परभणी, (प्रतिनिधी) राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्यामार्फत देशभरात राबविण्यात येणाऱ्या ‘आपदा मित्र कार्यक्रमा’अंतर्गत परभणी जिल्ह्यातील 300 स्वयंसेवकांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्राथमिक प्रशिक्षण देण्यात आले होते. या प्रशिक्षित स्वयंसेवकांमधून चक्रधर जावळे, अभिषेक भोसले, विष्णू राठोड आणि चंद्रशेखर कदम या चार जणांची निवड मास्टर ट्रेनर म्हणून करण्यात आली. निवड झालेल्या या आपदा मित्रांनी राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गुजरात येथे 21 दिवसांचे निवासी ऍडव्हान्स प्रशिक्षण पूर्ण केले. या प्रशिक्षणात विविध प्रकारच्या नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीमधील व्यवस्थापन, तांत्रिक कौशल्य, शोध आणि बचाव कार्य, समुदायाला प्रशिक्षण देण्याची पद्धत, आणि प्रभावी समन्वय अशा अनेक बाबींचा समावेश होता. प्रशिक्षण पूर्ण करून परतल्यानंतर आज या चारही आपदा…
Author: Lok Sanchar
परभणी (प्रतिनिधी) आर.पी.हॉस्पिटल व परभणी मेडिकल कॉलेज येथील डॉक्टरांनी एका व्यक्तीच्या पोटातून काचेची लांब बाटली यशस्वीपणे काढून जीवदान दिले आहे. एक व्यक्ती पोटदुखीच्या तक्रारीने रुग्णालयात दाखल झाली होती. प्राथमिक तपासणी नंतर शल्य चिकित्सक डॉ.अमीर तडवी यांनी रुग्णाचा एक्स-रे, सोनोग्राफी करून घेतली व पोटात बाटली असल्याचे निश्चित झाल्या नंतर रुग्णाला पोटाच्या आतड्याचा संसर्ग आणि आतड्यात जखमा झाल्याचे आढळून आले. आर.पी.हॉस्पिटल व परभणी मेडिकल कॉलेज येथील डॉ. अमीर तडवी, भुलतज्ञ डॉ.श्रीकांत वांगीकर ओ.टी.स्टाफ संध्या आळणी, किशोर नवले व इतर कर्मचारी यांनी तातडीने शस्त्रक्रिया करून ही काचेची बाटली काढली. शस्त्रक्रियेनंतर आणि अतिदक्षता विभागातील औषध उपचारा नंतर रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.…
पालम (प्रतिनिधी) तालुक्यातील बरबडी येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटी गणेशराव रोकडे यांच्या सहकार्यामुळे बिनविरोध काढण्यात आल्यामुळेसोसायटी सर्वसदस्य यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गणेशराव रोकडे दादा(रासपा प्र.उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य तसेच संचालक जि. म.सह बँक परभणी) यावेळी पुंडलिक डांगे(सरपंच) अंगदराव कुरे, सदस्य डांगे बालासाहेब नारायण, डांगे पंढरी बालासाहेब,डांगे गणपती नारायण,डांगे उत्तम तातेराव,डांगे कैलास व्यंकटी,कर्वे नागोराव नामदेव,डांगे गंगाधर भगवान,डांगे दत्तराव गणपतराव,डांगे, लक्ष्मी पंढरीनाथ,पवार शंकर जैसे, माळवटकर संजय बालाजी,वंजारे नीलकंठ ग्यानबा,डांगे कोंडाबाई प्रकाश इत्यादी सर्व सदस्य मंडळी उपस्थित होते
पालम (प्रतिनिधी) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती शहरातील विविध ठिकाणी साजरी करण्यात आली. बौद्ध विहार पालम येथे यावेळी पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण पालम पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय सुरेश थोरात, यांच्या हस्ते करण्यात आले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालम नगरपंचायत चे नगराध्यक्ष वसंत काका सिरस्कर यांची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. सदर कार्यक्रमास पालम सभापती गजानन गणेशराव रोकडे, नगरसेवक लक्ष्मण रोकडे, उपनगराध्यक्ष इमदाद खान पठाण, कृषी अधिकारी आबासाहेब देशमुख, सुभाषराव धूळगुंडे, गटनेते भास्करराव सिरस्कर, रामजी मणियार, नगरसेवक सय्यद इखार भाई,…
परभणी(प्रतिनिधी) : मध्यवस्तीतील वडगल्लीतील ज्येष्ठ नागरिक श्रीमती विमलबाई जनार्धनराव शहाणे यांचे सोमवार 14 एप्रिल रोजी रात्री 10 वाजता र्हदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मृत्यूसमयी त्या 77 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात शंकर, गजानन ही दोन मुले, सौ. सिंधू, सौ. सुनीता या दोन मुली, सौ. सुरेखा, सौ. योगिता या दोन सूना, नातू डॉ. मयूर, शिवम, वैष्णवी, कृष्णा, ऋतूजा, डॉ. प्रतिक्षा, स्वरा असा मोठा परिवार आहे. श्रीमती शहाणे यांच्या पार्थीवावर मंगळवारी दुपारी 12 वाजता येथील जिंतूर रस्त्यावरील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, क्रिडा शिक्षक शंकर शहाणे यांच्या त्या मातोश्री होत.
