परभणी, (प्रतिनिधी) राज्य शासनाने जाहीर केलेल्या 150 दिवसांच्या कार्यक्रमातंर्गत अनुकंपा नियुक्तीच्या सर्वसमोवशक सुधारीत धोरणानुसार परभणी जिल्ह्यात अनुकंपा तत्वावर गट ‘क’ संवर्गात 43, गट ‘ड’ संवर्गात 47 उमदेवार व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एम.पी.एस.सी.) शिफारस केलेले 23 उमेदवार असे एकूण 113 उमेदवारांना शासकीय नोकरीची संधी मिळाली आहे. शनिवार, 4 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित कार्यक्रमात या उमेदवारांना पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात आज आयोजित पत्रकार परिषदेस निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी व पत्रकार उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले की, दि. 4…
Author: Lok Sanchar
परभणी (प्रतिनिधी) आज साळापुरी येथे भारतीय जैन संघटना एवं सकल जैन समाज परभणी द्वारा परभणी तालुक्यातील साळापुरी येथील पूरग्रस्त बाधित 30 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू जसे कपडे, ब्लँकेट,शर्ट, पॅन्ट व किराणा सामान च्या 30 किट वाटप करण्यात आल्या. जैन समाजातील सर्व समाजबांधव यांनी जीवनावश्यक वस्तू, खाण्या पिण्यासाठी लागणारे सामान, ब्लँकेट, किराणा सामान , ज्यांना जसे जमेल तशी दानराशी पण संघटने कडे जमा केली. यावेळी प्रत्येक महिलेला साडी, गर्भवती महिलांना त्याच्या व्यथा प्रत्यक्ष जाणून घेतल्या. त्यांचे धाडस बांधविले. जीवन जगण्याचे सामर्थ्य व प्रेरणा दिली. दुसऱ्या राज्यातून आलेले 5 आदिवासी परिवार यांच्या पण अडचणी जाणून घेतल्या व त्यांना पण किट चे वाटप केले.…
परभणी, (प्रतिनिधी): आर.पी.हॉस्पिटल व रिसर्च इन्स्टिट्यूट, पाथरी रोड येथे रविवार, २८ सप्टेंबर रोजी ० ते १८ वर्षे वयाच्या लहान मुलांसाठी मोफत 2 डी इको तपासणी आणि हृदय शस्त्रक्रिया शिबिर पार पडले. या शिबिरात १४२ बालकांची मोफत 2 डी इको तपासणी करण्यात आली असून, जगप्रसिद्ध बाल हृदयरोग तज्ञ डॉ. भूषण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक शस्त्रक्रिया करण्यात आल्या. आ.डॉ. राहुल पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित या शिबिरामुळे परभणी व परिसरातील अनेक लहान मुलांना हृदयविकारापासून मुक्त होण्याची संधी मिळाली. यापूर्वीही आर. पी. हॉस्पिटलने अशा शिबिरांद्वारे अनेक बालकांना नवजीवन प्रदान केले आहे. यावेळी बोलताना आ.डॉ.राहुल पाटील म्हणाले, “हृदयविकाराने त्रस्त असलेल्या लहान मुलांना वेळीच उपचार मिळणे…
जिल्हा बँकेची १०८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा परभणी (प्रतिनिधी )परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला नाबार्डचा “बेस्ट परफॉर्मिंग बँक” पुरस्कार प्राप्त झाला असून, हा सन्मान मिळवणारी परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही मराठवाड्यातील एकमेव बँक आहे असे प्रतिपादन माजी मंत्री तथा बँकेचे अध्यक्ष मा. श्री. सुरेशरावजी वरपुडकर यांनी केले. परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची १०८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी दिनांक २७ सप्टेंबर रोजी खेळीमेळीच्या वातावरणात झाली. या सभेचे अध्यक्षस्थानी माजी मंत्री तथा बँकेचे अध्यक्ष मा. श्री. सुरेशरावजी वरपुडकर होते. दरम्यान,सभेच्या प्रारंभी स्वातंत्र्यसैनिक, शहिदांना, लेखक, संशोधक, कवी, साहित्यिक, कलावंत, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, जेष्ठ खेळाडू, सामाजिक व सहकारी क्षेत्रातील मान्यवर, तसेच बँकेचे आजी-माजी…
तिघांचा बचाव; मदतीसाठी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधा* *खोटी माहिती पसरवणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाणार* परभणी,(प्रतिनिधी) भारतीय हवामान खाते, प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी परभणी जिल्ह्याकरिता दि. 27 व 28 सप्टेंबर 2025 हे रोजी यलो अलर्टचा इशारा दिला आहे. एकूण जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूर परिस्थिती पाहता नागरिकांनी सुरक्षितस्थळी राहावे तसेच स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. नागरिकांनी खोटी माहिती आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, (जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण) संजयसिंह चव्हाण यांनी केले आहे. परभणी जिल्ह्यातील येलदरी व निम्न दुधना हे धरणे, ढालेगाव, तारुगव्हान, मुद्गल, दिग्रस हे उच्च पातळी बंधारे आणि झरी, करपरा, मासोळी, मुळी व पिंपळदरी हे निम्न…
