पालम (प्रतिनिधी ) दि.07 रोजी कृषी आयुक्तालय पुणे येथे पीक विम्याचे प्रणेते डॉ सुभाषराव कदम,व शिवाजीराव दिवटे ता आ. पालम यांनी तत्कालीन कृषी संचालक माननीय श्री विनय औटी यांची भेट घेतली. खरीप पीक विमा 2021 ची रक्कम शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी औटी साहेबांचे अत्यंत मोलाचे सहकार्य लाभले. उतरदायीत्व म्हणून आयुक्त कार्यालय पुणे येथे त्यांचा सत्कार करून आभार व्यक्त करण्यात आले. तसेच रब्बी पीक विमा (हरभरा) क्लेम 2023 चा पाठपुराव्या बाबत चर्चा केली. चर्चे दरम्यान औटी यांनी बोलताना म्हणाले की हरभरा पीक विमा 2023 सुद्धा 8-10 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल असे आश्वासन दिले
Author: Lok Sanchar
पालम (प्रतिनिधी ) – दि.07 रोजी कृषी आयुक्तालय पुणे येथे पीक विम्याचे प्रणेते डॉ सुभाषराव कदम,व शिवाजीराव दिवटे ता आ. पालम यांनी तत्कालीन कृषी संचालक माननीय श्री विनय औटी यांची भेट घेतली. खरीप पीक विमा 2021 ची रक्कम शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी औटी साहेबांचे अत्यंत मोलाचे सहकार्य लाभले. उतरदायीत्व म्हणून आयुक्त कार्यालय पुणे येथे त्यांचा सत्कार करून आभार व्यक्त करण्यात आले. तसेच रब्बी पीक विमा (हरभरा) क्लेम 2023 चा पाठपुराव्या बाबत चर्चा केली. चर्चे दरम्यान औटी यांनी बोलताना म्हणाले की हरभरा पीक विमा 2023 सुद्धा 8-10 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल असे आश्वासन दिले
पालम (प्रतिनिधी) येथील सिरस्कर गल्ली येथे रामराव पाटील आयुर्वेदिक महाविद्यालय रूग्णालय पूर्णा व सार्वजनिक दुर्गा महोत्सव पालम यांच्या संयुक्त विद्यमानाने विनामूल्ये सामुदायिक आरोग्य शिबीर राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्ष ग्रह/विधी व न्याय विभागामार्फत जिल्ह्यात मोफत आरोग्य शिबिर राबविण्यात आले असून परभणी जिल्ह्याचे जिल्हा समन्वयक डॉ. सिद्धार्थ पैठणे यांनी पूर्णा येथील रामराव पाटील आयुर्वेदिक महाविद्यालय धर्मादाय रुग्णालय व सार्वजनिक दुर्गा देवी नवरात्र महोत्सव पालम यांच्या संयुक्त विद्यमानाने आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले आहे शिबिरासाठी श्री.बळीराजा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तुषार भाई गोळेगावकर मार्गदर्शन करून प्रोत्साहन दिले त्याचबरोबर कॉलेजचे प्राचार्य डॉ. गोविंद लंगोटे, प्रशासकीय अधिकारी अभय कुमार कदम यांनी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर शिबिरासाठी…
परभणी ( प्रतिनिधी) परभणी येथील सरस्वती धन्वंतरी मेडिकल फाउंडेशन पाथरी रोड परभणी च्या व डॉ. प्रफुल्ल पाटील बीएससी नर्सिंग कॉलेजच्या नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचा व सरस्वती – धन्वंतरी डेंटल कॉलेज च्या पदयुत्तर (मास्टर ऑफ़ डेंटल सर्जरी) प्रवेशित विद्याथ्यांचा स्वागत सोहळा दिनांक 10 ऑक्टोंबर रोजी डॉ. प्रफुल्ल पाटील शैक्षणिक व हॉस्पिटल सभागृहात पार पडला. या वर्षी संस्थेच्या डॉ. प्रफुल्ल पाटील नर्सिंग कॉलेज मध्ये बीएससी नर्सिंग या ग्रॅज्युएट कोर्स साठी तसेच तीन वर्षाच्या डिप्लोमा Genral Nurse Midwifery व दोन वर्ष दोन वर्षाच्या डिप्लोमा Auxiliary Nurse Midwifery या तीन अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले त्यांचा व त्यांच्या पालकांचा स्वागत व परिचय समारोह संपन्न झाला. कार्यक्रमाची…
परभणी (प्रतिनिधी) अ. भा. मराठी पत्रकार परिषदेच्या सन 2024 -26 च्या कार्यकारिणीच्या सरचिटणीस पदी येथील प्रा.सुरेश नाईकवाडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या सन 2024-26 करिता निवडणुकीचा कार्यक्रम 1 सप्टेंबर 24 रोजी जाहीर झाला होता. आज नामनिर्देशपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी कार्यध्यक्ष पदासाठी शिवराज काटकर (सांगली ), सरचिटणीस पदासाठी प्रा.सुरेश बा. नाईकवाडे या दोघांचे प्रत्येकी एक एक नामनिर्देशपत्र दाखल झाले त्या मुळे दोघांची बिनविरोध निवड निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केली. प्रा . सुरेश नाईकवाडे हे मागील दहा वर्षांपासून मराठी पत्रकार परिषदे वर राज्य निवडणूक प्रमुख, प्रदेश उपाध्यक्ष, कार्यकारिणी सदस्य आदी पदावर कार्यरत होते. परभणीत मागील…