परभणी (प्रतिनिधी)येथील ज्ञानोपासक महाविद्यालय आणि रसायनशास्त्र विभागाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष बापूसाहेब ऍड. गणेशरावजी दुधगावकर होते,बोलताना ते म्हणाले जातीयता नष्ट झाल्याशिवाय सामाजिक समता प्रस्थापित होणार नाही हे बाबासाहेबांना माहीत होतं त्यामुळे सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिल. महाराष्ट्र शासन व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या आदेशान्वे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह आयोजित करण्यात आला होता.या सप्ताहात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर मार्गदर्शन,जय भीम पदयात्रा, महात्मा फुले यांना अभिवादन, समतादुताच्या माध्यमातून विविध शिष्यवृत्ती योजनेचे मार्गदर्शन आणि बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन अशा अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलें होते. याप्रसंगी…
परभणी (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्ताने शहरासह जिल्ह्यातील विविध पक्ष, संस्था, प्रतिष्ठान, संघटनांद्वारे सोमवार 14 एप्रिल रोजी अभिवादनासह अन्य भरगच्च कार्यक्रम आयोजित केले होते. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्यास शेकडो मान्यवरांसह हजारो नागरिकांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. गेल्या चार-सहा दिवसांपासून या जयंतीच्या पार्श्वभूमीवर परभणी शहरातील विविध भागातील संस्था, संघटना, प्रतिष्ठानांद्वारे मोठ्या प्रमाणावर कार्यक्रमांचे नियोजन तसेच वातावरण निर्मितीसुध्दा करण्यात आली . विशेषतः मुख्य रस्ते, मुख्य चौकांमधून निळे झेंडे, छोट्या मोठ्या आकाराचे, विविध आशयांचे होर्डिंग्ज उभारल्या गेले . हे होर्डींग लक्षवेधी ठरले आहेत. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरात महापालिका…
परभणी (प्रतिनिधी) आज भगवान महावीर यांच्या 2624 व्या जन्म कल्याणक दिनानिमित्त सकल जैन समाज परभणी तर्फे आज परभणी शहरामध्ये सर्व जैन मंदिर मध्ये विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले. सकाळी सात वाजता आनंद नगर जैन मंदिर इथून शोभा यात्रेला सुरुवात झाली तेथून सुभाष रोड जैन मंदिर भजन गल्ली जैन मंदिर पोलीस कॉर्टर नानलपेठ मार्गे गांधी पार्क नारायण चाळ मार्गे गांधी पार्कमध्ये शोभायात्रेचा स्तंभ पूजन करून समारोप झाला यावेळी सकल जैन समाजातील हजारो पुरुष महिला उपस्थित होते याप्रसंगी विविध धार्मिक कार्यक्रम झाले लहान मुलांच्या नाटिका डान्स वक्तृत्व झाले यावेळी जैन समाजातील माजी खासदार व शेतकरी नेते राजू शेट्टी यांनीही समाजाला प्रबोधन…
परभणी (प्रतिनिधी) येथील ज्ञानोपासक महाविद्यालयात महाराष्ट्र शासन व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या आदेशान्वे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे प्राचार्य डॉ.शेख बाबर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.या सप्ताहाच्या माध्यमातून जय भीम पदयात्रा, संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन आणि कार्यावर वक्तृत्व स्पर्धा, समतादूताच्या माध्यमातून मार्गदर्शन, महात्मा फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने अभिवादन आणि भीम जयंतीच्या दिनी बाबासाहेबांना अभिवादन करून समारोप होणार आहे. उद्घाटनाच्या प्रसंगी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, प्र.कुलगुरु डॉ.अशोक महाजन, प्राचार्य बी. यू.जाधव, विद्यापीठाच्या प्राधिकरणातील डॉ. चौधरी, अशोक गुजराती यांनी भेट दिली.या कार्यक्रमाला उपप्राचार्य विजय घोडके,डॉ.पी.एस.वक्ते, सर्व विभागाचे विभाग प्रमुख…
परभणी,(प्रतिनिधी) : जिल्ह्यातील अस्तित्वात असणार्या जुन्या भूस्रोतांच्या बळकटीकरणासाठी संबंधित यंत्रणा, जिल्हा नियोजन आणि सीएसआर फंडाच्या माध्यमातून आपण गतिशील प्रयत्न करू, असे आश्वासन पालकमंत्री सौ. मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले. येणार्या पावसाळ्यात पाण्याची स्थिती उत्तम रहावी यासाठी याच उन्हाळ्यात जलस्त्रोतांच्या बळकटीकरणासाठी त्वरित निधी उपलब्ध करून द्यावा या मागणीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष इंजि. शंकर आजेगावकर यांनी पालकमंत्री बोर्डीकर यांची भेट घेवून चर्चा केली. तसेच आपल्या मागणी संदर्भातील एक निवेदन सादर केले. त्याद्वारे, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘नॅशनल कंपायलेशन ऑन डायनामिक ग्राउंड वॉटर रिसोर्सेस ऑफ इंडिया’ यांच्या अहवालानुसार भूजलाच्या अमर्याद्वापरामुळे जमिनीखालील पाण्याची स्थिती अत्यंत गंभीर होत आहे. परभणी जिल्हा हा गोदावरी खोर्यातील…

