रतिनिधी) : दोन लाख रुपयांची लाच स्विकारणार्या वादग्रस्त जिल्हा क्रिडा अधिकारी कविता नावंदे-निंबाळकर व क्रिडा अधिकारी नानकसिंह बस्सी या दोघांना लाच लुचपत प्रतिबंधक खात्याच्या एका पथकाने गुरूवारी ताब्यात घेतले. शुक्रवारी (दि.28) या दोघांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सूनावली आहे. क्रिडा अकॅडमीच्या जागेवरील स्विमिंग पुलाच्या बांधकामासह या स्विमिंग पुलावर 2024 साली आयोजित केलेल्या क्रिडा स्पर्धांच्या एकूण 95 लाख रुपयांचे थकीत बिल मिळावे यासाठी तक्रारकर्त्याने जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयाकडे पाठपुरावा सुरु केला, परंतु प्रत्येकवेळी जिल्हा क्रिडा अधिकारी कविता नावंदे यांनी जाणिवपूर्वक त्रुटी काढल्या. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराने या थकीत बिलांच्या मंजूरीकरीता क्रिडा अधिकारी बस्सी व जिल्हा क्रिडा…
पालम ((प्रतिनिधी) गावातील वाचनालये हे असतात. युवा पिढीला व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी ग्रामीण भागातील वाचनालयाने महत्त्वाचे योगदान दिले आहे. अशा वाचनालयांना अत्याधुनिक सुविधा देत समृद्ध केलं तर ग्रामीण भागातील बौद्धिक स्तर उंचावेल. तुटपुंज्या अनुदानावर चालणाऱ्या या वाचनालयांच्या वाढीव अनुदानासाठी विधानसभेत आवाज उठवणार असल्याचे आश्वासन परभणी विधानसभेचे आमदार डॉ. राहुल पाटील यांनी दि.२३ केले. पालम तालुक्यातील चाटोरी येथील स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात मराठवाडा विभाग ग्रंथालय संघ व जिल्हा ग्रंथालय संघाच्या वार्षिक अधिवेशनाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. या अधिवेशनाचे आयोजन कोनेरवाडी येथील श्री बसवेश्वर सार्वजनिक वाचनाल याच्या वतीने केले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.रामेश्वर पवार हे होते. मंचावर माजी आमदार गंगाधर…
परभणी (प्रतिनिधी) एन. व्ही. एस.जनकल्याण विद्या मंदिर लोहगाव ,रोड परभणी या ठिकाणी विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी व उद्घाटक म्हणून डॉ धर्मराज चव्हाण उपस्थित होते. यावेळी त्यांनि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले प्रसंगी बोलत असताना डॉ चव्हाण म्हणाले की, विद्यार्थ्यांनी अभ्यास हा बरोबरच आपल्या आजूबाजूला घडत असणाऱ्या वैज्ञानिक दृष्टिकोनावरही लक्ष ठेवलं पाहिजे व त्यातून मिळणाऱ्या अनुभवाच्या शिदोरीतून स्वतः मध्ये बदल करत यश संपादन केलं पाहिजे. कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून मराठवाडा प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ ढगे मॅडम , जनकल्याण शाळेचे मुख्याध्यापक श्री गोरकट्टे सर परिसरातील पालक श्री भालेराव काका, श्री कांबळे सर, व शाळेतील शिक्षक श्री राऊत सर,खटिंग…
नवी दिल्ली, – राज्यसभेच्या प्रश्नोत्तराच्या तासात खासदार डॉ. फौजिया खान यांनी महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील आपत्कालीन वैद्यकीय सेवांच्या असमर्थतेवर गंभीर चिंता व्यक्त केली. राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत होणाऱ्या प्रयत्नांनंतरही ग्रामीण आणि आदिवासी भागांत योग्यरित्या सुसज्ज रुग्णवाहिकांची कमतरता असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. डॉ. खान यांनी महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात घडलेल्या दुर्दैवी घटनेचा उल्लेख केला, जिथे एका गर्भवती महिलेचा योग्य सुविधा नसलेल्या रुग्णवाहिकेमुळे जीव गेला. त्यांनी नुकत्याच आलेल्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (CAG) अहवालाचा संदर्भ देत सांगितले की, ग्रामीण आणि आदिवासी भागात मूलभूत आरोग्य सेवा पुरविणाऱ्या रुग्णवाहिकांची मोठी टंचाई आहे. डॉ. खान यांनी सरकारला आरोग्य मंत्र्यांना विचारले की, अशा दुर्दैवी घटना टाळण्यासाठी कोणते…
शांतता समितीची बैठक संपन्न परभणी, (प्रतिनिधी) : रमजान ईद, गुढी पाडवा आणि रामनवमी हे सण समाजबांधवांनी शांतता व उत्साहात साजरे करावेत. जिल्हा व पोलीस प्रशासनाचे आपणास संपूर्ण सहकार्य राहिल, त्यामुळे सदर सणांसह येणारे सर्व सणदेखील आनंदात साजरे करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी जिल्हावासियांना केले. रमजान ईद, गुढी पाडवा आणि रामनवमी हे सण शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा शांतता समिती व विभागप्रमुखांची बैठक आज जिल्हा नियोजन समिती सभागृहामध्ये आयोजित करण्यात आली होती. त़्यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, मनपा आयुक्त धैर्यशील जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, जिंतूरचे उपविभागीय…