खलात उतरून केली पाहणी परभणी ( प्रतिनिधी) परभणी शहरात मागील 48 तासापासून अनेक वसाहतींमध्ये पाणी साचून राहिले आहे आणि घरांचे नुकसान झाले आहे या सर्व नागरिकांना तातडीने मदत करा अशा सूचना आमदार डॉ. राहुल पाटील यांनी पाहणी दरम्यान दिल्या. परभणी शहरातील जमजम कॉलनी,गाडगेबाबा नगर, सहारा कॉलनी, सागर कॉलनी, बाबर कॉलनी शाहू नगर, लक्ष्मी नगर,आदी भागात मुसळधार पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी गेले आहे. सलग 48 तासापासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी जाऊन अन्नधान्य कपडे आधी साहित्याची नासधूस झाली आहे या सर्व नुकसानीची पाहणी शनिवारी आमदार डॉ.पाटील यांनी केली. यावेळी त्यांनी नागरिकांना धीर दिला ज्या नागरिकांचे नुकसान झाले अशा सर्वांना तातडीने…
परभणी (प्रतिनिधी) येथील ज्ञानोपासक महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ.भीमराव खाडे यांना बुद्धिस्ट फाउंडेशन ऑफ इंडियाच्या वतीने राज्यस्तरीय विद्या भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार त्यांना त्यांच्या शैक्षणिक योगदाना बद्धल मिळाला आहे. उच्च शिक्षणातील रसायनशास्त्रा बरोबरच त्यांनीएलएल.बी, मास्टर ऑफ जर्नालिझम अँड मीडिया सायन्स आणि डिप्लोमा इन हुमन राईट हे शिक्षण घेतले आहे.छत्तीस वर्षाच्या सेवेतील त्यांचा कार्यकाळ हा प्रेरणादायी ठरणारा आहे. दोन युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशनचे आणि एक स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा रसायनशास्त्र विषयाचे प्रकल्प त्यांनी पूर्ण केले आहेत.त्यांच्या मार्गदर्शनाखाली आठ विद्यार्थ्यांनी पीएच.डी.साठीचे संशोधन पूर्ण केले आहे आणि दोन विद्यार्थ्याचे संशोधनाचे काम अंतिम टप्प्यात आहे.याचबरोबर त्यांचे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय…
पाथरी ( प्रतिनिधी) पाथरी तालुक्यातील गुंज गौंडगाव अंधापुरी उमरा या भागातील जनजीवन विस्कळीत झाला आहे पशु प्राणी घरातील भांडे उध्वस्त झाला आहे राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. गोदावरी नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. काही ठिकाणी नद्यांना पूर आले आहेत. त्यामुळं जनजीवन विस्कळी झालं आहे. अशीच परिस्थिती पाथरी तालुक्यातील गुंज गोंडगाव उमरा अंधापुरी या भागातील गोदावरी नदीचे पाणी घरात देखील झाली आहे. गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. गोदावरी नदीचे पाणी पाथरी तालुक्यातील नागरिकांच्या पाणी घरात शिरण्यास सुरुवात झाली आहे. ग्रामीण भागातील गोदावरी नदीच्या पुराचे पाणी शिरले आहे. अध्यापन प्रशासनाने भेट दिली नाही महसूल प्रशासन व पोलीस…
परभणी,(प्रतिनिधी) यशस्वीनी महिला मंच सातत्याने सामजिक,सांस्कृतीक,आरोग्यदायी उपक्रम राबवत महिलांसाठी हक्काचे व्यासपिठ निर्माण केले आहे.या माध्यमातून तीन हजार महिला एकत्र आल्या आहेत.त्यामुळे भविष्यात हा मंच महिलांच्या कुटूंबाचा अविभाज्य घटक असेल असे प्रतिपादन आ.डॉ.राहुल पाटील यांनी केले. यशस्वीनी महिला मंचच्या वतीने शहरातील अक्षदा मंगल कार्यालयात मंगळवार (दि.23)रोजी रास दांडीया गरबा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी उदघाटन कार्यक्रमात आ.डॉ.पाटील बोलत होते.यावेळी मंचच्या अध्यक्षा डॉ.संप्रिया पाटील,सहसंपर्क प्रमुख डॉ.विवेक नावंदर, महिला जिल्हा संघटक अंबिका डहाळे, सोनिया जामकर,अनिता नावंदर, आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना आ.पाटील म्हणाले,यशस्वीनी महिला मंच जिल्ह्यात नव्हे तर राज्यात आदर्श मंच म्हणून पुढे आला आहे.निराधार,वंचित,बेरोजगार महिलांना स्वावलंबी करुन त्यांना प्रशिक्षण आणि रोजगार उपलब्ध…
परभणी,(प्रतिनिधी) ःसरसकट सर्वच मंडळे अतिवृष्टीग्रस्त म्हणून जाहीर होणे गरजेचे असताना परभणी तालुक्यातील झरी,टाकळी कुंभकर्ण या मंडळांना वगळण्यात आले आहे.या मंडळात देखील खूप नुकसान झाले आहे त्यामुळे या दोन्ही मंडळाचा अतिवृष्टीग्रस्त मंडळात समावेश करा अशी मागणी आमदार डॉ.राहुल पाटील यांनी केली आहे. परभणी जिल्ह्यात सर्वच मंडळात अतिवृष्टी झालेली आहे.परभणी तालुक्यात सातत्याने अतिवृष्टी होऊन पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेकांच्या घराची पडझड झाली आहे. सरसकट सर्वच मंडळे अतिवृष्टीग्रस्त म्हणून जाहीर होणे गरजेचे असताना परभणी तालुक्यातील झरी, टाकळी कुंभकर्ण या मंडळांना वगळण्यात आले आहे. वास्तविक याच मंडळात सर्वाधिक पाऊस झाला झरी मंडळातील झरीसह मांडवा, जलालपूर, मिर्झापूर, नांदापूर आदी भागात सोयाबीन,कापूस, तुर या पिकांचे…