परभणी (परभणी) मौजे धर्मापुरी तालुका जिल्हा परभणी येथे शालेय व्यवस्थापन समितीची निवड करण्यात आली. यावेळी आठ सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली यामध्ये सारिका तानाजी कदम, सतीश राजकर्ण कदम, कविता नितीन बैलवाडे, संगीता सुभाष मुळे शेख हुसेन शेख इसाक, नामदेव एकनाथ तुपसुंदरे, राहुल पैठणे, मनकर्णा शिवाजी आढाव यांचा समावेश आहे. तर निवड पद्धतीने शारदा रानबा कदम, अंबादास संजय कदम, सुनिता बापूराव कदम यांची निवड करण्यात आली. सर्वात विशेष बाब म्हणजे अंबादास संजय कदम यांची दुसऱ्यांदा शालेय समिती अध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी सरपंच नवनाथ पैठणे, उपसरपंच तानाजी कदम, चेअरमन गोविंद कदम, मुख्याध्यापक सलीम सर, सर्व शिक्षक, सुनील पांचाळ, बाळासाहेब देशमुख, त्रंबक…
कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती मुंबई – नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबवणे केंद्र सरकारच्या ॲग्रिस्टॅक या योजनेस मंजुरी देणे राज्यातील कृषी विद्यापीठांमधील प्रकल्पग्रस्तांच्या पदभरतीस मंजुरी आणि बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्रास अतिरिक्त निधी देण्यास आज-गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे राज्यातील निवडक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हवामान बदलांमुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास सक्षम करणे आणि शेती व्यवसाय किफायतशीर करण्यास सहाय्य करणे या उद्देशाने राज्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात 5284 गावांचा समावेश होता. दुसऱ्या टप्प्यात सद्यस्थितीत समाविष्ट असलेल्या 16…
सेलू ( प्रतिनिधी) येथील स्वामी रामानंद तीर्थ हिंदी-मराठी ग्रंथालय, शब्दसह्याद्री व अक्षर प्रतिष्ठानच्या वतीने सेलूकरांना दोन दिवस व्याख्यानाची वैचारिक मेजवानी मिळणार आहे. स्वामी रामानंद तीर्थ हिंदी-मराठी ग्रंथालयाच्या वतीने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्या बद्दल रविवार ( दि. १३ ) रोजी ‘ अभिजात मराठी : सांस्कृतिक पार्श्वभूमी आणि भवितव्य ‘ या विषयावर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडच्या भाषा संकुल विभागातील प्रा. पी. विठ्ठल यांचे व्याख्यान आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर हे असतील. तर शब्दसह्याद्री व अक्षर प्रतिष्ठानच्या वतीने माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने…
शेतकरी कामगार पक्षाचे जोरदार आंदोलन परभणी,(प्रतिनिधी) शहरातील दर्गा रस्त्यावरील हाजी हामीद कॉलनीत सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याने नवीन डीपी बसवून वीज पुरवठा सुरळीत करावा, या मागणीसाठी शेतकारी कामगार पक्षाच्या अल्पसंख्यांक आघाडीच्यावतीने गुरुवारी (दि.10) जोरदार आंदोलन करण्यात आले. दर्गाह रस्त्यावरील पारवा गेटजवळील हाजी हमीद कॉलीनीत रहिवाशांचे वीजेअभावी प्रचंड बेहाल होत आहेत. चार-चार दिवस वीज पुरवठा खंडीत राहत असून या भागातील पोलचे अंतर तसेच लोंबळणार्या तारांमुळे विलक्षण स्थिती निर्माण झाली आहे. आधीच या भागातील नागरीक मूलभूत सोयी-सुविधांअभावी हैराण असतांना महावितरण कंपनीच्या या दररोजच्या त्रासामुळे नागरीकांचे जीवन असह्य झाले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई किर्तीकुमार बुरांडे यांच्या नेतृत्वाखाली अल्पसंख्यांक आघाडीचे…
परभणी,(प्रतिनिधी) : कुल जमाती तंजीम या संघटनेस 11 ऑक्टोंबर रोजी आयोजित धरणे आंदोलन नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यास भाग पाडावे, अशी मागणी विश्व हिंदु परिषदेच्या संतप्त पदाधिकार्यांनी गुरुवारी (दि.10) जिल्हा प्रशासनास सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली. मागील दोन महिन्यांपासून पुजनीय संत रामगिरी महाराज तसेच पुजनीय नरसिंहनंद महाराज यांना हेतुतः टार्गेट केले जात आहे. विशेषतः परभणीतही या संघटनेने हिंदुसाठीच्या पवित्र नवरात्रीच्या सणात जाणीवपूर्वक धरणे आंदोलन पुकारले आहे. हिंदु माता भगिणी, युवक, अबालवृध्द हे आनंदोत्सव साजरा करत असतांना हिंदुंच्या या सणास आंदोलनाद्वारे हा गालबोट लावण्याचाच एक प्रकार आहे, असे विश्व हिंदु परिषदेच्या या शिष्टमंडळाने नमूद केले. गुरुवारी सकाळी न्यू भारत मटण शॉप या…

